शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

दुग्ध व्यवसायाची कास धरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 22:01 IST

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी शेतीवरच अवलंबून राहू नये. दैनंदिन गरजा भागविण्यासाठी हातामध्ये पैसा खेळता राहावा म्हणून दुग्ध व्यवसायाची कास धरणे गरजेचे आहे. दुध, दुभत्या जनावरांची संख्या वाढवून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय केल्यास आर्थिक विकास साधणे सहज शक्त होईल असे प्रतिपादन येथील जय भवानी व्यवसायीक सहकारी संस्थेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केले.

ठळक मुद्देलायकराम भेंडारकर : दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना साहित्य वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी शेतीवरच अवलंबून राहू नये. दैनंदिन गरजा भागविण्यासाठी हातामध्ये पैसा खेळता राहावा म्हणून दुग्ध व्यवसायाची कास धरणे गरजेचे आहे. दुध, दुभत्या जनावरांची संख्या वाढवून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय केल्यास आर्थिक विकास साधणे सहज शक्त होईल असे प्रतिपादन येथील जय भवानी व्यवसायीक सहकारी संस्थेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केले.दुध संकलन केंद्रात संस्थेच्यावतीने आयोजित दुग्ध उत्पादकांना साहीत्य वाटप कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष भुमेश्वर मलखांबे, संचालक पंढरी लोगडे, प्रमोद पाऊलझगडे, एकनाथ राखडे, गोवर्धन राखडे, उदाराम राखडे, दुर्गा राखडे, रामकला हुकरे, माजी सरपंच मोरेश्वर सोनवाने, हेमराम लोगडे, अंताराम राखडे उपस्थित होते. पुढे बोलताना भेंडारकर यांनी,गावखेड्यात शेतीला जोडधंदा उपलब्ध व्हावा. सहकारच्या माध्यमातून ग्रामीण जनतेचा सर्वांगिण विकास व्हावा या हेतुनी स्व.महादेव लोगडे यांनी चान्ना येथे जय भवानी व्यवसायिक सहकारी संस्थेची स्थापना ३५ वर्षांपूर्वी करुन बोंडगावदेवी येथे दूध संकलन केंद्र सुरु केले होते.आज संस्थेने गरुड झेप घेऊन चान्ना व बोंडगावदेवी येथे दूध संकलन केंद्र सुरु करुन दुध उत्पादकांना दुधाचा भाव जास्तीत-जास्त मिळण्यासाठी संस्थेच्यावतीने प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले.दरम्यान, दूध उत्पादकांना पाहुण्यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले. संचालन संस्थेचे व्यवस्थापक मार्कंड लांजेवार यांनी केले. आभार रामकृष्ण राखडे यांंनी मानले. कार्यक्रमाला दुग्ध उत्पादक, संस्थेचे सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :businessव्यवसाय