शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
5
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
6
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
7
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
8
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
9
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
10
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
11
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
12
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
13
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
14
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
15
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
16
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
17
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
18
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
19
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

मास्क न लावणाऱ्यांना दिला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:27 IST

गोंदिया : कोरोनाचा वाढता उद्रेक बघता, जिल्हा प्रशासनाने आता कंबर कसली असून, मास्क न लावता फिरणारे, तसेच गर्दीच्या ठिकाणांवर ...

गोंदिया : कोरोनाचा वाढता उद्रेक बघता, जिल्हा प्रशासनाने आता कंबर कसली असून, मास्क न लावता फिरणारे, तसेच गर्दीच्या ठिकाणांवर नजर ठेवून कारवाई करण्यासाठी पथकांचे गठण केले आहे. यात नगरपरिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक पथक असून, त्यांच्याकडे विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. याअंतर्गत पथकाने मंगळवारी (दि.२३) मास्क न लावता, फिरणाऱ्या ४९ नागरिकांना दणका देत, त्यांच्याकडून ८,९०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. अशात कोरोना विषयक उपाययोजनांचे पालन करणे आवश्यक झाले आहे. मात्र, त्यानंतरही जिल्ह्यात मास्क न लावता फिरणे, गर्दी करणे यासारखे प्रकार सुरूच आहेत. अशात आता नगरपरिषद व महसूल विभागाने सुमारे १९ पथकांचे गठन केले असून, त्यांना विविध जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. त्यानुसार, मंगळवारी यातील ६ पथकांनी मास्क न लावता फिरणाऱ्यांवर कारवाई केली आहे. यामध्ये मास्क न लावता फिरणाऱ्या ३९ नागरिकांना प्रती व्यक्ती १०० रुपये याप्रमाणे ३,९०० रुपयांचा दंड ठोठावून त्यांच्या दंड वसूल केला आहे.

नगरपरिषद आस्थापना विभाग प्रमुख मनिषा पारधी यांनी पथकासह प्रशासकीय भवन येथे पाहणी करून १० अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रती व्यक्ती ५०० रुपये याप्रमाणे ५,५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. विशेष म्हणजे, मंगळवारी उशिरापर्यंत पथकांकडून कारवाया सुरूच होत्या. पथकांच्या या कारवायांनंतर आता मात्र नागरिकांत कारवायांना घेऊन दहशत दिसून आली.