शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

रेल्वे स्थानक परिसरातील हॉटेलचे अतिक्रमण हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 22:37 IST

वाहतूक नियंत्रण विभाग आणि नगर परिषद यांच्या संयुक्तपणे शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. सोमवारी (दि.१३) शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील हॉटेल चालकांचे अतिक्रमण हटविण्यात आले.हॉटेल व्यावसायीकांनी नाली आणि रस्त्यावर बांधलेला ओटे फोडून रस्ते मोकळे करण्यात आले.

ठळक मुद्देमोठ्या अतिक्रमणाकडे मात्र डोळेझाक : मोहीम सातत्याने सुरू राहणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वाहतूक नियंत्रण विभाग आणि नगर परिषद यांच्या संयुक्तपणे शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. सोमवारी (दि.१३) शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील हॉटेल चालकांचे अतिक्रमण हटविण्यात आले.हॉटेल व्यावसायीकांनी नाली आणि रस्त्यावर बांधलेला ओटे फोडून रस्ते मोकळे करण्यात आले.शहरातील गोरेलाल चौक, नेहरु प्रतिमा, चांदणी चौक, रेल्वे स्टेशन रोड, दुर्गा चौक, गांधी प्रतिमा या परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा व्यवसायीकांनी अतिक्रमण करुन रस्ते अरुंद करुन टाकले आहे. आधीच शहरातील मुख्य रस्ते वाहतुकीच्या तुलनेत अरुंद असून त्यात अतिक्रमणामुळे रस्त्याची रुंदी अधिकच कमी झाली आहे. त्यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी आणि अपघाताच्या संख्येत वाढ झाली होती. वाहतुकीच्या कोंडी वाढत असताना ती सोडविण्यासाठी उपाय योजना केल्या जात नसल्याने शहरवासीयांमध्ये रोष व्याप्त होता. अखेर याची दखल जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी घेत शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त करुन वाहतुकीसाठी मोकळे करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी १० मे पासून वाहतूक नियंत्रण विभाग आणि नगर परिषद यांच्या संयुक्तपणे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली. दोन दिवसात शहरातील काही भागातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले. त्यामुळे प्रथमच शहरातील रस्ते किती मोठे याचीे जाणीव शहरवासीयांना झाली. त्यानंतर सोमवारी (दि.१३) रेल्वे स्थानक परिसरात काही हॉटेल व्यावसायीकांनी केलेले अतिक्रमण काढण्यात आले. या अतिक्रमणामुळे प्रवाशांना नेहमीच त्रास सहन करावा लागत होता. हॉटेलचे अतिक्रमण काढून रस्ते पूर्णपणे मोकळे करण्यात आले. नाली आणि रस्त्यावर केलेले पक्के अतिक्रमण सुध्दा मजूर लावून फोडण्यात आले.यामुळे अतिक्रमणधारकांची काही वेळ चांगलीच तारांबळ उडाली होती. मोहीमेदरम्यान वाहतूक नियंत्रण विभाग आणि नगर परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमण कायमशहरातील गोरेलाल चौक परिसरात मुख्य बाजारपेठ असून या भागात रस्त्याच्या दोन्ही बाजुला मोठ्या प्रमाणात व्यावसायीकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रस्त्यांची रुंदी फारच कमी झाली असून या ठिकाणी सर्वाधिक वाहतुकीची कोंडी होते. पण अतिक्रमण हटाव पथकाची नजर अद्यापही या परिसराकडे न गेल्याने या भागातील अतिक्रमणाची समस्या कायम आहे.पक्क्या अतिक्रमणावर चालणार का हातोडा?शहरातील केवळ मुख्य चौकातच नव्हे तर इतरही भागात काही बड्या व्यक्तींनी पक्के अतिक्रमण केले आहे. नगर परिषदेने हे अतिक्रमण हटविण्याचा दोनदा प्रयत्न केला. मात्र त्यात नगर परिषदेला यश आले नाही. मात्र आता जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या मोहीमेदरम्यान पक्क्या अतिक्रमणावर सुध्दा हातोडा चालणार का? असा सवाल शहरवासीयांकडून केला जात आहे.मोहीम तीव्र होणार का?सोमवारपासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम अधिक तीव्र स्वरुपात राबविण्यात येईल असे मोहीमेतील कर्मचाऱ्यांनी सांगितले होते. मात्र सोमवारी अतिक्रमण हटाव मोहीमेची गती पाहता त्यात फारशी तीव्रता आढळली नाही. त्यामुळे ही मोहीम खरोखरच तीव्र होणार की आधीच्या मोहीमेसारखीच ती पुन्हा बंद पडणार असा प्रश्न निर्माण उपस्थित केला जात आहे.