शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
2
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
3
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
4
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
5
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
6
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
7
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
8
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
9
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
10
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
11
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
12
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
13
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
14
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
15
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
16
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
17
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
18
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
19
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
20
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 

हलबीटोला, श्रीरामपूर येथे पाणी पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 22:31 IST

येथील नगरपंचायतीच्या हलबीटोला व श्रीरामपूर वार्डात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.खासगी सार्वजनिक बोरवेल व विहीरींनी तळ गाठल्यामुळे नगर पंचायत गोरेगावने या भागात चार टँकरने पाणी पुरवठा करण्यास सुरूवात केली आहे.

ठळक मुद्देविहिरी आटल्या : आता पोहोचतो नगर पंचायतचा टँकर, नळ योजनेचा अभाव, दरवर्षी पाणी टंचाईच्या संकटाने गावकरी हैराण

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : येथील नगरपंचायतीच्या हलबीटोला व श्रीरामपूर वार्डात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.खासगी सार्वजनिक बोरवेल व विहीरींनी तळ गाठल्यामुळे नगर पंचायत गोरेगावने या भागात चार टँकरने पाणी पुरवठा करण्यास सुरूवात केली आहे.गोरेगाव नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या हलबीटोला प्रभाग क्रं. ५ व श्रीरामपूर प्रभाग क्रं. १ मधील विहीरी, बोअरवेलनी तळ गाठला आहे. त्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नगरपंचायतीने पाणी पुरवठा करण्यासाठी चार टँकर लावले त्यामुळे पाणी प्रश्नावर काही प्रमाणात तोडगा निघाला आहे. दररोज सकाळी या दोन वार्डात पाणी पुरवठा केला जातो. एका टँकरमागे नगरपंचायत प्रशासनाला एक हजार ते पंधराशे रुपये खर्च येत आहे.श्रीरामपूर येथील ७० कुटूंब व हलबीटोला येथील १०० कुटूंबांना दररोज टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. नगर पंचायतने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विविध प्रयोग केले असले तरी हलबीटोला, श्रीरामपूर येथील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी न.प.ला टँकरचा आसरा घ्यावा लागत आहे.शेतातील बोअरवेलमुळे पाणीटंचाईगोरेगाव शहराच्या सभोवताल मोठ्या प्रमाणावर शेती आहे. या शेतात २०० ते ३०० फुटापर्यंत बोअरवेल खोदलेले आहे. त्यामुळे खरीप व रब्बी पिक घेणाºया शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होत आहे. परिसरातील बोअरवेलमुळे १०० ते १५० फुटाच्या बोअरवेलचे पाण्याचे साठे कमी झाले तर विहीरी कोरड्या पडल्याचे चित्र आहे. शेतातील बोअरवेलमुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे.पाणी पुरवठा योजना नाहीहलबीटोला व श्रीरामपूर येथे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना नाही. त्यामुळे येथील नागरिकांना विहिरी व बोअरवेलवर अवलंबून राहावे लागत आहे. उन्हाच्या दाहकतेमुळे परिसरातील तळे व इतर पाणीसाठे वाळत असल्यामुळे या भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.शंभर लिटर पाणीयेथील दोन्ही वॉर्डात टॅकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. जवळपास १७० कुटूंब टॅकरच्या पाण्यावर अवलंबून असून न.प.द्वारे एका कुटूंबाला १०० ते १५० लिटर पाणी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.प्रादेशीक पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन दोन्ही वॉर्डात नसल्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. लवकरच या समस्येवर तोडगा काढून पाणी टंचाई दूर केली जाईल.- आशीष बारेवार, नगराध्यक्ष न.प.गोरेगाव.वॉर्ड क्रं. ५ व वॉर्ड क्रं. १ मध्ये एकूण चार टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. एवढ्यावरच नागरिकांचे भागत नसून पुन्हा चार टँकरची गरज आहे. त्याकडे नगर पंचायतने लक्ष देण्याची गरज आहे.- रेवेंद्रकुमार बिसेन, नगरसेवक श्रीरामपूर.