शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
3
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
4
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
5
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
6
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
7
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
8
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
9
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
10
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
11
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

हलबीटोला, श्रीरामपूर येथे पाणी पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 22:31 IST

येथील नगरपंचायतीच्या हलबीटोला व श्रीरामपूर वार्डात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.खासगी सार्वजनिक बोरवेल व विहीरींनी तळ गाठल्यामुळे नगर पंचायत गोरेगावने या भागात चार टँकरने पाणी पुरवठा करण्यास सुरूवात केली आहे.

ठळक मुद्देविहिरी आटल्या : आता पोहोचतो नगर पंचायतचा टँकर, नळ योजनेचा अभाव, दरवर्षी पाणी टंचाईच्या संकटाने गावकरी हैराण

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : येथील नगरपंचायतीच्या हलबीटोला व श्रीरामपूर वार्डात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.खासगी सार्वजनिक बोरवेल व विहीरींनी तळ गाठल्यामुळे नगर पंचायत गोरेगावने या भागात चार टँकरने पाणी पुरवठा करण्यास सुरूवात केली आहे.गोरेगाव नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या हलबीटोला प्रभाग क्रं. ५ व श्रीरामपूर प्रभाग क्रं. १ मधील विहीरी, बोअरवेलनी तळ गाठला आहे. त्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नगरपंचायतीने पाणी पुरवठा करण्यासाठी चार टँकर लावले त्यामुळे पाणी प्रश्नावर काही प्रमाणात तोडगा निघाला आहे. दररोज सकाळी या दोन वार्डात पाणी पुरवठा केला जातो. एका टँकरमागे नगरपंचायत प्रशासनाला एक हजार ते पंधराशे रुपये खर्च येत आहे.श्रीरामपूर येथील ७० कुटूंब व हलबीटोला येथील १०० कुटूंबांना दररोज टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. नगर पंचायतने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विविध प्रयोग केले असले तरी हलबीटोला, श्रीरामपूर येथील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी न.प.ला टँकरचा आसरा घ्यावा लागत आहे.शेतातील बोअरवेलमुळे पाणीटंचाईगोरेगाव शहराच्या सभोवताल मोठ्या प्रमाणावर शेती आहे. या शेतात २०० ते ३०० फुटापर्यंत बोअरवेल खोदलेले आहे. त्यामुळे खरीप व रब्बी पिक घेणाºया शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होत आहे. परिसरातील बोअरवेलमुळे १०० ते १५० फुटाच्या बोअरवेलचे पाण्याचे साठे कमी झाले तर विहीरी कोरड्या पडल्याचे चित्र आहे. शेतातील बोअरवेलमुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे.पाणी पुरवठा योजना नाहीहलबीटोला व श्रीरामपूर येथे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना नाही. त्यामुळे येथील नागरिकांना विहिरी व बोअरवेलवर अवलंबून राहावे लागत आहे. उन्हाच्या दाहकतेमुळे परिसरातील तळे व इतर पाणीसाठे वाळत असल्यामुळे या भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.शंभर लिटर पाणीयेथील दोन्ही वॉर्डात टॅकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. जवळपास १७० कुटूंब टॅकरच्या पाण्यावर अवलंबून असून न.प.द्वारे एका कुटूंबाला १०० ते १५० लिटर पाणी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.प्रादेशीक पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन दोन्ही वॉर्डात नसल्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. लवकरच या समस्येवर तोडगा काढून पाणी टंचाई दूर केली जाईल.- आशीष बारेवार, नगराध्यक्ष न.प.गोरेगाव.वॉर्ड क्रं. ५ व वॉर्ड क्रं. १ मध्ये एकूण चार टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. एवढ्यावरच नागरिकांचे भागत नसून पुन्हा चार टँकरची गरज आहे. त्याकडे नगर पंचायतने लक्ष देण्याची गरज आहे.- रेवेंद्रकुमार बिसेन, नगरसेवक श्रीरामपूर.