शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दमदार पावसाने शेतकरी सुखावला

By admin | Updated: August 28, 2016 01:02 IST

मागील दोन दिवसांपासून बरसत असलेल्या दमदार पावसाने शेतकरी सुखावला असून या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे

पिकांना मिळाले जीवदान : १३४.८ मीमी. पावसाची नोंदगोंदिया : मागील दोन दिवसांपासून बरसत असलेल्या दमदार पावसाने शेतकरी सुखावला असून या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. मध्यंतरी पावसाने दडी मारून शेतकऱ्यांना चिंताग्रस्त करून सोडले होते. मात्र परतून आलेल्या या पावसाने सर्वांनाचा खुश करून टाकले. असे असतानाही जिल्ह्याची तहान अद्याप भागलेली नाही. यंदाचा पावसाळा नेहमीप्रमाणे हुलकावणी देणाराच ठरला. आता पावसाळा संपण्याची वेळ आली असतानाही जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडलेला नाही. परिणामी नदी,नाले व तलाव अद्याप कोरडे ठणठणाट दिसून येत आहेत. याचा परिणाम सामान्य जनजीवनावर पडत असतानाच शेतीसाठी मात्र शाप ठरत आहे. पावसाने ऐनवेळी दडी मारल्याने निर्माण झालेल्या उष्ण दमट वातावरणामुळे एकतर आजार फोफावले. त्यासोबतच पिकांवर रोगराई सुद्धा बळावली. रबीच्या हंगाम हातून गेल्याने शेतकरी खरिपापासून आस बांधून होता. मात्र पावसाच्या खेळीने त्यांच्या या स्वप्नावरही गाज पडली. पावसाच्या खेळीने शेतकरी हताश होऊन बसला होता. मात्र मागील दोन दिवसांच्या पावसाने शेतकरी पुन्हा आशा बाळगू लागला आहे. या पावसाने जिल्ह्यात सर्वत्र हजेरी लावली असून जिल्हा ओलाचिंब झाला आहे. विशेष म्हणजे शुक्रवारच्या पावसाने सडक-अर्जुनी तालुक्यात झोपडले असतानाच अन्यत्र तुरळक हजेरी लावली दिसल्याचे कळले. मात्र मागील दोन दिवसांपासून परतून आलेल्या वरूणराजाच्या दमदार एंट्रीने सर्वांनाच खुश करून टाकले आहे. एकीकडे उकळत्या वातावरणापासून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला. तर दुसरीकडे या पावसामुळे पिकांनाही जीवदान मिळाले. पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकरी सुखावला असून त्याच्या चेहऱ्यावर हसू आले आहे. (शहर प्रतिनिधी)आणखी पावसाची गरजजिल्ह्यात आतापर्यंत ६६६८.२ मीमी. पाऊस बरसला असून त्याची सरासरी ८३३.५ एवढी आहे. तर शुक्रवारी जिल्ह्यात १३४.८ मीमी. पावसाची नोंद घेण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्यात सर्वाधीक ८१.० मीमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. मात्र आजही जिल्ह्यातील नदी,नाले व तलाव कोरडेच आहेत. पावसाळा आता संपण्याची वेळ आली असतानाही ही स्थिती असल्याने उर्वरीत काळात काय होणार असा सवाल भेडसावत आहे. करिता जिल्ह्याला आणखी पावसाची गरज आहे.