शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

आदर्श शिक्षक व गुणवंताचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 01:03 IST

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधून तिरोडा विधानसभा क्षेत्रातील सेवानिवृत्त शिक्षक, आदर्श शिक्षक, दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार...

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधून तिरोडा विधानसभा क्षेत्रातील सेवानिवृत्त शिक्षक, आदर्श शिक्षक, दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आ. विजय रहांगडाले यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री राजकुमार बडोले होते. पाहुणे म्हणून म्हणून आ. परिणय फुके, नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी आ. भजनदास वैद्य, खोमेश रहांगडाले, भाऊराव कठाणे, सलामभाई शेख, कृउबास समितीचे सभापती डॉ. चिंतामन रहांगडाले, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, जि.प. सदस्य रजनी कुंभरे, मिलींद कुंभरे, डॉ. वसंत भगत, तालुका महिला मोर्चा अध्यक्षा तुमेश्वरी बघेले, तेजराम चव्हाण, जितेंद्र रहांगडाले, घनश्याम पारधी, चर्तुभूज बिसेन उपस्थित होते.बडोले यांनी यावेळी मार्गदर्शन करताना शिक्षकांचे कार्य चांगले असून आपल्या हातून चांगले विद्यार्थी घडावेत असा विचार करावा. कच्च्या हिºयाला जसे महत्व कमी असते तो पूर्ण झाला की त्याला मोल प्राप्त होते. त्याचप्रकारचे शिक्षकांचे कार्य असते, असे पालकमंत्री राजकुमार बडोले म्हणाले. भजनदास वैद्य यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनाील प्रेरक प्रसंग सांगून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे यांनी सुसंस्कृत समाजाची निर्मिती करणे काळाची गरज असल्याचे सांगितले. नगराध्यक्ष सोनाली देशपांडे यांनी शिक्षकांच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद यांना हवा असलेल्या भारत घडविण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे आयोजक आ. रहांगडाले यांनी शिक्षकांचे कार्य फार मोठे असून त्यांच्यामुळेच उत्कृष्ट पिढी निर्माण होत असल्याचे सांगितले. सध्या पाण्याअभावी शेतकºयांचे हाल होत आहे. रोवणी झाली नाही. पाणी आवश्यक आहे. खळबंदा जलाशयात पाणी पडले. चोरखमारा व बोदलकसा जलाशयात सुद्धा पाणी पडणे गरजेचे असून त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. पावसाअभावी तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत सरकार शेतकºयांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.यावेळी आदर्श शिक्षक म्हणून हायस्कूल शिक्षक डी.आर. गिरीपुंजे, ए.यू. अंबुले, चरण खोब्रागडे, यु.जी. शेंडे, एच.एस. ठोंबरे, आय.एम. परशुरामकर, ए.आर. चौधरी, एस.डी. सिंगनजुडे, एन.एन. झरारिया, व्ही.एम. टेंभुर्णे, एस.डी. लाड, एच.आर.राणे, पी.एस. डांगे, एम.एल. चापले, जी.आर. बघेले, आय.एस. बोरकर, डी.एस. गौतम, सुनील शेंडे, सविता हटवार, प्रकाश चौधरी, वर्षा सोनी, एन.जे. मिश्रा, हिरालाल शरणागत,ल एम.यू. नागदेवे, रिना जायस्वाल, के.के. बोपचे, ए.के. कापगते, के.टी. आगाशे, पारधी, सेवानिवृत्त १८ शिक्षक, विषय शिक्षक, पदवीधर शिक्षक, सहाय्यक शिक्षकांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच गुणवंत विद्यार्थी सोनल भुरे, अक्षय शेंडे, राकेश अनकर, किरण विजय बिसेन, हिमांशू हरिणखेडे, पुनम नरेश भगत, कल्पक भांडारकर, काजल चव्हाण, वैष्णवी बिसेन, वैभव चव्हान, हिमांशू अशोक पटले, रुचिका पटले यांचाही पाहुण्यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्ययात आला. संचालन माजी जि.प. उपाध्यक्ष मदन पटले यांनी केले तर आभार अनुप बोपचे यांनी मानले. यशस्वितेसाठी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते तसेच शिक्षकांचे सहकार्य केले.