शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

महामार्ग बांधकाम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:23 IST

रस्त्यांलगत नाल्यांचे बांधकाम अपूर्ण : पावसाळ्यात लोकवस्तींना धोका आमगाव : राष्ट्रीय राज्य महामार्ग क्र. ५४३ व ३६३ वर ...

रस्त्यांलगत नाल्यांचे बांधकाम अपूर्ण : पावसाळ्यात लोकवस्तींना धोका

आमगाव : राष्ट्रीय राज्य महामार्ग क्र. ५४३ व ३६३ वर सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे, मात्र हे काम संथ गतीने सुरू आहे. रस्त्यांलगत नाल्यांचे अपूर्ण बांधकाम पावसाळ्यात लोकवस्तीकरिता धोक्याची घंटा ठरत आहे. हे काम करणाऱ्या कंपनीने या बांधकामाचे बारा वाजवून ठेवले आहे. संपूर्ण बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून, याबाबत या बांधकामावर नियंत्रण असणारा विभाग निद्रावस्थेत दिसतो. त्यामुळे संपूर्ण बांधकाम रखडले असून, रस्त्यांलगत नाल्यांचे बांधकामही रखडले आहे.

राष्ट्रीय राज्यमार्ग क्रमांक ५४३ चे देवरी ते आमगावपर्यंतचे बांधकाम मागील ४ वर्षांपासून सुरू आहे. या बांधकामाचे कंत्राट पटेल कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. परंतु बांधकाम करण्यासाठी ही कंपनी बनवाबनवी करीत आहे. कंपनीने बांधकाम पूर्ण करण्यासाठी स्वत:ची कार्यक्षमता नसल्याने आता हे बांधकाम करण्यासाठी पेटी कान्ट्रॅक्ट ठरवून अनेक कंत्राटदारांना दिले आहे.. महामार्ग बांधकाम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारांना टप्प्यात विक्री करून बांधकाम करण्यात येत आहे. त्यामुळे हे बांधकाम संथ गतीने व निकृष्ट दर्जाचे होत असल्याची ओरड आहे..

बांधकाम संथ गतीने सुरू असल्यामुळे राज्य महामार्गावरील वाहतूक व्यवस्था प्रभावित झाली आहे. त्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहे. बांधकाम सुरू असलेल्या महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. बांधकाम सुरू असताना उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, श्वसनाचे आजार फोफावला आहेत. परंतु संबंधित कंत्राटदार उडणाऱ्या धुळीवर पाणी मारण्यासही हयगय करीत आहे.

राष्ट्रीय राज्यमार्ग ३६३ वर शिवालय कन्स्ट्रक्शन कंपनीकडून सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम आमगाव रेल्वेस्थानक ते लांजी महामार्गपर्यंतचे आहे. या कंपनीने स्थानिक कंत्राटदारांना टप्प्याटप्प्याने बांधकाम पेटी स्वरूपात विक्री करून बांधकाम सुरू केले आहे. त्यामुळे रस्ते बांधकामावरील शाश्वती पणाला लागली आहे. रस्ते बांधकामात अनियमितता सुरू असून, कामांचा दर्जा खालावला असल्याचे दिसून येत आहे.

महामार्गावरील रस्ते बांधकाम कंत्राटदाराला उघडे पाडत असून, यातील दर्जा किती निकृष्ट आहे याची प्रचिती समोर येत आहे.

राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील रस्ते आणि नाली बांधकाम करताना अनेक ठिकाणी नाली व रस्ते जोडणाऱ्या पुलाचे बांधकाम होताच तुटून पडले आहे. या महामार्गावरील रस्ते व नाल्याचे बांधकाम संथ गतीने सुरू आहे. हे अपूर्ण बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी कंपनीने पावले उचलणे आवश्यक असताना बांधकामात दिरंगाई आढळून येत आहे. त्यामुळे नाल्यांमधून पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी परिसरातील लोकवस्तीत शिरून मोठे नुकसान होण्याची भीती आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन बांधकामाची चौकशी करावी व बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.