शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

डाळी महागल्याने गृहिणी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:28 IST

गोंदिया : महाराष्ट्रीय जेवणात रोजच्या आहारात वरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे; परंतु डाळींच्या किमती गगनाला भिडल्याने जिल्ह्यातील गृहिणी हैराण झाल्या ...

गोंदिया : महाराष्ट्रीय जेवणात रोजच्या आहारात वरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे; परंतु डाळींच्या किमती गगनाला भिडल्याने जिल्ह्यातील गृहिणी हैराण झाल्या आहेत. आवडती तुरीची डाळ महागल्याने ती पुरवून पुरवून वापरण्यासाठी गृहिणींना मोठी कसरत करावी लागत आहे. सोबतच उडीद, मूग व चना डाळही महागल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

महाराष्ट्रीय जेवणात वरण, भात, भाजी व पोळी, असा नेहमीचा स्वयंपाक केला जातो. जेवण कोरडे वाटू नये, तसेच जेवणात प्रथिनांचा समावेश व्हावा यासाठी तुरीच्या डाळीच्या वरणाचे जास्त महत्त्व आहे. सोबतच पालकभाजी व इतरही भाज्यांमध्ये तूर व चनाडाळ मोठ्या प्रमाणात वापरली जाते. या कारणाने या डाळींची मागणीही जास्त असते. सोबतच उडीद व मुगाची डाळही जेवणात असतेच; परंतु दोन वर्षांपासून सर्वच डाळींच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे रोजच्या आहारात डाळींचा समावेश करताना गृहिणींना नाकीनऊ येत आहे.

गत काही वर्षांपासून तुरीच्या डाळीचे उत्पन्न घटत चालले आहे. हाच प्रकार चना डाळीसोबतही पाहावयास मिळतो. सध्या तूर डाळ ११५ रुपये, उडीद ११५, मूग डाळ १२०, चना डाळ ८०, असे भाव पाहून गृहिणींच्या डोळ्यांत पाणी येत आहे. जिल्ह्यात तूर व चन्याचे उत्पन्न घेतले जाते. त्यामुळे ग्रामीण भागात किमान खाण्यापुरती डाळ मिळून जाते. शहरात असलेल्या नागरिकांना मात्र सर्व पदार्थ विकत घ्यावे लागतात, तसेच उडीद व मुगाच्या डाळीचे उत्पन्न जिल्ह्यात नगण्य आहे; परंतु दाक्षिणात्य पदार्थांची क्रेझ वाढल्याने या डाळीचे प्रमाणही वाढले आहे. आहारातून पौष्टिकत्व कमी होत चालले आहे. या कारणाने डॉक्टर जेवणामध्ये डाळींचा उपयोग जास्त करण्याचा सल्ला देतात, तसेच सर्वच डाळी काही ना काही प्रमाणात आहारात असाव्यात, असेही डॉक्टर सांगतात; परंतु त्यांच्या किमती महागल्याने त्यांचा नियमित जेवणात उपयोग कसा करावा, असा प्रश्न पडतो. त्यामुळे शासनाने डाळींच्या किमती स्थिर ठेवण्याची मागणी गृहिणींमधून होत आहे.

बॉक्स

घरच्या डाळींची मागणी जास्त

बाजारात सर्वच डाळी उपलब्ध असल्या तरी गावांमध्ये उत्पादित होत असलेल्या घरच्या डाळीची मागणीही जास्त आहे. अशी डाळ थोड्या जास्त किमतीतही घ्यायला शहरातील नागरिक तयार असतात. बाजारात मिळत असलेली तुरीची डाळ ही जास्त पिवळी व चमकदार असली तरी ती पॉलिश केलेली असते हे नागरिकांना आता कळून चुकले आहे. त्यामुळे घरगुती डाळीला जास्त मागणी आहे. आहाराबाबत नागरिक जागरूक झाल्याने प्रत्येक गोष्ट पारखून घेण्याकडे कल असतो.

बॉक्स

आहारात सर्वत्र डाळींचा समावेश आवश्यक

तूर आणि चना डाळीच्या तुलनेत आहारात बाकी डाळींचा समावेश हा फार अत्यल्प असतो. त्यामुळे दोनच डाळींची मागणी जास्त असल्याने त्यांच्या किमती गगनाला भिडतात; पण यावर पर्याय म्हणून मिक्स डाळींचे वरण जेवणात असावे, असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. सर्वच डाळींचा आहारात सारखा समावेश असल्यास प्रथिनेही भरपूर प्रमाणात मिळतात आणि महागाईपासून थोडा दिलासा मिळतो. त्यामुळे गृहिणींनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.