शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
2
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
4
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
5
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
6
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
7
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
8
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
9
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
10
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
11
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
12
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
13
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
14
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
15
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
16
Ganesh Visarjan 2025: बाप्पा दीड दिवसांतच का चालला? असं चिमुकल्यांनी विचारलं, तर द्या 'हे' शास्त्रोक्त उत्तर!
17
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
18
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
19
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
20
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम

रेल्वे स्थानक परिसरातील हॉटेलचे अतिक्रमण हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 22:37 IST

वाहतूक नियंत्रण विभाग आणि नगर परिषद यांच्या संयुक्तपणे शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. सोमवारी (दि.१३) शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील हॉटेल चालकांचे अतिक्रमण हटविण्यात आले.हॉटेल व्यावसायीकांनी नाली आणि रस्त्यावर बांधलेला ओटे फोडून रस्ते मोकळे करण्यात आले.

ठळक मुद्देमोठ्या अतिक्रमणाकडे मात्र डोळेझाक : मोहीम सातत्याने सुरू राहणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वाहतूक नियंत्रण विभाग आणि नगर परिषद यांच्या संयुक्तपणे शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. सोमवारी (दि.१३) शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील हॉटेल चालकांचे अतिक्रमण हटविण्यात आले.हॉटेल व्यावसायीकांनी नाली आणि रस्त्यावर बांधलेला ओटे फोडून रस्ते मोकळे करण्यात आले.शहरातील गोरेलाल चौक, नेहरु प्रतिमा, चांदणी चौक, रेल्वे स्टेशन रोड, दुर्गा चौक, गांधी प्रतिमा या परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा व्यवसायीकांनी अतिक्रमण करुन रस्ते अरुंद करुन टाकले आहे. आधीच शहरातील मुख्य रस्ते वाहतुकीच्या तुलनेत अरुंद असून त्यात अतिक्रमणामुळे रस्त्याची रुंदी अधिकच कमी झाली आहे. त्यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी आणि अपघाताच्या संख्येत वाढ झाली होती. वाहतुकीच्या कोंडी वाढत असताना ती सोडविण्यासाठी उपाय योजना केल्या जात नसल्याने शहरवासीयांमध्ये रोष व्याप्त होता. अखेर याची दखल जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी घेत शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त करुन वाहतुकीसाठी मोकळे करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी १० मे पासून वाहतूक नियंत्रण विभाग आणि नगर परिषद यांच्या संयुक्तपणे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली. दोन दिवसात शहरातील काही भागातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले. त्यामुळे प्रथमच शहरातील रस्ते किती मोठे याचीे जाणीव शहरवासीयांना झाली. त्यानंतर सोमवारी (दि.१३) रेल्वे स्थानक परिसरात काही हॉटेल व्यावसायीकांनी केलेले अतिक्रमण काढण्यात आले. या अतिक्रमणामुळे प्रवाशांना नेहमीच त्रास सहन करावा लागत होता. हॉटेलचे अतिक्रमण काढून रस्ते पूर्णपणे मोकळे करण्यात आले. नाली आणि रस्त्यावर केलेले पक्के अतिक्रमण सुध्दा मजूर लावून फोडण्यात आले.यामुळे अतिक्रमणधारकांची काही वेळ चांगलीच तारांबळ उडाली होती. मोहीमेदरम्यान वाहतूक नियंत्रण विभाग आणि नगर परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमण कायमशहरातील गोरेलाल चौक परिसरात मुख्य बाजारपेठ असून या भागात रस्त्याच्या दोन्ही बाजुला मोठ्या प्रमाणात व्यावसायीकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रस्त्यांची रुंदी फारच कमी झाली असून या ठिकाणी सर्वाधिक वाहतुकीची कोंडी होते. पण अतिक्रमण हटाव पथकाची नजर अद्यापही या परिसराकडे न गेल्याने या भागातील अतिक्रमणाची समस्या कायम आहे.पक्क्या अतिक्रमणावर चालणार का हातोडा?शहरातील केवळ मुख्य चौकातच नव्हे तर इतरही भागात काही बड्या व्यक्तींनी पक्के अतिक्रमण केले आहे. नगर परिषदेने हे अतिक्रमण हटविण्याचा दोनदा प्रयत्न केला. मात्र त्यात नगर परिषदेला यश आले नाही. मात्र आता जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या मोहीमेदरम्यान पक्क्या अतिक्रमणावर सुध्दा हातोडा चालणार का? असा सवाल शहरवासीयांकडून केला जात आहे.मोहीम तीव्र होणार का?सोमवारपासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम अधिक तीव्र स्वरुपात राबविण्यात येईल असे मोहीमेतील कर्मचाऱ्यांनी सांगितले होते. मात्र सोमवारी अतिक्रमण हटाव मोहीमेची गती पाहता त्यात फारशी तीव्रता आढळली नाही. त्यामुळे ही मोहीम खरोखरच तीव्र होणार की आधीच्या मोहीमेसारखीच ती पुन्हा बंद पडणार असा प्रश्न निर्माण उपस्थित केला जात आहे.