शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
4
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
5
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
6
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
7
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
8
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
9
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
10
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
11
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
12
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
13
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
14
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
15
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
16
Gold Rate Today 15 May: एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
17
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
18
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
19
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
20
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं

दमदार पावसाने शेतकरी सुखावला

By admin | Updated: August 28, 2016 01:02 IST

मागील दोन दिवसांपासून बरसत असलेल्या दमदार पावसाने शेतकरी सुखावला असून या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे

पिकांना मिळाले जीवदान : १३४.८ मीमी. पावसाची नोंदगोंदिया : मागील दोन दिवसांपासून बरसत असलेल्या दमदार पावसाने शेतकरी सुखावला असून या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. मध्यंतरी पावसाने दडी मारून शेतकऱ्यांना चिंताग्रस्त करून सोडले होते. मात्र परतून आलेल्या या पावसाने सर्वांनाचा खुश करून टाकले. असे असतानाही जिल्ह्याची तहान अद्याप भागलेली नाही. यंदाचा पावसाळा नेहमीप्रमाणे हुलकावणी देणाराच ठरला. आता पावसाळा संपण्याची वेळ आली असतानाही जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडलेला नाही. परिणामी नदी,नाले व तलाव अद्याप कोरडे ठणठणाट दिसून येत आहेत. याचा परिणाम सामान्य जनजीवनावर पडत असतानाच शेतीसाठी मात्र शाप ठरत आहे. पावसाने ऐनवेळी दडी मारल्याने निर्माण झालेल्या उष्ण दमट वातावरणामुळे एकतर आजार फोफावले. त्यासोबतच पिकांवर रोगराई सुद्धा बळावली. रबीच्या हंगाम हातून गेल्याने शेतकरी खरिपापासून आस बांधून होता. मात्र पावसाच्या खेळीने त्यांच्या या स्वप्नावरही गाज पडली. पावसाच्या खेळीने शेतकरी हताश होऊन बसला होता. मात्र मागील दोन दिवसांच्या पावसाने शेतकरी पुन्हा आशा बाळगू लागला आहे. या पावसाने जिल्ह्यात सर्वत्र हजेरी लावली असून जिल्हा ओलाचिंब झाला आहे. विशेष म्हणजे शुक्रवारच्या पावसाने सडक-अर्जुनी तालुक्यात झोपडले असतानाच अन्यत्र तुरळक हजेरी लावली दिसल्याचे कळले. मात्र मागील दोन दिवसांपासून परतून आलेल्या वरूणराजाच्या दमदार एंट्रीने सर्वांनाच खुश करून टाकले आहे. एकीकडे उकळत्या वातावरणापासून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला. तर दुसरीकडे या पावसामुळे पिकांनाही जीवदान मिळाले. पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकरी सुखावला असून त्याच्या चेहऱ्यावर हसू आले आहे. (शहर प्रतिनिधी)आणखी पावसाची गरजजिल्ह्यात आतापर्यंत ६६६८.२ मीमी. पाऊस बरसला असून त्याची सरासरी ८३३.५ एवढी आहे. तर शुक्रवारी जिल्ह्यात १३४.८ मीमी. पावसाची नोंद घेण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्यात सर्वाधीक ८१.० मीमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. मात्र आजही जिल्ह्यातील नदी,नाले व तलाव कोरडेच आहेत. पावसाळा आता संपण्याची वेळ आली असतानाही ही स्थिती असल्याने उर्वरीत काळात काय होणार असा सवाल भेडसावत आहे. करिता जिल्ह्याला आणखी पावसाची गरज आहे.