शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग बांधकाम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:23 IST

रस्त्यांलगत नाल्यांचे बांधकाम अपूर्ण : पावसाळ्यात लोकवस्तींना धोका आमगाव : राष्ट्रीय राज्य महामार्ग क्र. ५४३ व ३६३ वर ...

रस्त्यांलगत नाल्यांचे बांधकाम अपूर्ण : पावसाळ्यात लोकवस्तींना धोका

आमगाव : राष्ट्रीय राज्य महामार्ग क्र. ५४३ व ३६३ वर सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे, मात्र हे काम संथ गतीने सुरू आहे. रस्त्यांलगत नाल्यांचे अपूर्ण बांधकाम पावसाळ्यात लोकवस्तीकरिता धोक्याची घंटा ठरत आहे. हे काम करणाऱ्या कंपनीने या बांधकामाचे बारा वाजवून ठेवले आहे. संपूर्ण बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून, याबाबत या बांधकामावर नियंत्रण असणारा विभाग निद्रावस्थेत दिसतो. त्यामुळे संपूर्ण बांधकाम रखडले असून, रस्त्यांलगत नाल्यांचे बांधकामही रखडले आहे.

राष्ट्रीय राज्यमार्ग क्रमांक ५४३ चे देवरी ते आमगावपर्यंतचे बांधकाम मागील ४ वर्षांपासून सुरू आहे. या बांधकामाचे कंत्राट पटेल कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. परंतु बांधकाम करण्यासाठी ही कंपनी बनवाबनवी करीत आहे. कंपनीने बांधकाम पूर्ण करण्यासाठी स्वत:ची कार्यक्षमता नसल्याने आता हे बांधकाम करण्यासाठी पेटी कान्ट्रॅक्ट ठरवून अनेक कंत्राटदारांना दिले आहे.. महामार्ग बांधकाम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारांना टप्प्यात विक्री करून बांधकाम करण्यात येत आहे. त्यामुळे हे बांधकाम संथ गतीने व निकृष्ट दर्जाचे होत असल्याची ओरड आहे..

बांधकाम संथ गतीने सुरू असल्यामुळे राज्य महामार्गावरील वाहतूक व्यवस्था प्रभावित झाली आहे. त्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहे. बांधकाम सुरू असलेल्या महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. बांधकाम सुरू असताना उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, श्वसनाचे आजार फोफावला आहेत. परंतु संबंधित कंत्राटदार उडणाऱ्या धुळीवर पाणी मारण्यासही हयगय करीत आहे.

राष्ट्रीय राज्यमार्ग ३६३ वर शिवालय कन्स्ट्रक्शन कंपनीकडून सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम आमगाव रेल्वेस्थानक ते लांजी महामार्गपर्यंतचे आहे. या कंपनीने स्थानिक कंत्राटदारांना टप्प्याटप्प्याने बांधकाम पेटी स्वरूपात विक्री करून बांधकाम सुरू केले आहे. त्यामुळे रस्ते बांधकामावरील शाश्वती पणाला लागली आहे. रस्ते बांधकामात अनियमितता सुरू असून, कामांचा दर्जा खालावला असल्याचे दिसून येत आहे.

महामार्गावरील रस्ते बांधकाम कंत्राटदाराला उघडे पाडत असून, यातील दर्जा किती निकृष्ट आहे याची प्रचिती समोर येत आहे.

राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील रस्ते आणि नाली बांधकाम करताना अनेक ठिकाणी नाली व रस्ते जोडणाऱ्या पुलाचे बांधकाम होताच तुटून पडले आहे. या महामार्गावरील रस्ते व नाल्याचे बांधकाम संथ गतीने सुरू आहे. हे अपूर्ण बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी कंपनीने पावले उचलणे आवश्यक असताना बांधकामात दिरंगाई आढळून येत आहे. त्यामुळे नाल्यांमधून पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी परिसरातील लोकवस्तीत शिरून मोठे नुकसान होण्याची भीती आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन बांधकामाची चौकशी करावी व बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.