शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श शिक्षक व गुणवंताचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 01:03 IST

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधून तिरोडा विधानसभा क्षेत्रातील सेवानिवृत्त शिक्षक, आदर्श शिक्षक, दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार...

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधून तिरोडा विधानसभा क्षेत्रातील सेवानिवृत्त शिक्षक, आदर्श शिक्षक, दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आ. विजय रहांगडाले यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री राजकुमार बडोले होते. पाहुणे म्हणून म्हणून आ. परिणय फुके, नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी आ. भजनदास वैद्य, खोमेश रहांगडाले, भाऊराव कठाणे, सलामभाई शेख, कृउबास समितीचे सभापती डॉ. चिंतामन रहांगडाले, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, जि.प. सदस्य रजनी कुंभरे, मिलींद कुंभरे, डॉ. वसंत भगत, तालुका महिला मोर्चा अध्यक्षा तुमेश्वरी बघेले, तेजराम चव्हाण, जितेंद्र रहांगडाले, घनश्याम पारधी, चर्तुभूज बिसेन उपस्थित होते.बडोले यांनी यावेळी मार्गदर्शन करताना शिक्षकांचे कार्य चांगले असून आपल्या हातून चांगले विद्यार्थी घडावेत असा विचार करावा. कच्च्या हिºयाला जसे महत्व कमी असते तो पूर्ण झाला की त्याला मोल प्राप्त होते. त्याचप्रकारचे शिक्षकांचे कार्य असते, असे पालकमंत्री राजकुमार बडोले म्हणाले. भजनदास वैद्य यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनाील प्रेरक प्रसंग सांगून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे यांनी सुसंस्कृत समाजाची निर्मिती करणे काळाची गरज असल्याचे सांगितले. नगराध्यक्ष सोनाली देशपांडे यांनी शिक्षकांच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद यांना हवा असलेल्या भारत घडविण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे आयोजक आ. रहांगडाले यांनी शिक्षकांचे कार्य फार मोठे असून त्यांच्यामुळेच उत्कृष्ट पिढी निर्माण होत असल्याचे सांगितले. सध्या पाण्याअभावी शेतकºयांचे हाल होत आहे. रोवणी झाली नाही. पाणी आवश्यक आहे. खळबंदा जलाशयात पाणी पडले. चोरखमारा व बोदलकसा जलाशयात सुद्धा पाणी पडणे गरजेचे असून त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. पावसाअभावी तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत सरकार शेतकºयांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.यावेळी आदर्श शिक्षक म्हणून हायस्कूल शिक्षक डी.आर. गिरीपुंजे, ए.यू. अंबुले, चरण खोब्रागडे, यु.जी. शेंडे, एच.एस. ठोंबरे, आय.एम. परशुरामकर, ए.आर. चौधरी, एस.डी. सिंगनजुडे, एन.एन. झरारिया, व्ही.एम. टेंभुर्णे, एस.डी. लाड, एच.आर.राणे, पी.एस. डांगे, एम.एल. चापले, जी.आर. बघेले, आय.एस. बोरकर, डी.एस. गौतम, सुनील शेंडे, सविता हटवार, प्रकाश चौधरी, वर्षा सोनी, एन.जे. मिश्रा, हिरालाल शरणागत,ल एम.यू. नागदेवे, रिना जायस्वाल, के.के. बोपचे, ए.के. कापगते, के.टी. आगाशे, पारधी, सेवानिवृत्त १८ शिक्षक, विषय शिक्षक, पदवीधर शिक्षक, सहाय्यक शिक्षकांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच गुणवंत विद्यार्थी सोनल भुरे, अक्षय शेंडे, राकेश अनकर, किरण विजय बिसेन, हिमांशू हरिणखेडे, पुनम नरेश भगत, कल्पक भांडारकर, काजल चव्हाण, वैष्णवी बिसेन, वैभव चव्हान, हिमांशू अशोक पटले, रुचिका पटले यांचाही पाहुण्यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्ययात आला. संचालन माजी जि.प. उपाध्यक्ष मदन पटले यांनी केले तर आभार अनुप बोपचे यांनी मानले. यशस्वितेसाठी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते तसेच शिक्षकांचे सहकार्य केले.