शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

नगरपंचायतमधील १५० कुटुंबांचे घरकुल वाध्यांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 06:00 IST

दोन वर्षापूर्वी नगर पंचायतच्या प्रथम निवडणुका होऊन लोकशाही मार्गाने शासन स्थापित झाले. त्यानंतर कामाना गती मिळेल अशी अपेक्षा होती. नगर पंचायतने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत नगरवासीयांचे घरकुलसाठी अर्ज मागविले. त्यानुसार गरजू लोकांनी कच्या घरातून पक्या घरात जाण्यासाठी घरकुल योजनेचा लाभ मिळावा म्हणून अर्ज केला. यात पहिल्या वर्षी ७२ व दुसऱ्या वर्षी ६८ कुटुंबाचे घरकुल मंजूर घेऊन सुद्धा त्यांचे बांधकाम सुरु होऊ शकले नाही.

ठळक मुद्देगावठाण जमिनीचे मालकी हक्क नाही : निधी आली पण काम नाही

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : विकासाच्या बाबतीत अनेक ज्वलंत समस्यांना सतत तोंड देत असलेली येथील नगर पंचायत गरीब गरजू लोकांना सहजतेने घरकुल योजनेचा लाभ सुद्धा देऊ शकत नाही. मागील दोन वर्षापासून सुमारे १५० कुटुंब घरकुल योजनेत पात्र असून सुद्धा पक्या घरांचे फक्त स्वप्नच बघत आहेत. परंतु त्यांचे घरकुल बांधकाम वांद्यात आल्याने त्यांना पडक्या घरातच वास्तव्य करावे लागत आहे.दोन वर्षापूर्वी नगर पंचायतच्या प्रथम निवडणुका होऊन लोकशाही मार्गाने शासन स्थापित झाले. त्यानंतर कामाना गती मिळेल अशी अपेक्षा होती. नगर पंचायतने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत नगरवासीयांचे घरकुलसाठी अर्ज मागविले. त्यानुसार गरजू लोकांनी कच्या घरातून पक्या घरात जाण्यासाठी घरकुल योजनेचा लाभ मिळावा म्हणून अर्ज केला. यात पहिल्या वर्षी ७२ व दुसऱ्या वर्षी ६८ कुटुंबाचे घरकुल मंजूर घेऊन सुद्धा त्यांचे बांधकाम सुरु होऊ शकले नाही. कारण, जे कुटूंब मागील ६०-७० वर्षांपासून गावठाण जागेवर मातीच्या कच्च्या घरात वास्तव्य करुन राहत आहेत ती जागाच संबंधीतांच्या नावावर आजपर्यत आली नाही. अशात बांधकाम सुरु करण्यात अडचण येत आहे. लाभार्थ्यांच्या नावावर घरकुल बांधकामासाठी प्रत्येकी ४० हजार रुपये प्रमाणे निधी येऊन पडलेला आहे. आलेला निधी राज्य शासनाच्या एक लाख रुपये मंजूर निधी पैकी असून बांधकाम सुरु करण्यासाठी पहली किस्त म्हणून आलेली आहे. त्यानंतर राज्य शासनाचे उर्वरीत ६० लाख आणि केंद्र शासनाचे दीड लाख रुपये प्रती लाभार्थीप्रमाणे मिळणार आहे. परंतु नावावर पट्टे नसल्याच्या वांद्यात घरकुलाचे काम सुरु झाले नाही.भूमापन कार्यालयाने अडवून ठेवले मोजमापलाभार्थ्यांच्या घराचे पट्टे मोजमाप करुन त्यांना मालकी हक्क देत पट्यावर नाव चढविण्यात यावे म्हणून नगर पंचायत पदाधिकाऱ्यांनी भूमापन कार्यालयाकडे रीतसर अर्ज केला. परंतु मोजमाप करण्यापुर्वी शुल्क भरण्यात यावे अशी अट भूमापन कार्यालयाने ठेवली आहे. नगर पंचायत बांधकाम विभागाने शासकीय कामानिमित्त जमिनीचे मोजमाप विनाशुल्क करण्यासंबंधी शासनाचे नियम असलेले पत्र दिले. परंतु यावरही भूमापन कार्यालयाने लक्ष दिले नाही. परिणामी गावठाण जमीनीवर संबंधीत घरमालकांना मालकी हक्क मिळण्याला विलंब होत आहे. अशात त्या १५० कुटुंबाना जमीन केव्हा मिळणार व पक्के घर केव्हा बांधले जाणार हे सध्यातरी अंधारात आहे. तोपर्यंत त्यांना मातीच्या पडक्या घरातच आपले ऊन्ह व पावसाचे दिवस काढावे लागणार हे नक्की.‘जमिनीची मोजमाप करुन मालकी हक्क देत नाव चढविण्यात यावे म्हणून भूमापन कार्यालय तसेच आमदार, खासदार यांच्यासह संबंधीत विभागाकडे पाठपुरावा केला आहे. त्यांनी अडचण दूर करण्यासाठी सहकार्य करावे.उमेदलाल जैतवारबांधकाम सभापती, नगर पंचायत, सालेकसा.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना