शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या शोधात वानरांचा वस्तीत हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 00:17 IST

उन्हाच्या दाहकतेचा प्रभाव व जंगलव्याप्त भागात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने वानरांचा पाण्याचा शोधात भरवस्तीत हैदोस वाढला आहे. अशातच कौलारु घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

ठळक मुद्देगावकरी त्रस्त : वन विभागाने उपाय करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा-कोयलारी : उन्हाच्या दाहकतेचा प्रभाव व जंगलव्याप्त भागात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने वानरांचा पाण्याचा शोधात भरवस्तीत हैदोस वाढला आहे. अशातच कौलारु घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.या गावाच्या चारही बाजूला जंगलाने व्यापले आहे. त्यामुळे बाराही महिने गावशेजारी वानरांचे कळप पाहायला मिळतात.यावर्षीच्या कडक उन्हाने तसेच जंगल भागात पशुपक्ष्यांना पिण्याच्या पाण्याचे पानवठे नसल्याने पाण्याच्या शोधात वानरांच्या कळपाने भरवस्तीत मोर्चा वळवला आहे. परिणामी कौलारु घरांचे अतोनात नुकसान होत आहे.वनविभागाने जंगली प्राण्यांसाठी तसेच पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी सुरुवातीलाच सोय केली असती तर वन्य प्राण्यांनी गावाकडे धाव घेतली नसती. तसेच जंगलातील पशु पक्षांना पाण्याअभावी जिव गमवावा लागला नसता. याप्रकरणाकडे वनविभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.एक आठवड्यापासून राणी दुर्गावती चौकातील लोकांच्या घरावर वानरांनी ठाण मांडले आहे. दुपारच्या सुमारास वानवरांचे कळप पिण्याच्या पाण्यासाठी येतात.एका घरावरुन दुसऱ्या घरावर उड्या मारतांना कौलाची तुटफूट होवून घरमालकांचे मोठे नुकसान होते. याचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी गावकºयांनी केली आहे. 

टॅग्स :Monkeyमाकड