शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
5
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
6
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
7
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
8
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
11
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
12
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
13
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
14
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
15
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
16
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
17
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
18
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
19
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
20
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या

हलबीटोला, श्रीरामपूर येथे पाणी पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 22:31 IST

येथील नगरपंचायतीच्या हलबीटोला व श्रीरामपूर वार्डात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.खासगी सार्वजनिक बोरवेल व विहीरींनी तळ गाठल्यामुळे नगर पंचायत गोरेगावने या भागात चार टँकरने पाणी पुरवठा करण्यास सुरूवात केली आहे.

ठळक मुद्देविहिरी आटल्या : आता पोहोचतो नगर पंचायतचा टँकर, नळ योजनेचा अभाव, दरवर्षी पाणी टंचाईच्या संकटाने गावकरी हैराण

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : येथील नगरपंचायतीच्या हलबीटोला व श्रीरामपूर वार्डात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.खासगी सार्वजनिक बोरवेल व विहीरींनी तळ गाठल्यामुळे नगर पंचायत गोरेगावने या भागात चार टँकरने पाणी पुरवठा करण्यास सुरूवात केली आहे.गोरेगाव नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या हलबीटोला प्रभाग क्रं. ५ व श्रीरामपूर प्रभाग क्रं. १ मधील विहीरी, बोअरवेलनी तळ गाठला आहे. त्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नगरपंचायतीने पाणी पुरवठा करण्यासाठी चार टँकर लावले त्यामुळे पाणी प्रश्नावर काही प्रमाणात तोडगा निघाला आहे. दररोज सकाळी या दोन वार्डात पाणी पुरवठा केला जातो. एका टँकरमागे नगरपंचायत प्रशासनाला एक हजार ते पंधराशे रुपये खर्च येत आहे.श्रीरामपूर येथील ७० कुटूंब व हलबीटोला येथील १०० कुटूंबांना दररोज टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. नगर पंचायतने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विविध प्रयोग केले असले तरी हलबीटोला, श्रीरामपूर येथील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी न.प.ला टँकरचा आसरा घ्यावा लागत आहे.शेतातील बोअरवेलमुळे पाणीटंचाईगोरेगाव शहराच्या सभोवताल मोठ्या प्रमाणावर शेती आहे. या शेतात २०० ते ३०० फुटापर्यंत बोअरवेल खोदलेले आहे. त्यामुळे खरीप व रब्बी पिक घेणाºया शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होत आहे. परिसरातील बोअरवेलमुळे १०० ते १५० फुटाच्या बोअरवेलचे पाण्याचे साठे कमी झाले तर विहीरी कोरड्या पडल्याचे चित्र आहे. शेतातील बोअरवेलमुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे.पाणी पुरवठा योजना नाहीहलबीटोला व श्रीरामपूर येथे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना नाही. त्यामुळे येथील नागरिकांना विहिरी व बोअरवेलवर अवलंबून राहावे लागत आहे. उन्हाच्या दाहकतेमुळे परिसरातील तळे व इतर पाणीसाठे वाळत असल्यामुळे या भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.शंभर लिटर पाणीयेथील दोन्ही वॉर्डात टॅकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. जवळपास १७० कुटूंब टॅकरच्या पाण्यावर अवलंबून असून न.प.द्वारे एका कुटूंबाला १०० ते १५० लिटर पाणी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.प्रादेशीक पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन दोन्ही वॉर्डात नसल्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. लवकरच या समस्येवर तोडगा काढून पाणी टंचाई दूर केली जाईल.- आशीष बारेवार, नगराध्यक्ष न.प.गोरेगाव.वॉर्ड क्रं. ५ व वॉर्ड क्रं. १ मध्ये एकूण चार टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. एवढ्यावरच नागरिकांचे भागत नसून पुन्हा चार टँकरची गरज आहे. त्याकडे नगर पंचायतने लक्ष देण्याची गरज आहे.- रेवेंद्रकुमार बिसेन, नगरसेवक श्रीरामपूर.