शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

पालकमंत्र्याच्या गृहक्षेत्रात घरकुलांचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 21:36 IST

केंद्र व राज्य शासनाच्यावतीने ग्रामीण भागातील नागरिकांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून घरकुलांचे बांधकाम केले जाते.

ठळक मुद्दे५७० घरकुलांना प्रशासकीय मान्यता : नऊ वर्षापासून काम अपूर्णच

ऑनलाईन लोकमतगोंदिया : केंद्र व राज्य शासनाच्यावतीने ग्रामीण भागातील नागरिकांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून घरकुलांचे बांधकाम केले जाते. यंदा गोंदिया जिल्ह्यात एक लाख कुटुंबांना घरकुल मंजूर करण्याचे उद्दिष्ट आहे. परंतु सडक-अर्जुनी तालुक्यात एकाही कुटुंबाने घरकूल बांधकामास सुरूवात केली नाही. त्यामुळे पालकमंत्री राजकुमार बडोले यांचा गृह तालुका असलेल्या भागातच घरकूल योजनेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.पंचायत समिती सडक-अर्जुनी येथे विविध योजनांच्या माध्यमातून घरकुलांचे बांधकाम मंजूर झाले आहेत. परंतु इंदिरा आवास योजनेच्या माध्यमातून सन २०१३-१४ पासून सन २०१५-१६ पर्यंत ३३७ घरकुलांचे काम अपूर्ण दाखविण्यात आले आहे. रमाई आवास योजनेच्या माध्यमातून सन २०१२ -१३ ते २०१३-१४ पर्यंत रमाई आवास योजनेंतर्गत ७३३ घरकुलांच्या बांधकामांना मंजुरी देण्यात आली होती. यातील ३५ घरकुलांचे बांधकाम अपूर्ण दाखविण्यात आले आहेत. राजीव गांधी ग्रामीण निवास क्र. १ अंतर्गत सन २०१२-१३ ला ३०१ घरकुल मंजूर करण्यात आले होते. यातील १३ कामे अपूर्ण दाखविली आहेत.प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सन २०१६-१७ मध्ये ५९९ कामे मंजूर करण्यात आली होती. यामधील ३२१ कामे अपूर्ण दाखविण्यात आली आहेत. रमाई योजनेंतर्गत सन २०१६-१७ मध्ये १०४ कामे मंजूर झाली. यातील ५५ कामे अपूर्ण आहेत. शबरी योजनेंतर्गत सन २०१६-१७ मध्ये ४८ घरकुल मंजूर झाले. त्यातील ४१ कामे अपूर्ण आहेत. सन २०१७-१८ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ७५७ कामांना मंजुरी देण्यात आली. पण प्रशासकीय मान्यता फक्त ५७० कामांना देण्यात आली. परंतु एकाही घरकुलाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली नाही. सन २०१२-१३ व २०१३-१४ पासून सन २०१६-१७ पर्यंत विविध योजनांच्या माध्यमातून तीन हजार ४०० घरकुलांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यातील ८०० घरकुलांची कामे अजूनही अपूर्ण आहेत.या घरकुलांच्या देयकाबाबत लाभार्थी सुद्धा वारंवार विचारणा करीत असतात. यावरुन ज्यांच्या घरकुलांचे बांधकाम पूर्ण झालेत. त्यांना सुद्धा घरकुलांचे देयक देण्यात आली की नाही, अशी शंका व्यक्त केली जात आहे.कामात मोठा घोळ?सडक-अर्जुनी तालुक्यात घरकुल योजनेत मोठा घोळ झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील पाच वर्षापासून घरकुलाचे बांधकाम प्रलंबितच दाखविले जात असल्याने त्या लाभार्थ्यांचे पैसे गहाळ तर झाले नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील शिक्षकांचे कोट्यवधी रूपये लिपीक व शिक्षण विभागाच्या माध्यमातून हडपण्यात आले. तसाच प्रकार घरकुलासंदर्भात तर झाला नाही अशी शंका व्यक्त केली जात आहे. यासंबंधीची तक्रार सुद्धा मंत्रालयाकडे करण्यात आली आहे.