शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

स्वच्छतेतून आरोग्याचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 21:49 IST

बरबसपुरा येथे सरपंच ममता लिचडे व नवनिर्वाचित सरपंच नरेश असाटी यांच्या विनंतीवरुन अदानी फाऊंडेशनने गावात स्वच्छता अभियान राबविले.

ठळक मुद्देबरबसपुरा येथे स्वच्छता अभियान : ग्रामपंचायत व अदानी फाऊंडेशनचा संयुक्त उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्ककाचेवानी : बरबसपुरा येथे सरपंच ममता लिचडे व नवनिर्वाचित सरपंच नरेश असाटी यांच्या विनंतीवरुन अदानी फाऊंडेशनने गावात स्वच्छता अभियान राबविले. स्वच्छता अभियानात गावकºयांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून आरोग्याचा संदेश दिला.संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गत अदानी फाऊंडेशन आणि ग्रा.पं.च्यावतीने राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानप्रसंगी अहमदाबादच्या अदानी पॉवरच्या मुख्य कार्यालयातील रॉयचौधरी, अदानी प्रकल्प प्रमुख सी.पी. शाहू, अदानी फाऊंडेशनचे नितीन शिवणकर, प्रसाद यांच्यासह ३० ते ४० अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. सरपंच ममता लिचडे, सदस्य व नवनिर्वाचित सरपंच नरेश असाटी, ममता पटले, उषा पटले, रत्नमाला शेंदरे, वीणा कटरे, प्रमिला कोसरे, रितेश पंधरे, गोपाल नेवारे, अंगणवाडी सेविका रहांगडाले, प्रेरक डोंगरे व पारधी, शिक्षक बघेले तसेच विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.स्वच्छता अभियानासंबंधी साहित्य अदानी फाऊंडेशनने पुरविले. अदानीचे अधिकारी-कर्मचारी, ग्रा.पं. पदाधिकारी, शाळेतील मुले-मुली आणि गावाच्या काही महिला-पुरुषांनी झाडू हातात घेवून गावातील संपूर्ण रस्ते आणि चौक तसेच संपूर्ण गावातील परिसर स्वच्छ केला. स्वच्छता केल्यानंतर सर्वजण एकत्र गोळा झाले. उपस्थितांना अदानी पॉवरचे सी.पी. शाहू, नितीन शिरोळकर यांच्यासह काही मान्यवरांनी नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. स्वच्छतेमुळे ८० टक्के रोगांवर नियंत्रण मिळवू शकतो, असेही सांगण्यात आले.यावेळी तिरोडा पं.स.चे बीडीओ जादेव इनामदार यांनी याच दिवशी विलंबाने गावाला भेट दिली. त्यांना स्वच्छता अभियान राबवित असल्याची माहिती नव्हती. नंतर माहिती झाल्यावर ग्रामपंचायतमध्ये उपस्थिती दर्शवून माहिती जाणून घेतली. या वेळी सरपंच ममता लिचडे, सदस्य व नवनिर्वाचित सरपंच नरेश असाटी तसेच सदस्य उषा पटले, प्रमिला कोसरे, रत्नमाला शेंदरे उपस्थित होत्या. जावेद इनामदार यांनी गावाच्या विकासासंबंधी चर्चा करुन समाधान व्यक्त केले. गावाला शिक्षित व अनुभवी सरपंच लाभल्याबद्दल प्रशंसा केली. तसेच अदानी प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्येकवेळी सहकार्य करण्याचे आश्वासन नवनिर्वाचित सरपंच नरेश असाटी यांना दिले.रॉय चौधरीसोबत सरपंचाची चर्चाअहमदाबाद येथील कार्यालयाचे अधिकारी रॉय चौधरी यांच्याशी सरपंच ममता लिचडे आणि नवनिर्वाचित सरपंच नरेश असाटी यांनी गाव व अदानीच्या सहकार्यासंबंधी चर्चा केली. गावाला लागणाºया गरजांची पूर्ती अदानी पॉवरने करावी. यावेळी गावात विविध विकासात्मक कामे करण्यासंदर्भात अदानी प्रकल्पाच्या अधिकाºयांसह चर्चा करण्यात आली. यात सकारात्मक चर्चा झाली.गावाला पाणी शुद्धीकरण यंत्र देणारबरबसपुरा येथील नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे याकरिता अदानी फाऊंडेशन लवकरच आरोची सुविधा करुन देईल, असे अदानी फाऊंडेशनने स्पष्ट केले. मात्र त्यासाठी लागणाºया खोलीची व्यवस्था नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे ग्रा.पं. पदाधिकारी आणि नागरिकांनी यावर तोडगा काढण्याची मागणी केली.आरओचा योग्य उपयोग होणार का?गावात अदानीने आरोची व्यवस्था करुन दिली तरी त्याकरिता लागणारी स्वतंत्र इमारत नाही. विद्युत खर्च व इतर साहित्य पुरविण्याची व्यवस्था नाही. अर्थात ग्रा.पं. ला खर्चिक स्वरुपाची योजना आहे. गावातील नागरिक परिस्थितीने साधन नसले तरी सर्वांच्या घरी फिल्टर आहेत. नसले तरी त्यांना पाणी खरेदी करुन घेण्याची पाळी येत नसल्याने आरोचा योग्य उपयोग होणार का असा सवाल उपस्थित केला.