शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया खंडात नव्या युद्धाचे संकेत ! तैवानच्या एअरस्पेसमध्ये २१ चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी
2
कर्तव्यदक्ष महिला अधिकारी सोनाली मिश्रा सांभाळणार रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालकपद
3
गुडन्यूज! कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म; सिद्धार्थ मल्होत्रा झाला 'नन्हीं परी'चा बाबा
4
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
5
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
6
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
7
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
8
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
9
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
10
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
11
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
12
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
13
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

अरे ! कवठा पोलीस आलाय...

By admin | Updated: December 17, 2015 01:51 IST

लहान बालके हे खूप हट्टीपणा बाळगतात. शाळेत न जाणे, शिव्या देणे, नेहमी खेळणे, आई-वडील किंवा घरच्या मंडळीची न ऐकणे किंवा ...

पूर्व विदर्भातील हजार मुले सुधारली : ३० वर्षांपासून बालके सुधारण्याचा व्रतमुन्ना नंदागवळी  बाराभाटीलहान बालके हे खूप हट्टीपणा बाळगतात. शाळेत न जाणे, शिव्या देणे, नेहमी खेळणे, आई-वडील किंवा घरच्या मंडळीची न ऐकणे किंवा अभ्यासाबद्दल असणारा दुरावा अशा अनेक कारणांमुळे पालकवर्ग त्रासून जातो. तेव्हा या बालकांवर एकच रामबाण उपाय असतो, तो म्हणजे कवठा पोलीस. या कवठा पोलिसाने मुलांच्या मनात घर केला आहे. अनेक बालके कवठा पोलीस आलाय म्हणून सगळीकडे चर्चा करतात.कवठा पोलीस या नावाने ओळखला जाणारा व्यक्ती म्हणजे हरिचंद ढाडू मेश्राम (४९). ते कवठ्याचे रहिवासी असून त्यांचे शिक्षण पाचवीपर्यंत झाले आहे. हरिचंद मेश्राम यांनी बालके सुधारण्याचा व्रत ३० वर्षांपूर्वीच घेतला असून त्याबाबत त्यांचे कार्य सुरू आहे. ते नेहमी सभ्यपणाने वागतात व पोलिसांच्या गणवेशात असतात. म्हणून बालकांपासून तर पालकांपर्यंत या हरिचंद्रला सगळीकडे कवठा पोलीस असेच संबोधिले जाते व त्यामुळेच हे नाव पडले. आतापर्यंत एक हजारापेक्षा अधिक मुले त्यांनी सुधारली आहेत. संपूर्ण पूर्व विदर्भाला भ्रमण केल्याचेही ते सांगतात. स्वत:च्या जीवनाचा कुठलाही विचार न करता त्यांनी स्वत:ला समाजसेवेत झोकून घेतले. त्यांनी मुले-मुली सुधारण्याचे कार्य हाती घेतले आहे.हरिचंद्र मेश्राम ढिवर जातीचे असले तरी मात्र फुले-शाहू-आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांनी प्रभावित आहेत. त्यांच्या विचारधारेने जसा समाज घडत गेला, तसेच बालके सुधारून घडवित आहेत. पूर्व विदर्भातील संपूर्ण जिल्हे या हरिचंदने अख्खा प्रवास फक्त सायकलने करून त्या परिसरातील, त्या गावातील मुलांना वळणावर आणले. मेश्राम यांचा रुबाबसुद्धा पोलिसासारखा दिसतो. म्हणून मुले पाहता क्षणीच कवठा पोलीस आलाय, असे म्हणत पळत सुटतात. असा न्यारा हरिचंद मेश्राम यांचा बाना आहे.अनेक बालके दुरूस्त करुन मिळेल ती रोजी कमवून जगण्याच्या उंबरठ्यावर हिंमतीने बालके सुधारण्याचा व्रत ते पूर्ण करीत आहेत. या समाजसुधारकाचे संपूर्ण जीवन म्हणजे वयाच्या २० वर्षांपासून ते सदर काम करीत आहेत. तरीसुद्धा स्वत: संसाराच्या कल्पनेने भारावून जात नाही, याचीच खरी दाद द्यावी लागेल. पाठीमागे कुणी नाही, कुणाचा आधार नाही, तरी मात्र हिंमत त्यांनी अजिबात सोडली नाही. अशा या समाजसुधारक मानसाला उदंड आयुष्य लाभो, असेच वाटते. कवठा पोलीस ऊर्फ हरिचंद मेश्राम यांनी आपल्या जीवनातील आतापर्यंतच्या अनेक दु:ख-सुखातील घडामोडींचे अनुभव लोकमतशी बोलताना सांगितले.