शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सहा सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 21:32 IST

अनुसूचित जाती, जमाती, मागार्स प्रवर्गातील ग्रामपंचायत सदस्यांना निवडून आल्यानंतर सर्वोच्य न्यायालयाच्या निणर्यानुसार सहा महिन्याच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.

ठळक मुद्देजात पडताळणी प्रमाणपत्र : ७८ कर्मचाऱ्यांवर संकट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अनुसूचित जाती, जमाती, मागार्स प्रवर्गातील ग्रामपंचायत सदस्यांना निवडून आल्यानंतर सर्वोच्य न्यायालयाच्या निणर्यानुसार सहा महिन्याच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. मात्र जिल्ह्यातील सहा सदस्यांनी अद्याप सहा महिने लोटूनही जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे.जिल्ह्यात ८३० ग्रामपंचायत असून यात साडेतीन हजार ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश आहे. खुला प्रवर्ग वगळता इतर प्रवर्गातील उमेदवारांना निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना जात पडताळणी प्रमाणपत्र व इतर प्रमाणपत्रे जोडावी लागतात. ज्या सदस्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल करताना जात पडताळणी प्रमाणपत्र नसेल त्यांना ते निवडून आल्यानंतर सहा महिन्याच्या आत सादर करावे लागते. तसे शपथपत्र सुध्दा त्यांना निवडणूक अधिकाºयांना भरुन द्यावे लागते. निवडून आल्यानंतर सहा महिन्याच्या कालावधीत सदस्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यास सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयानुसार त्यांचे सदस्यत्व रद्द होते. जिल्ह्यात मागील वर्षी ग्रामपंचायतच्या निवडणुका पार पडला. त्यानंतर निवडून आलेल्या जिल्ह्यातील ३ हजार उमेदवारांनी जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी समाज कल्याण विभागाच्या जात पडताळणी प्रमाणपत्र समितीकडे अर्ज केले होते. त्यानंतर जिल्ह्यास्तरीय समितीने विशेष शिबिर व मोहीम राबवून या सदस्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र उपलब्ध करुन दिली. मात्र जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्या सहा सदस्यांनी अद्यापही कागदपत्रांची पूर्तत: केलेली नाही. त्यामुळे या सदस्यांचे सदस्य रद्द करण्याची कारवाही केली जाणार असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.कर्मचाऱ्यांवर संकटशासकीय नोकरीवर रूजू होणाऱ्या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असता. अन्यथा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची व बडतर्फीची कारवाही केली जाते. जिल्ह्यातील विविध शासकीय विभागात कार्यरत ७८ कर्मचाऱ्यांनी अद्यापही जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नाही. या कर्मचाऱ्यांचे अर्ज जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समितीकडे प्रलबिंत असल्याची माहिती आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी कागदपत्रांची वेळीच पूर्तत: न केल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाही होण्याची शक्यता आहे.जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समितीकडे प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्या अर्जदारांच्या सर्व अर्जांची सहा महिन्याच्या आत कारवाही करुन प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात आले. यासाठी समितीने धडक मोहीम राबविली. त्यामुळे जिल्ह्यात पेडींग अर्जांची संख्या फारच कमी आहे.ज्यांचे अर्ज प्रमाणपत्र प्रलबिंत आहेत त्यांनी त्वरीत कागदपंत्राची पुर्तता करुन समितीच्या कार्यालयात उपस्थित राहावे.- मधूसूदन धारगावे, उपायुक्त, जात पडताळणी समिती गोंदिया.

टॅग्स :Caste certificateजात प्रमाणपत्रgram panchayatग्राम पंचायत