शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र
2
इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...
3
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
4
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
5
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
6
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
7
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
8
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
9
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
10
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
12
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
13
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
14
Happy Teachers Day 2025: शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
15
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
16
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
17
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
18
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
20
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

अरे ! कवठा पोलीस आलाय...

By admin | Updated: December 17, 2015 01:51 IST

लहान बालके हे खूप हट्टीपणा बाळगतात. शाळेत न जाणे, शिव्या देणे, नेहमी खेळणे, आई-वडील किंवा घरच्या मंडळीची न ऐकणे किंवा ...

पूर्व विदर्भातील हजार मुले सुधारली : ३० वर्षांपासून बालके सुधारण्याचा व्रतमुन्ना नंदागवळी  बाराभाटीलहान बालके हे खूप हट्टीपणा बाळगतात. शाळेत न जाणे, शिव्या देणे, नेहमी खेळणे, आई-वडील किंवा घरच्या मंडळीची न ऐकणे किंवा अभ्यासाबद्दल असणारा दुरावा अशा अनेक कारणांमुळे पालकवर्ग त्रासून जातो. तेव्हा या बालकांवर एकच रामबाण उपाय असतो, तो म्हणजे कवठा पोलीस. या कवठा पोलिसाने मुलांच्या मनात घर केला आहे. अनेक बालके कवठा पोलीस आलाय म्हणून सगळीकडे चर्चा करतात.कवठा पोलीस या नावाने ओळखला जाणारा व्यक्ती म्हणजे हरिचंद ढाडू मेश्राम (४९). ते कवठ्याचे रहिवासी असून त्यांचे शिक्षण पाचवीपर्यंत झाले आहे. हरिचंद मेश्राम यांनी बालके सुधारण्याचा व्रत ३० वर्षांपूर्वीच घेतला असून त्याबाबत त्यांचे कार्य सुरू आहे. ते नेहमी सभ्यपणाने वागतात व पोलिसांच्या गणवेशात असतात. म्हणून बालकांपासून तर पालकांपर्यंत या हरिचंद्रला सगळीकडे कवठा पोलीस असेच संबोधिले जाते व त्यामुळेच हे नाव पडले. आतापर्यंत एक हजारापेक्षा अधिक मुले त्यांनी सुधारली आहेत. संपूर्ण पूर्व विदर्भाला भ्रमण केल्याचेही ते सांगतात. स्वत:च्या जीवनाचा कुठलाही विचार न करता त्यांनी स्वत:ला समाजसेवेत झोकून घेतले. त्यांनी मुले-मुली सुधारण्याचे कार्य हाती घेतले आहे.हरिचंद्र मेश्राम ढिवर जातीचे असले तरी मात्र फुले-शाहू-आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांनी प्रभावित आहेत. त्यांच्या विचारधारेने जसा समाज घडत गेला, तसेच बालके सुधारून घडवित आहेत. पूर्व विदर्भातील संपूर्ण जिल्हे या हरिचंदने अख्खा प्रवास फक्त सायकलने करून त्या परिसरातील, त्या गावातील मुलांना वळणावर आणले. मेश्राम यांचा रुबाबसुद्धा पोलिसासारखा दिसतो. म्हणून मुले पाहता क्षणीच कवठा पोलीस आलाय, असे म्हणत पळत सुटतात. असा न्यारा हरिचंद मेश्राम यांचा बाना आहे.अनेक बालके दुरूस्त करुन मिळेल ती रोजी कमवून जगण्याच्या उंबरठ्यावर हिंमतीने बालके सुधारण्याचा व्रत ते पूर्ण करीत आहेत. या समाजसुधारकाचे संपूर्ण जीवन म्हणजे वयाच्या २० वर्षांपासून ते सदर काम करीत आहेत. तरीसुद्धा स्वत: संसाराच्या कल्पनेने भारावून जात नाही, याचीच खरी दाद द्यावी लागेल. पाठीमागे कुणी नाही, कुणाचा आधार नाही, तरी मात्र हिंमत त्यांनी अजिबात सोडली नाही. अशा या समाजसुधारक मानसाला उदंड आयुष्य लाभो, असेच वाटते. कवठा पोलीस ऊर्फ हरिचंद मेश्राम यांनी आपल्या जीवनातील आतापर्यंतच्या अनेक दु:ख-सुखातील घडामोडींचे अनुभव लोकमतशी बोलताना सांगितले.