शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

आठ एकरात बागायती शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 00:19 IST

तालुक्यातील ग्राम हिरापूर येथील उच्च शिक्षित शेतकरी सुरेंद्र (बबलु) बिसेन यांनी नोकरी सोडून सन २००० पासून पारंपरिक भात शेतीला सुरु वात करु न धान मळणी यंत्र व १ ट्रॅक्टर विकत घेतला.

ठळक मुद्देहिरापूर येथील प्रयोग : कृृषी विभागाची बागायती शेतीकडे उदासीनता

दिलीप चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : तालुक्यातील ग्राम हिरापूर येथील उच्च शिक्षित शेतकरी सुरेंद्र (बबलु) बिसेन यांनी नोकरी सोडून सन २००० पासून पारंपरिक भात शेतीला सुरु वात करु न धान मळणी यंत्र व १ ट्रॅक्टर विकत घेतला. त्यासाठी त्यांनी बँकेतुन २५ लाखाचे कर्ज घेतले. हा तालुक्यातील पहीला यांत्रिक शेतीचा प्रयोग होता.सन २००७ मध्ये ७ एकर शेतीत ऊसाची लागवड केली. या पिकापासुन धानापेक्षा जास्त उत्पन्न मिळविले. तर सन २०१५ पासुन ऊसाच्या शेतीसोबतच आता ८ एकरात बागायती शेती करण्यासाठी कृषी विभागाकडे धाव घेतली आहे. मनात जिद्द असल्याने पश्चिम महाराष्ट्रातील बागायतदार शेतकऱ्यांची भेट घेवून त्यांनी माहीती मिळविली. बागायती शेती ही शेंद्रीय शेती असावी यासाठी त्यांनी ६ दुधारी गायी विकत घेतल्या, शेतात १ विहीर व १ बोअरवेल तयार करु न ड्रीप पद्धतीने गोमुत्र व पाणी देण्याला सुरु वात करीत शेणखताचा प्रयोग सुरु केला. ४ एकरात डाळींब व ४ एक रात मोसंबी, दाळ निंबूची लागवड केली.कृषी विभागाने बागायती शेती विषयी मार्गदर्शन करावे यासाठी तालुका कृषी अधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे बिसेन यांनी धाव घेतली. परंतु याकडे कृषी अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले.जिल्हात हिरापुर या गावी बागायतदार शेतकरी आहे अशी माहीती जिल्हाधिकारी अभिमन्यु काळे यांना मिळताच त्यांनी दोन वेळा या बागायती शेतीला भेट देवून झाडे कशी लावावी त्याचे अंतर किती असावे तसेच या सुटलेल्या जागेत आंतरपीक घ्यावे अशी माहिती दिली होती.बागायती शेतीला वाव देण्याची गरजकृषी विभाग तंत्रज्ञान, शासकीय अनुदानाची माहीती देत नाही. तसेच अतीवृष्टी व वादळीवारा यापासुन बागायती शेतीला नुकसान झाले तर कृषी सेवक, तलाठी व ग्रामसेवक यांना नुकसानीच्या माहीती अभावी पंचनामा करता येत नाही. धानाला हमीभाव देण्यात येतो पण बागायती शेती पिकांना हमी भाव नाही. शासनाने बागायती शेंद्रीय शेतीसाठी बाजारपेठ सुरु करावी, शितगृह बांधावे हे उपलब्ध नसल्याने भाव मिळत नाही मोसंबी व अनार हे पीक नागपुरला विकण्यास न्यावे लागत आहे. हा खर्च परवडणारा नसल्याने उत्पन्नात घट होत आहे. याकरीता राष्ट्रीय बागवानी बोर्ड नागपुर, जिल्हा कृषी अधिकारी व बँकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. शेतकरी पारंपारीक भात शेती करतो, त्यामुळे आर्थिक अडचनीत असतो व बँकेची कर्ज परतफेड करु शकत नाही. त्यामुळे बँका बागायतदार शेतकरी यांना कर्ज देत नाही. आर्थिक मदतीशिवाय शेतकरी शेती करु शकत नाही. जिल्हात बागायती शेतीला वाव देणे गरजेचे आहे असे बिसेन यांनी सांगीतले.

टॅग्स :agricultureशेती