शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

मुख्याधिकारी रजेवर, विकासकामांना खीळ

By admin | Updated: March 26, 2017 00:51 IST

ऐन मार्च महिन्यात गावाच्या विकासाची कामे करण्याचा काळ असताना नगर पंचायतच्या मुख्याधिकारी रजेवर गेल्या.

न.पं.चा कारभार वाऱ्यांवर : पदाधिकारीही मूग गिळून गप्प अर्जुनी-मोरगाव : ऐन मार्च महिन्यात गावाच्या विकासाची कामे करण्याचा काळ असताना नगर पंचायतच्या मुख्याधिकारी रजेवर गेल्या. अखर्चित निधी परत जाण्याची वेळ आल्यामुळे विकासकामे तसेच नागरिकांची विविध कामे रखडली आहेत. प्रशासन मात्र निंद्रावस्थेत आहे. प्राप्त माहितीनुसार, येथील नगर पंचायतच्या मुख्याधिकारी किरण बगडे या १४ मार्चपासून रजेवर गेल्या आहेत. त्यांचे जागेवर अद्यापही कुणाचीच नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे विविध कामे रखडली आहेत. अखर्चित निधीचा वापर कसा होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ३१ मार्चपूर्वी स्थानिक बाजाराचा लिलाव करावयाचा आहे. नगर पंचायतचा अर्थसंकल्प सादर करण्याचे महत्त्वपूर्ण काम आहे. नगर पंचायतमध्ये दोन कोटी ७० लाख रुपये शिल्लक निधी आहे. नमुना आठची कामे रखडली आहेत. यापूर्वी झालेल्या ठरावांची अंमलबजावणी झाली नाही. मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत आणखी निधी येईल. मात्र नगर पंंचायत क्षेत्राचा विकास आराखडा तयार नाही. रमाई आवास योजनेचे प्रस्ताव समाज कल्याण विभागाकडे सादर झाले नाहीत. घर कर वसुलीची मोहीम अद्याप हाती घेण्यात आली नाही. या सर्व प्रकारांमुळे गावाचा विकास खुंटला आहे. मार्च महिन्याचा प्रारंभ नगराध्यक्षा विरुद्धचा अविश्वासात गेला. त्यानंतर विकासकामे होतील अशी अपेक्षा नगरवासीयांची होती. मात्र ती फोल ठरत आहे. त्यानंतर मुख्याधिकारी रजेवर गेले असताना प्रभारी मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती नाही. मुख्याधिकारीच नसल्याने नगर पंचायतचे पदाधिकारी सुद्धा मूग गिळून आहेत. (तालुका प्रतिनिधी)नगर पंचायत सत्तारुढ होऊन दीड वर्ष पूर्ण होत आहे. निवडणुकीपूर्वी नगराच्या विकासाची स्थिती जशी होती तशीच आहे. सुरुवातीला नायब तहसीलदारांकडे प्रभार होता. त्यानंतर नियमित मुख्याधिकारी आले. मात्र त्या नवीन असल्याने कामात व्यत्यय येत गेला. ऐन मार्च महिन्यात त्या रजेवर गेल्यामुळे अखर्चित निधी विकासकामासाठी कसा वापरायचा हा प्रश्न आहे. ही बाब जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींना सांगितली; मात्र याकडे गांभीर्याने बघितले जात नाही. प्रभारी मुख्याधिकारी देऊ अशी कोरडी आश्वासने दिली जातात. यामुळे विकास कामे होत नाही. अखर्चित निधी असल्याने शासन नवीन निधी कसा देणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.-पौर्णिमा शहारेनगराध्यक्ष