शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

केशोरी येथे लाल मिरची पिकाची तोडणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:36 IST

केशोरी : अर्जुनी - मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरातील शेतकरी धानपीक आणि मिरची पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात. येथील लाल ...

केशोरी : अर्जुनी - मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरातील शेतकरी धानपीक आणि मिरची पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात. येथील लाल मिरची संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. या लाल मिरचीला परदेशातही मोठी मागणी असते. सध्या लाल मिरची पीक परिपक्व झाले असून, तोडणीचे काम सुरू आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या मिरची शेतात मिरची तोडणाऱ्या महिला दिसून येत असून, यातून अनेक गरीब कुटुंबातील महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

लाल मिरची तोडण्याचा हंगाम जवळपास एक महिना सुरु असल्याने यापासून रोजगाराची समस्या मार्गी लागली आहे. केशोरी परिसरातील बहुतांश शेतकरी लाल मिरची पिकाचे उत्पादन घेतात. या परिसराची लाल मिरची उत्पादीत क्षेत्र म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाते. येथील लाल मिरचीला परदेशातून मागणी होते. मात्र, लाल मिरची उत्पादक शेतकरी शासनाकडून नाडला जात आहे. शासन मिरची पिकाला हमीभाव देत नसल्यामुळे उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिरची लागवड खर्च जास्त आहे. मिरची पिकासाठी अत्यंत जिकरीची मेहनत शेतकऱ्यांना करावी लागते. सध्या सप्टेंबर महिन्यात लागवड केलेले मिरची पीक परिपक्व होऊन तोडणीपर्यंत आले आहे. मिरची पिकाच्या तोडणीचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. येथील लाल मिरची तोडण्यासाठी खेड्यापाड्यातून महिला मजूर येत असतात. मिरची तोडण्याचा हंगाम जवळपास महिनाभर सुरु असतो. या भागातील मिरची पिकाची ओळख आहे तशीच मागणीसुध्दा आहे. परंतु यावर्षी नेहमी बदलणाऱ्या वातावरणामुळे मिरची उत्पादनात फार मोठी घट सोसावी लागणार आहे. शासनाकडून मिरची पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने मिरची उत्पादक शेतकरी फार हताश झाला आहे. या कारणामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी मिरची पिकाचे लागवड क्षेत्र कमी करुन मकापीक आणि रब्बी धानाचे पीक लागवड क्षेत्र वाढविले आहे. आता लाल मिरची पिकाची तोडणी जोमात सुरु असून मिरचीच्या शेतात महिला मजूर मिरची तोडताना दिसून येत आहेत.

.....

हमीभाव देण्याची मागणी

शेत जमिनीतील उत्पादीत इतर पिकांना शासनाने हमीभाव देऊन न्याय दिला आहे. त्यानुसार मिरची पिकालाही हमीभाव जाहीर करावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांचा लढा सुरू आहे. परंतु अजूनही शासनाने मिरची पिकाला हमीभाव जाहीर केला नाही किंवा नैसर्गिक आपत्तीने झालेल्या मिरची पिकाची नुकसान भरपाई मिळत नसल्याने मिरची उत्पादक शेतकरी शासनाप्रती नाराजी व्यक्त करीत आहेत.