शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

रविराजाच्या वक्रदृष्टीने होरपळतोय जिल्हा

By admin | Updated: May 15, 2016 01:21 IST

यावर्षीच्या तापमानातील उच्चांक गाठत आज तापमान ४४.८ अंश सेल्सिअस पोहोचले. त्यामुळे तीव्र उन्हात शनिवारी सारेच होरपळून निघाले.

तापमान ४४.८ : आणखीही चढण्याची शक्यता गोंदिया : यावर्षीच्या तापमानातील उच्चांक गाठत आज तापमान ४४.८ अंश सेल्सिअस पोहोचले. त्यामुळे तीव्र उन्हात शनिवारी सारेच होरपळून निघाले. वाढत्या उन्हामुळे जीव आता कासावीस होऊ लागला असून कधी उन्हाळ््यापासून सुटका होते याची वाट सर्वच बघू लागले आहेत. मात्र मे महिना आता जेमतेम अर्ध्यातच आला असून उरलेल्या या १५ दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. निसर्गाने उन्हाळा, हिवाळा व पावसाळा असे तीन ऋतूंचे चक्र बांधून दिले आहे. मात्र मानवाने आपल्या स्वार्थासाठी निसर्गाशी छेड करून आपली नवी दुनिया वसविण्याचा घाट सुरू केला आहे. याचा ऋतुचक्र व निसर्गावर परिणाम पडत आहे. झाडांची कत्तल व सिमेंट कॉंक्रीटचे जंगल आज निगर्साला मारक ठरत असून याचेच परिणाम आहे की, पावसाळ्यात पाऊस पडत नसून उन्हाळ्यात रविराज सीमा तोडून आग ओकू लागले आहे. पूर्वी कधीही ४५ डिग्रीपर्यंत न जाणारे तापमान आता ४५ डिग्रीच्या जवळ पोहोचले असून तापमानाची ही पातळी वाढतच जाणार आहे. यंदाही असाच काहीसा प्रकार जाणवू लागला आहे. यंदा मार्च व एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली.यामुळे या दोन महिन्यात तापमान उतरले होते व उन्हाळा तेवढा काही भासला नाही. मात्र मे महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून सुर्यदेवाने जिल्हावासीयांना चटका देण्यास सुरूवात केली. (शहर प्रतिनिधी)१ व १३ मे सर्वाधिक उष्ण मे महिन्याच्या सुरूवातीलाच सूर्याने आग ओकून आपली ताकद दाखवून दिली आहे. १ मे रोजी ४३ डिग्री तापमानाची नोंद जिल्ह्यात घेण्यात आली. दि.१४ ला तापमान ४४.८ डिग्रीवर पोहोचले. तापमानाची ही पातळी पुढील १५ दिवस कमी-अधिक प्रमाणात अशीच राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मे महिन्यात ६ तारखेला सर्वात कमी ३५.३ डिग्री तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. उष्माघाताचा बळी नाहीउष्माघाताचे प्रकार लक्षात घेता आरोग्य विभागाने येथील केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात विशेष उष्माघात कक्ष तयार ठेवले होते. या कक्षात उष्मा लागणचे सुमारे ३५ रूग्ण भर्ती करण्यात आले होते. या रूग्णांवर उपचार करून सुटी देण्यात आली. मात्र उष्माघाताने यावर्षी एकही दगावला नसल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रवी धकाते यांनी दिली.