शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
2
‘लाडकी बहीण’मुळे निधी उशिरा, कामे होणार कशी? गुलाबी रंगात निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांचाच तक्रारीचा सूर
3
६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्नेहाचा मृतदेह सापडला; आई-वडिलांचा टाहो, मैत्रिणीचा मोठा दावा
4
Good Luck Cafe: बन मस्क्यामध्ये काचेचे तुकडे; एफ. सी. रोडवरील गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित
5
Accident: आंब्याने भरलेली लॉरी मिनी ट्रकवर उलटली; ९ जण ठार, अनेकजण जखमी!
6
गृहप्रवेशानंतर नववधू चक्कर येऊन पडली, पतीने थेट प्रेग्नन्सी टेस्ट किटच आणली! चिडलेल्या नवरीने काय केलं वाचाच... 
7
Pravin Gaikwad : 'माझ्या हत्येचा कट होता, याला पूर्णपणे सरकार जबाबदार'; प्रवीण गायकवाडांचा आरोप
8
स्मशानभूमीचे उद्घाटन न झाल्याने अंत्यविधीस परवानगी नाकारली; भरपावसात डिझेल ओतून पेटवली चिता
9
नवी मुंबई: बेलापूरमधील पारसिक टेकडीवर भूस्खलन; मातीच्या ढिगाऱ्यासह झाडे उन्मळून पडली
10
Anthem Biosciences IPO आजपासून गुंतवणुकीसाठी खुला; कधीपर्यंत आणि किती करावी लागेल गुंतवणूक, GMP किती?
11
मनसेचे २ दिवसीय शिबिर, ठाकरे बंधू युतीवर भूमिका ठरणार; राज ठाकरे काय देणार 'कानमंत्र'?
12
'ते गप्पा चांगल्या मारतात, पण रात्रीच्या अंधारात लोकांवर बॉम्ब टाकतात', ट्रम्प पुतीन यांच्यावर भडकले
13
अरे देवा! आई वारंवार भेंडीची भाजी बनवायची म्हणून लेक चिडला, १२०० किमी दूर पळून गेला अन्...
14
नोकरीसाठी डिग्री आणि सीव्हीची गरज नाही! थेट १ कोटी रुपयांचं पॅकेज, फक्त 'या' २ अटी पूर्ण करा
15
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
16
रशियाकडून क्रुड ऑईलची विक्रमी आयात; पेट्रोलियम मंत्री म्हणाले, "भारताचं ऊर्जा धोरण कोणत्याही दबावाखाली..."
17
"कलाकाराला ऐकून घ्यावंच लागतं, पण..." शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेचं पुन्हा प्रत्युत्तर
18
ठाणे स्टेशनजवळ भीषण आग! स्कायवॉकजवळच्या आगीमुळे प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ
19
साप्ताहिक राशीभविष्य: २ राजयोगांचा ९ राशींना दुपटीने लाभ, सुबत्ता-भरभराट; गुंतवणुकीत नफा!
20
गुडबाय ISS! पृथ्वीवर परतण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांचे फोटो आले समोर, आजपासून परतीचा प्रवास सुरू होणार

केशोरी येथे लाल मिरची पिकाची तोडणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:36 IST

केशोरी : अर्जुनी - मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरातील शेतकरी धानपीक आणि मिरची पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात. येथील लाल ...

केशोरी : अर्जुनी - मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरातील शेतकरी धानपीक आणि मिरची पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात. येथील लाल मिरची संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. या लाल मिरचीला परदेशातही मोठी मागणी असते. सध्या लाल मिरची पीक परिपक्व झाले असून, तोडणीचे काम सुरू आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या मिरची शेतात मिरची तोडणाऱ्या महिला दिसून येत असून, यातून अनेक गरीब कुटुंबातील महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

लाल मिरची तोडण्याचा हंगाम जवळपास एक महिना सुरु असल्याने यापासून रोजगाराची समस्या मार्गी लागली आहे. केशोरी परिसरातील बहुतांश शेतकरी लाल मिरची पिकाचे उत्पादन घेतात. या परिसराची लाल मिरची उत्पादीत क्षेत्र म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाते. येथील लाल मिरचीला परदेशातून मागणी होते. मात्र, लाल मिरची उत्पादक शेतकरी शासनाकडून नाडला जात आहे. शासन मिरची पिकाला हमीभाव देत नसल्यामुळे उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिरची लागवड खर्च जास्त आहे. मिरची पिकासाठी अत्यंत जिकरीची मेहनत शेतकऱ्यांना करावी लागते. सध्या सप्टेंबर महिन्यात लागवड केलेले मिरची पीक परिपक्व होऊन तोडणीपर्यंत आले आहे. मिरची पिकाच्या तोडणीचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. येथील लाल मिरची तोडण्यासाठी खेड्यापाड्यातून महिला मजूर येत असतात. मिरची तोडण्याचा हंगाम जवळपास महिनाभर सुरु असतो. या भागातील मिरची पिकाची ओळख आहे तशीच मागणीसुध्दा आहे. परंतु यावर्षी नेहमी बदलणाऱ्या वातावरणामुळे मिरची उत्पादनात फार मोठी घट सोसावी लागणार आहे. शासनाकडून मिरची पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने मिरची उत्पादक शेतकरी फार हताश झाला आहे. या कारणामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी मिरची पिकाचे लागवड क्षेत्र कमी करुन मकापीक आणि रब्बी धानाचे पीक लागवड क्षेत्र वाढविले आहे. आता लाल मिरची पिकाची तोडणी जोमात सुरु असून मिरचीच्या शेतात महिला मजूर मिरची तोडताना दिसून येत आहेत.

.....

हमीभाव देण्याची मागणी

शेत जमिनीतील उत्पादीत इतर पिकांना शासनाने हमीभाव देऊन न्याय दिला आहे. त्यानुसार मिरची पिकालाही हमीभाव जाहीर करावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांचा लढा सुरू आहे. परंतु अजूनही शासनाने मिरची पिकाला हमीभाव जाहीर केला नाही किंवा नैसर्गिक आपत्तीने झालेल्या मिरची पिकाची नुकसान भरपाई मिळत नसल्याने मिरची उत्पादक शेतकरी शासनाप्रती नाराजी व्यक्त करीत आहेत.