शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

डाळी महागल्याने गृहिणी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:28 IST

गोंदिया : महाराष्ट्रीय जेवणात रोजच्या आहारात वरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे; परंतु डाळींच्या किमती गगनाला भिडल्याने जिल्ह्यातील गृहिणी हैराण झाल्या ...

गोंदिया : महाराष्ट्रीय जेवणात रोजच्या आहारात वरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे; परंतु डाळींच्या किमती गगनाला भिडल्याने जिल्ह्यातील गृहिणी हैराण झाल्या आहेत. आवडती तुरीची डाळ महागल्याने ती पुरवून पुरवून वापरण्यासाठी गृहिणींना मोठी कसरत करावी लागत आहे. सोबतच उडीद, मूग व चना डाळही महागल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

महाराष्ट्रीय जेवणात वरण, भात, भाजी व पोळी, असा नेहमीचा स्वयंपाक केला जातो. जेवण कोरडे वाटू नये, तसेच जेवणात प्रथिनांचा समावेश व्हावा यासाठी तुरीच्या डाळीच्या वरणाचे जास्त महत्त्व आहे. सोबतच पालकभाजी व इतरही भाज्यांमध्ये तूर व चनाडाळ मोठ्या प्रमाणात वापरली जाते. या कारणाने या डाळींची मागणीही जास्त असते. सोबतच उडीद व मुगाची डाळही जेवणात असतेच; परंतु दोन वर्षांपासून सर्वच डाळींच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे रोजच्या आहारात डाळींचा समावेश करताना गृहिणींना नाकीनऊ येत आहे.

गत काही वर्षांपासून तुरीच्या डाळीचे उत्पन्न घटत चालले आहे. हाच प्रकार चना डाळीसोबतही पाहावयास मिळतो. सध्या तूर डाळ ११५ रुपये, उडीद ११५, मूग डाळ १२०, चना डाळ ८०, असे भाव पाहून गृहिणींच्या डोळ्यांत पाणी येत आहे. जिल्ह्यात तूर व चन्याचे उत्पन्न घेतले जाते. त्यामुळे ग्रामीण भागात किमान खाण्यापुरती डाळ मिळून जाते. शहरात असलेल्या नागरिकांना मात्र सर्व पदार्थ विकत घ्यावे लागतात, तसेच उडीद व मुगाच्या डाळीचे उत्पन्न जिल्ह्यात नगण्य आहे; परंतु दाक्षिणात्य पदार्थांची क्रेझ वाढल्याने या डाळीचे प्रमाणही वाढले आहे. आहारातून पौष्टिकत्व कमी होत चालले आहे. या कारणाने डॉक्टर जेवणामध्ये डाळींचा उपयोग जास्त करण्याचा सल्ला देतात, तसेच सर्वच डाळी काही ना काही प्रमाणात आहारात असाव्यात, असेही डॉक्टर सांगतात; परंतु त्यांच्या किमती महागल्याने त्यांचा नियमित जेवणात उपयोग कसा करावा, असा प्रश्न पडतो. त्यामुळे शासनाने डाळींच्या किमती स्थिर ठेवण्याची मागणी गृहिणींमधून होत आहे.

बॉक्स

घरच्या डाळींची मागणी जास्त

बाजारात सर्वच डाळी उपलब्ध असल्या तरी गावांमध्ये उत्पादित होत असलेल्या घरच्या डाळीची मागणीही जास्त आहे. अशी डाळ थोड्या जास्त किमतीतही घ्यायला शहरातील नागरिक तयार असतात. बाजारात मिळत असलेली तुरीची डाळ ही जास्त पिवळी व चमकदार असली तरी ती पॉलिश केलेली असते हे नागरिकांना आता कळून चुकले आहे. त्यामुळे घरगुती डाळीला जास्त मागणी आहे. आहाराबाबत नागरिक जागरूक झाल्याने प्रत्येक गोष्ट पारखून घेण्याकडे कल असतो.

बॉक्स

आहारात सर्वत्र डाळींचा समावेश आवश्यक

तूर आणि चना डाळीच्या तुलनेत आहारात बाकी डाळींचा समावेश हा फार अत्यल्प असतो. त्यामुळे दोनच डाळींची मागणी जास्त असल्याने त्यांच्या किमती गगनाला भिडतात; पण यावर पर्याय म्हणून मिक्स डाळींचे वरण जेवणात असावे, असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. सर्वच डाळींचा आहारात सारखा समावेश असल्यास प्रथिनेही भरपूर प्रमाणात मिळतात आणि महागाईपासून थोडा दिलासा मिळतो. त्यामुळे गृहिणींनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.