शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

दुग्ध व्यवसायाची कास धरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 22:01 IST

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी शेतीवरच अवलंबून राहू नये. दैनंदिन गरजा भागविण्यासाठी हातामध्ये पैसा खेळता राहावा म्हणून दुग्ध व्यवसायाची कास धरणे गरजेचे आहे. दुध, दुभत्या जनावरांची संख्या वाढवून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय केल्यास आर्थिक विकास साधणे सहज शक्त होईल असे प्रतिपादन येथील जय भवानी व्यवसायीक सहकारी संस्थेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केले.

ठळक मुद्देलायकराम भेंडारकर : दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना साहित्य वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी शेतीवरच अवलंबून राहू नये. दैनंदिन गरजा भागविण्यासाठी हातामध्ये पैसा खेळता राहावा म्हणून दुग्ध व्यवसायाची कास धरणे गरजेचे आहे. दुध, दुभत्या जनावरांची संख्या वाढवून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय केल्यास आर्थिक विकास साधणे सहज शक्त होईल असे प्रतिपादन येथील जय भवानी व्यवसायीक सहकारी संस्थेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केले.दुध संकलन केंद्रात संस्थेच्यावतीने आयोजित दुग्ध उत्पादकांना साहीत्य वाटप कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष भुमेश्वर मलखांबे, संचालक पंढरी लोगडे, प्रमोद पाऊलझगडे, एकनाथ राखडे, गोवर्धन राखडे, उदाराम राखडे, दुर्गा राखडे, रामकला हुकरे, माजी सरपंच मोरेश्वर सोनवाने, हेमराम लोगडे, अंताराम राखडे उपस्थित होते. पुढे बोलताना भेंडारकर यांनी,गावखेड्यात शेतीला जोडधंदा उपलब्ध व्हावा. सहकारच्या माध्यमातून ग्रामीण जनतेचा सर्वांगिण विकास व्हावा या हेतुनी स्व.महादेव लोगडे यांनी चान्ना येथे जय भवानी व्यवसायिक सहकारी संस्थेची स्थापना ३५ वर्षांपूर्वी करुन बोंडगावदेवी येथे दूध संकलन केंद्र सुरु केले होते.आज संस्थेने गरुड झेप घेऊन चान्ना व बोंडगावदेवी येथे दूध संकलन केंद्र सुरु करुन दुध उत्पादकांना दुधाचा भाव जास्तीत-जास्त मिळण्यासाठी संस्थेच्यावतीने प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले.दरम्यान, दूध उत्पादकांना पाहुण्यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले. संचालन संस्थेचे व्यवस्थापक मार्कंड लांजेवार यांनी केले. आभार रामकृष्ण राखडे यांंनी मानले. कार्यक्रमाला दुग्ध उत्पादक, संस्थेचे सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :businessव्यवसाय