शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

नालंदा बुद्ध विहारात गुणवंत विद्यार्थिनीचा सत्कार

By admin | Updated: October 5, 2014 23:07 IST

दहावीच्या परीक्षेत ८७ टक्के गुण प्राप्त करणाऱ्या गायत्री तक्कतकुमार पारधी या विद्यार्थिनीचा सत्कार तिरोडा तालुक्यातील चिरेखनी येथील नालंदा बुद्ध विहारात शनिवारी (दि.४) करण्यात आला.

गोंदिया : दहावीच्या परीक्षेत ८७ टक्के गुण प्राप्त करणाऱ्या गायत्री तक्कतकुमार पारधी या विद्यार्थिनीचा सत्कार तिरोडा तालुक्यातील चिरेखनी येथील नालंदा बुद्ध विहारात शनिवारी (दि.४) करण्यात आला. गायत्रीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट केअर असोसिएशनच्या वतीने सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवचरण शहारे यांच्या हस्ते सायकल भेट देण्यात आली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट केअर असोसिएशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी काही अटी-शर्ती ठेवण्यात आल्या होत्या. उपक्रमातून मिळणाऱ्या भेटवस्तूचा लाभ घेण्यासाठी जाती-धर्माचे बंधन नव्हते. त्यासाठी दहाव्या वर्गातील विद्यार्थी हा चिरेखनी या गावातील रहिवासी असावा. तसेच त्यांनी मार्च-२०१४ च्या बोर्डाच्या परीक्षेत कमीत कमी ७५ टक्के गुण मिळविणे आवश्यक होते. यापेक्षा कमी गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास या उपक्रमातून मिळणाऱ्या भेटवस्तूचा लाभ मिळणार नाही, असे डॉ. आंबेडकर स्टुडंट केअर असोसिएशनचे शशांक शहारे यांनी कळविले होते. त्यासाठी चिरेखनी गावातील दहाव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या जवळपास १८ विद्यार्थ्यांनी आपल्या नावांची नोंदणी करून घेतली होती. मात्र यापैकी केवळ गायत्री तक्कतकुमार पारधी या एकाच विद्यार्थिनीने ७५ टक्केपेक्षा अधिक म्हणजे ८७ टक्के गुण मिळविले. तसेच तिने गणित विषयात १०० पैकी ९९ गुण मिळविले. त्याबद्दल शनिवारी नालंदा बुद्ध विहारात ५८ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यात सेवानिवृत्त उच्चश्रेणी मुख्याध्यापक शिवचरण शहारे यांच्या हस्ते तिला सायकल भेट देण्यात आली. तसेच महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नंदूकुमार बिसेन यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून तिचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊराव कोटांगले होते. पाहुणे म्हणून शिवचरण शहारे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नंदूकुमार बिसेन, शिक्षक शैलेंद्रकुमार कोचे, तक्कतकुमार पारधी, प्रमोद शहारे, डॉ. ब्रह्मदास वालदे व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी धम्मचक्र प्रवर्तन दिन, स्पर्धेचे युग, उच्चशिक्षणाची गरज, शिक्षणाबाबत जनजागृती आदी अनेक विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडून संचालन देवानंद शहारे यांनी केले. आभार शैलेंद्र कोचे यांनी मानले. कार्यक्रमासाठी घनश्याम जांभूळकर, सुभाष जांभूळकर, सरजू शहारे, परागसिंह शहारे, कुणाल शहारे, डिगांबर जांभूळकर, किशोर सरोजकर, विष्णूदास जांभूळकर, वच्छला वालदे, चंद्रकला नंदेश्वर, पौर्णिमा शहारे, निशा शहारे, मंदा जांभूळकर, अविनाश शहारे, रूपा उके, भाग्यश्री शहारे आदी समाजबांधव व ग्रामस्थांनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)