शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

गुटखा गेला, खर्रा वाढला, तंबाखू मात्र कायम

By admin | Updated: May 30, 2014 23:57 IST

तंबाखूचे दुष्परिणाम पाहता राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यात सर्वत्र गुटखा आणि नंतर खर्‍र्यावर बंदी घातली. पण यामुळे खाण्यार्‍यांवर कोणताही फरक पडलेला नाही.

बंदी नावाचीच : पानठेले, चालत्या रेल्वेतही सर्रास मिळतो गुटखा, खर्रामनोज ताजने - गोंदियातंबाखूचे दुष्परिणाम पाहता राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यात सर्वत्र गुटखा आणि नंतर खर्‍र्यावर बंदी घातली. पण यामुळे खाण्यार्‍यांवर कोणताही फरक पडलेला नाही. प्रत्येक पानठेल्यावर आजही बिनधास्तपणे खर्रा विकल्या जातो. फरक एवढाच आहे, आधी जो खर्रा १0 ते १२ रुपयाला मिळत होता तो आता १५ रुपयाला विकत घ्यावा लागतो. दुष्परिणाम कळत असूनही शौकिन मात्र त्यापासून दूर वळत नसल्याचे सर्वत्र दिसून येत आहे.नागपूर-कोलकाता या मुख्य रेल्वेमार्गावर असलेल्या गोंदियात अनेक गोष्टी रेल्वेतून चोरट्या मार्गाने येतात. त्यात खर्‍र्यासाठी लागणार्‍या सुगंधित तंबाखूचाही समावेश आहे. व्यापार नगरी असलेल्या गोंदियात अनेक व्यापार्‍यांचे देशातील सर्व प्रमुख शहरांमधील व्यापार्‍यांशी लागेबांधे आहेत. त्यातूनच रेल्वेतून छुप्या मार्गाने गोंदियात दररोज तंबाखू पोहोचतो. हा तंबाखू पानठेल्यांपर्यंत पोहोचविण्यासाठीसुद्धा व्यापार्‍यांचे नेटवर्क व्यवस्थितपणे काम करते. एवढेच नाही तर बंदी असलेले गुटख्याचे पाऊच आणि पान मसालेसुद्धा गोंदियात उपलब्ध होतात. त्यामुळे शासनाने कितीही बंदी घातली असली तरी शौकिनांवर त्याचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही. आधी २ रुपयात मिळणारी गुटख्याची पुडी आता ४ ते ५ रुपयाला आणि १0 रुपयात मिळणारा खर्रा आता १५ रुपयात विकला जातो.राज्य शासनाने घातलेल्या बंदीनंतर गुटख्याचे प्रमाण कमी झाले असले तरी खर्‍र्याचे प्रमाण वाढले आहे. कोणतेही सरकारी कार्यालय असो, की शिक्षण देणारी ज्ञानमंदिरे असो, अध्र्यापेक्षा जास्त कर्मचारी खर्‍र्याचे शौकिन असल्याचे दिसून येते. दिवसाला १00 रुपये खर्‍र्यात उडविणारे अनेक महाभाग पहायला मिळतात. स्वत:च्या मुलांसाठी कधी ५ रुपयाचे चॉकलेट न नेणार्‍यांना स्वत:चा शौक पूर्ण करण्यासाठी महिन्याकाठी हजारो रुपये खर्च करताना काहीच वाटत नाही.आधी घोटलेला तंबाखू ओठात ठेवणार्‍यांचे प्रमाण बरेच होते. आता अशा प्रकारे तंबाखू खाणे कमीपणाचे दिसत असल्यामुळे चिमूटभर तंबाखूची जागा खर्‍र्याने घेतली आहे. प्रत्येक कर्मचार्‍याच्या खिशात खर्‍र्याची पुडी दिसत असल्यामुळे त्याच्या पिचकार्‍यांनी अनेक सरकारी कार्यालयांच्या भिंती आणि कोपरे रंगलेले दिसतात.तंबाखूच्या सेवनाला आळा बसून समाजस्वास्थ्य चांगले राहावे यासाठी सरकारने कायद्याचे बंधन घालून तंबाखूपासून शौकिनांना लांब जाण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र सोबत जनजागृतीची जोड दिली नसल्यामुळे ग्रामीण भागात अनेकांना तंबाखूच्या दुष्परिणामांची कल्पनाच नाही. त्यामुळे प्रभावीपणे जनजागृती कार्यक्रम राबवून दुष्परिणामांची कल्पना दिल्यास खर्रा, तंबाकू, गुटख्याला बर्‍याचा प्रमाणात हद्दपार करण्यास मदत होणार आहे.