शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
विजय शाह यांना कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवले; काँग्रेस नेत्यांची निदर्शने; नेमप्लेटवर शाई फेकली
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
4
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
5
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
6
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
7
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
8
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
9
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
10
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
11
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
12
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
13
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
14
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
15
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
16
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
17
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
18
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
19
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
20
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे

बीएसएनएल टॉवरमुळे परिसरात डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 21:52 IST

ग्राम नवेझरी येथील बीएसएनएल सेवा ठप्प पडली असून मोबाईलमध्ये टॉवर राहत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि व्यापारी हैराण झाले आहेत. बीएसएनएलने त्वरित सेवा दुरुस्त करावी अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन केले जाईल असा इशारा, शेतकरी, शेतमजूर तथा तिरोडा तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी दिला आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागातील व्यवहार ठप्प : आंदोलनाचा नागरिकांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कगुलाबटोला : ग्राम नवेझरी येथील बीएसएनएल सेवा ठप्प पडली असून मोबाईलमध्ये टॉवर राहत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि व्यापारी हैराण झाले आहेत. बीएसएनएलने त्वरित सेवा दुरुस्त करावी अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन केले जाईल असा इशारा, शेतकरी, शेतमजूर तथा तिरोडा तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी दिला आहे.ग्रामीण भागामध्ये शासनाच्या मोबाईल सेवेचा अधिक लाभ घ्यावा म्हणून भारत दूरसंचार निगमने शेतकऱ्यांसाठी अ‍ॅग्रीकल्चर प्लान काढून मोठ्या प्रमाणात शेतकºयांना इंटरनेट सेवा उपलब्ध करुन देण्याचा गवगवा केला. परंतु पाहिजे त्या प्रमाणात सेवा मुळीच देत नाही. उलट भारत दूरसंचार सेवा ठप्प करुन खासगी मोबाईल कंपन्यांना मोबाईल रेंज पुरविण्याचा छुपा करार करुन ग्राहकांना हक्कापासून वंचित करण्याचे कारस्थान सुरु असल्याचे आरोप ग्राहक करीत आहेत. भारत दूरसंचार कंपनीने ग्रामीण भागात त्वरीत सेवा दुरुस्त करुन ग्राहकांची डोकेदुखी थांबवावी.अन्यथा ग्राहक रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा शेतकरी-शेतमजूर संघटनेचे व सरपंच संघटनेचे महेंद्र भांडारकर यांनी दिला आहे. यावर प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.सेवा नॉट रिचेबलगावकरी संतप्त : वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : गेल्या २४ जानेवारीपासून वीज बिलाचा भरणा भारत संचार निगम लिमिटेडच्या येथील ग्राहक सेवा केंद्राने न केल्यामुळे व जनरेटरचा डिझेल कोटा संपल्यामुळे बीएसएनएलची टेलीफोन, मोबाईल व इंटरनेट सेवा ठप्प पडली आहे. त्यामुळे मात्र ग्राहक, सरकारी कार्यालय व बँकाची फारच गैरसोय होत आहे.गेल्या २४ जानेवारी रोजी विज बीलाचा भरणा न केल्यामुळे महावितरणने बीएसएनएलच्या येथील ग्राहक सेवा केंद्राचा वीज पुरवठा बंद केला. त्यामुळे टेलीफोन (लॅन्डलाईन), मोबाईल व इंटरनेट सेवा ठप्प पडली आहे. डीजीटल इंडियाच्या गप्पा मारणाऱ्या शासनाच्या काळात वीज बिल भरण्यासाठी व जनरेटर चालविण्यासाठी निधी असू नये असा सवाल करुन रवी लंजे यांनी संताप व्यक्त केला आहे.सेवा ठप्प झाल्याने परिसरातील टेलीफोन धारक, मोबाईल व इंटरनेट सेवा वापरणारे ग्राहक, बॅँका व सरकारी कार्यालयांना याचा जबरदस्त फटका बसला आहे. बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देवून दुरसंचार सेवा त्वरित सुरु करण्याची मागणी नवेगावबांध ग्रामवासीयांनी केली आहे.

टॅग्स :BSNLबीएसएनएल