शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2017 01:21 IST

आमगाव तालुक्याच्या कातुुर्ली येथे एका तरुण दाम्पत्यात झालेल्या भांडणात पतीने पत्नीेचा गळा आवळून खून केला.

गोंदिया : आमगाव तालुक्याच्या कातुुर्ली येथे एका तरुण दाम्पत्यात झालेल्या भांडणात पतीने पत्नीेचा गळा आवळून खून केला. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी (दि.२१) पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. राजकुमार भुरेलाल चौधरी (३०) रा. कातुर्ली असे आरोपीचे नाव आहे. त्याने पत्नी भूमेश्वरी उर्फ रंजिता राजकुमार चौधरी (२७) हिचा ६ मे २०११ च्या रात्री गळा दाबून खून केला होता. भूमेश्वरीची प्रकृती बरी नसल्याने तिने उपचारासाठी औषधी आणण्यास नवऱ्याला म्हटले असता त्या दोघांचा वाद झाला. यात त्याने तिचा गळा दाबून खून केला. आमगाव पोलिसांनी त्याच्याविरूद्ध भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला होता. आमगाव येथील सहायक पोलीस निरीक्षक विश्वासराव पाटील यांनी प्रकरणाचा तपास केला होता. सरकारी वकील म्हणून सुरूवातीला अ‍ॅड.कैलाश खंडेलवाल व नंतर कृष्णा पारधी यांनी काम पाहिले. प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश आणेकर यांनी याप्रकरणी आरोपीला जन्मठेप व १ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस निरीक्षक जयराज रनवरे यांच्या देखरेखीखाली सीएमएस सेलचे सहायक फौजदार राजकुमार कराडे व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. रंजिताचे वडील गोमाजी येळे रा. नोनीटोला यांना अखेर न्याय मिळाला. (तालुका प्रतिनिधी)