शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

अस्वलांच्या भटकंतीने नागरिकांमध्ये दहशत

By admin | Updated: June 10, 2015 00:46 IST

बरबसपुरा गाव परिसरात दोन अस्वलांच्या भटकंतीमुळे नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे.

 बरबसपुरातील घटना : वन विभागाने पकडण्यासाठी प्रयत्न करावेकाचेवानी : बरबसपुरा गाव परिसरात दोन अस्वलांच्या भटकंतीमुळे नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. रानटी डुक्कर व एकल यांची ये-जा नियमित असली तरी अस्वलांची भटकंती प्रथमच दिसून आली आहे. बरबसपुरा, काचेवानी, मेंदीपूर हे गाव अदानी प्रकल्पाला लागून असून झुडपी जंगल लागूनच आहे. गावच्या आजूबाजूचे परिसर सपाटीकरण केल्यामुळे जंगलातील हिंसक पशू गावाकडे धाव घेत आहेत. गेल्या दोन महिन्यांपूर्वी डुकराने गावात प्रवेश करून तीन स्त्री-पुरूषांना गंभीर जखमी केले होते. गावकऱ्यांनी एकत्रित होऊन त्या डुकरांचा गावातच मुदडा पाडल्याची घटना घडली होती. गावात आताही डुकरांची ये-जा सुरू असून घरालगत असलेले सुरण व अन्य जमिनीतील कंद खोदून खातात. धान्य पिकांची नासाडी करीत आहेत. जंगली डुक्कर घराशेजारी येत असल्याने अनेक कुटुंबीय भीतीयुक्त वातावरणात जगत आहेत. तीन-चार दिवसांपासून दोन अस्वलांच्या भटकंतीमुळे गावकऱ्यांत तसेच शेतकाम करणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. सध्या शेतीच्या कामाला सुरूवात झाली असून शेतात मुलाबाळांना सोबत घेऊन महिला वर्ग जात आहे. अशातच दोन अस्वलांना पाहून शेतात काम कसे करावे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिसरात पाच वर्षांपूर्वीपासून जंगली पशंूच्या भटकंतीमुळे नागरिक व शेतकरी त्रस्त असल्याचे सांगण्यात आले. मात्र वनविभागाने याकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. आता अस्वलांच्या भटकंतीमुळे व बरबसपुरा गाव शिवारात त्यांचा वावर असल्याने नागरिक घाबरत आहेत. पोलीस पाटील बन्सीलाल रहांगडाले यांच्या शेताजवळ सायंकाळी ७.३० वाजता बरबसपुरा-भिवापूर मार्गावर शेतकऱ्यांनी आणि ये-जा करणाऱ्यांनी या अस्वलांना पाहिले. तर रात्रीला बरबसपुरा येथील रहिवाशी मन्साराम उईके यांच्या घर परिसरात बसलेले अस्वल प्रत्यक्ष पाहण्यात आले. मात्र त्यांना गावातील नागरिकांनी जंगली भागाकडे पळविण्यात यश मिळविले. वन विभागाने या अस्वलांचा बस्तोबंद करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)बंदोबस्ताची मागणी बरबसपुराचे सरपंच ममता लिचडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, दोन अस्वल आणि एकल हे गावालगत तसेच गावात वावरत आहेत. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याची माहिती वनविभागात देण्यात आली असून वनविभागाने तातडीने रोकथाम करण्याचे प्रयत्न करावे, अशी मागणी करण्यात आल्याचेही त्या बोलल्या.