शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

रेतीच्या जड वाहनांनी रस्त्यांची लावली वाट

By admin | Updated: February 19, 2017 00:14 IST

जवळच असलेल्या वैनगंगा नदीच्या घाटावरुन बिरोली या रेतीघाटांचा लिलाव महसूल विभाग तिरोडा यांनी केला आहे.

ओव्हरलोड वाहतूक : संबंधित विभागाकडून डोळेझाक मुंडीकोटा : जवळच असलेल्या वैनगंगा नदीच्या घाटावरुन बिरोली या रेतीघाटांचा लिलाव महसूल विभाग तिरोडा यांनी केला आहे. पण रेती वाहतुकीसाठी रस्त्यांचे काय? असा प्रश्न गावकऱ्यांसमोर उभा आहे. गतवर्षी घाटकुरोडा रेतीघाटाचा लिलाव करण्यात आला, पण यावेळी तो घाट बंद आहे. त्यामुळे बिरोली या नवीन घाटाचा लिलाव करण्यात आला. बिरोली रेतीघाटावरुन रेती भरलेले ट्रक चांदोरी रस्त्याने धावत असतात. चांदोरी या रस्त्यावर एक नाला आहे. त्या नाल्यावर या ठेकेदाराने कच्चा पूल तयार केलेला दिसत आहे. ते रेती भरलेले ट्रक कच्च्या पूलवरुन निघून मुंडीकोटा रेल्वे गेटवरुन सरळ मारबतधोंडी या रस्त्यांने निघून संतोषी माता मंदिर नवेगाव या राष्ट्रीय महामार्गाला हा रस्ता जोडला आहे. त्यामुळे हे रेतीचे ट्रक सरळ नागपूर ते गोंदियाकडे धावत असतात. घाटकुरोडा, घोगरा हे रस्ते जीर्ण झाल्यामुळे या ठेकेदारांनी नवीनच रस्ता शोधला आहे. पण नवीन रस्ता जीर्ण होण्याच्या मार्गावर दिसत आहे. या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. तसेच गिट्टी व मुरुम उखडून बाहेर निघालेला दिसत आहे. त्यामुळे हा रस्ता अपघाताला आमंत्रण देत आहे. मुंडीकोटा रेल्वे गेटवरुन प्रवासी मुंडीकोटा रेल्वे स्टेशन तसेच शाळकरी विद्यार्थी याच रस्त्याने महाविद्यालयात ये-जा करीत असतात. तसेच घोगरा, घाटकुरोडा, पाटीलटोला या गावातील नागरिक मुंडीकोटा या गावी केंद्राचे ठिकाण असल्यामुळे देवाण-घेवाण, प्राथमिक आरोग्य केंद्र, बँक व बाजाराला येत असतात. त्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागतो. रेती भरलेल्या ट्रकची एकेरी वाहतूक असल्यामुळे अनेकांना रस्त्याच्या कडेला वेळ घालवत रहावे लागते. मुंडीकोटा रेल्वे चौकीजवळ लागूनच ४०० ते ५०० मांग गारुडी लोकांची वसाहत आहे. या रस्त्याच्या कडेला त्यांची घरे आहेत. त्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. रेती भरलेल्या ट्रकवर पाल अथवा ताडपत्री राहात नाही. त्यामुळे रेती उडून अनेकांच्या डोळ्यात शिरत असते. त्यामुळे डोळ्यांचा त्रास वाढलेला दिसत आहे. रेती जेसीबी मशीनद्वारे ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त भरली जाते. त्यामुळे रस्ते जीर्ण होत आहे. याकडे कुणाचेही लक्ष नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष घालून या रस्त्यांची दयनीय अवस्था दूर करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.(वार्ताहर)