शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएल टॉवरमुळे परिसरात डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 21:52 IST

ग्राम नवेझरी येथील बीएसएनएल सेवा ठप्प पडली असून मोबाईलमध्ये टॉवर राहत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि व्यापारी हैराण झाले आहेत. बीएसएनएलने त्वरित सेवा दुरुस्त करावी अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन केले जाईल असा इशारा, शेतकरी, शेतमजूर तथा तिरोडा तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी दिला आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागातील व्यवहार ठप्प : आंदोलनाचा नागरिकांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कगुलाबटोला : ग्राम नवेझरी येथील बीएसएनएल सेवा ठप्प पडली असून मोबाईलमध्ये टॉवर राहत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि व्यापारी हैराण झाले आहेत. बीएसएनएलने त्वरित सेवा दुरुस्त करावी अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन केले जाईल असा इशारा, शेतकरी, शेतमजूर तथा तिरोडा तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी दिला आहे.ग्रामीण भागामध्ये शासनाच्या मोबाईल सेवेचा अधिक लाभ घ्यावा म्हणून भारत दूरसंचार निगमने शेतकऱ्यांसाठी अ‍ॅग्रीकल्चर प्लान काढून मोठ्या प्रमाणात शेतकºयांना इंटरनेट सेवा उपलब्ध करुन देण्याचा गवगवा केला. परंतु पाहिजे त्या प्रमाणात सेवा मुळीच देत नाही. उलट भारत दूरसंचार सेवा ठप्प करुन खासगी मोबाईल कंपन्यांना मोबाईल रेंज पुरविण्याचा छुपा करार करुन ग्राहकांना हक्कापासून वंचित करण्याचे कारस्थान सुरु असल्याचे आरोप ग्राहक करीत आहेत. भारत दूरसंचार कंपनीने ग्रामीण भागात त्वरीत सेवा दुरुस्त करुन ग्राहकांची डोकेदुखी थांबवावी.अन्यथा ग्राहक रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा शेतकरी-शेतमजूर संघटनेचे व सरपंच संघटनेचे महेंद्र भांडारकर यांनी दिला आहे. यावर प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.सेवा नॉट रिचेबलगावकरी संतप्त : वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : गेल्या २४ जानेवारीपासून वीज बिलाचा भरणा भारत संचार निगम लिमिटेडच्या येथील ग्राहक सेवा केंद्राने न केल्यामुळे व जनरेटरचा डिझेल कोटा संपल्यामुळे बीएसएनएलची टेलीफोन, मोबाईल व इंटरनेट सेवा ठप्प पडली आहे. त्यामुळे मात्र ग्राहक, सरकारी कार्यालय व बँकाची फारच गैरसोय होत आहे.गेल्या २४ जानेवारी रोजी विज बीलाचा भरणा न केल्यामुळे महावितरणने बीएसएनएलच्या येथील ग्राहक सेवा केंद्राचा वीज पुरवठा बंद केला. त्यामुळे टेलीफोन (लॅन्डलाईन), मोबाईल व इंटरनेट सेवा ठप्प पडली आहे. डीजीटल इंडियाच्या गप्पा मारणाऱ्या शासनाच्या काळात वीज बिल भरण्यासाठी व जनरेटर चालविण्यासाठी निधी असू नये असा सवाल करुन रवी लंजे यांनी संताप व्यक्त केला आहे.सेवा ठप्प झाल्याने परिसरातील टेलीफोन धारक, मोबाईल व इंटरनेट सेवा वापरणारे ग्राहक, बॅँका व सरकारी कार्यालयांना याचा जबरदस्त फटका बसला आहे. बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देवून दुरसंचार सेवा त्वरित सुरु करण्याची मागणी नवेगावबांध ग्रामवासीयांनी केली आहे.

टॅग्स :BSNLबीएसएनएल