शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

दमदार पावसाने शेतकरी सुखावला

By admin | Updated: August 28, 2016 01:02 IST

मागील दोन दिवसांपासून बरसत असलेल्या दमदार पावसाने शेतकरी सुखावला असून या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे

पिकांना मिळाले जीवदान : १३४.८ मीमी. पावसाची नोंदगोंदिया : मागील दोन दिवसांपासून बरसत असलेल्या दमदार पावसाने शेतकरी सुखावला असून या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. मध्यंतरी पावसाने दडी मारून शेतकऱ्यांना चिंताग्रस्त करून सोडले होते. मात्र परतून आलेल्या या पावसाने सर्वांनाचा खुश करून टाकले. असे असतानाही जिल्ह्याची तहान अद्याप भागलेली नाही. यंदाचा पावसाळा नेहमीप्रमाणे हुलकावणी देणाराच ठरला. आता पावसाळा संपण्याची वेळ आली असतानाही जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडलेला नाही. परिणामी नदी,नाले व तलाव अद्याप कोरडे ठणठणाट दिसून येत आहेत. याचा परिणाम सामान्य जनजीवनावर पडत असतानाच शेतीसाठी मात्र शाप ठरत आहे. पावसाने ऐनवेळी दडी मारल्याने निर्माण झालेल्या उष्ण दमट वातावरणामुळे एकतर आजार फोफावले. त्यासोबतच पिकांवर रोगराई सुद्धा बळावली. रबीच्या हंगाम हातून गेल्याने शेतकरी खरिपापासून आस बांधून होता. मात्र पावसाच्या खेळीने त्यांच्या या स्वप्नावरही गाज पडली. पावसाच्या खेळीने शेतकरी हताश होऊन बसला होता. मात्र मागील दोन दिवसांच्या पावसाने शेतकरी पुन्हा आशा बाळगू लागला आहे. या पावसाने जिल्ह्यात सर्वत्र हजेरी लावली असून जिल्हा ओलाचिंब झाला आहे. विशेष म्हणजे शुक्रवारच्या पावसाने सडक-अर्जुनी तालुक्यात झोपडले असतानाच अन्यत्र तुरळक हजेरी लावली दिसल्याचे कळले. मात्र मागील दोन दिवसांपासून परतून आलेल्या वरूणराजाच्या दमदार एंट्रीने सर्वांनाच खुश करून टाकले आहे. एकीकडे उकळत्या वातावरणापासून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला. तर दुसरीकडे या पावसामुळे पिकांनाही जीवदान मिळाले. पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकरी सुखावला असून त्याच्या चेहऱ्यावर हसू आले आहे. (शहर प्रतिनिधी)आणखी पावसाची गरजजिल्ह्यात आतापर्यंत ६६६८.२ मीमी. पाऊस बरसला असून त्याची सरासरी ८३३.५ एवढी आहे. तर शुक्रवारी जिल्ह्यात १३४.८ मीमी. पावसाची नोंद घेण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्यात सर्वाधीक ८१.० मीमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. मात्र आजही जिल्ह्यातील नदी,नाले व तलाव कोरडेच आहेत. पावसाळा आता संपण्याची वेळ आली असतानाही ही स्थिती असल्याने उर्वरीत काळात काय होणार असा सवाल भेडसावत आहे. करिता जिल्ह्याला आणखी पावसाची गरज आहे.