शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

गुटखा गेला, खर्रा वाढला, तंबाखू मात्र कायम

By admin | Updated: May 30, 2014 23:57 IST

तंबाखूचे दुष्परिणाम पाहता राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यात सर्वत्र गुटखा आणि नंतर खर्‍र्यावर बंदी घातली. पण यामुळे खाण्यार्‍यांवर कोणताही फरक पडलेला नाही.

बंदी नावाचीच : पानठेले, चालत्या रेल्वेतही सर्रास मिळतो गुटखा, खर्रामनोज ताजने - गोंदियातंबाखूचे दुष्परिणाम पाहता राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यात सर्वत्र गुटखा आणि नंतर खर्‍र्यावर बंदी घातली. पण यामुळे खाण्यार्‍यांवर कोणताही फरक पडलेला नाही. प्रत्येक पानठेल्यावर आजही बिनधास्तपणे खर्रा विकल्या जातो. फरक एवढाच आहे, आधी जो खर्रा १0 ते १२ रुपयाला मिळत होता तो आता १५ रुपयाला विकत घ्यावा लागतो. दुष्परिणाम कळत असूनही शौकिन मात्र त्यापासून दूर वळत नसल्याचे सर्वत्र दिसून येत आहे.नागपूर-कोलकाता या मुख्य रेल्वेमार्गावर असलेल्या गोंदियात अनेक गोष्टी रेल्वेतून चोरट्या मार्गाने येतात. त्यात खर्‍र्यासाठी लागणार्‍या सुगंधित तंबाखूचाही समावेश आहे. व्यापार नगरी असलेल्या गोंदियात अनेक व्यापार्‍यांचे देशातील सर्व प्रमुख शहरांमधील व्यापार्‍यांशी लागेबांधे आहेत. त्यातूनच रेल्वेतून छुप्या मार्गाने गोंदियात दररोज तंबाखू पोहोचतो. हा तंबाखू पानठेल्यांपर्यंत पोहोचविण्यासाठीसुद्धा व्यापार्‍यांचे नेटवर्क व्यवस्थितपणे काम करते. एवढेच नाही तर बंदी असलेले गुटख्याचे पाऊच आणि पान मसालेसुद्धा गोंदियात उपलब्ध होतात. त्यामुळे शासनाने कितीही बंदी घातली असली तरी शौकिनांवर त्याचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही. आधी २ रुपयात मिळणारी गुटख्याची पुडी आता ४ ते ५ रुपयाला आणि १0 रुपयात मिळणारा खर्रा आता १५ रुपयात विकला जातो.राज्य शासनाने घातलेल्या बंदीनंतर गुटख्याचे प्रमाण कमी झाले असले तरी खर्‍र्याचे प्रमाण वाढले आहे. कोणतेही सरकारी कार्यालय असो, की शिक्षण देणारी ज्ञानमंदिरे असो, अध्र्यापेक्षा जास्त कर्मचारी खर्‍र्याचे शौकिन असल्याचे दिसून येते. दिवसाला १00 रुपये खर्‍र्यात उडविणारे अनेक महाभाग पहायला मिळतात. स्वत:च्या मुलांसाठी कधी ५ रुपयाचे चॉकलेट न नेणार्‍यांना स्वत:चा शौक पूर्ण करण्यासाठी महिन्याकाठी हजारो रुपये खर्च करताना काहीच वाटत नाही.आधी घोटलेला तंबाखू ओठात ठेवणार्‍यांचे प्रमाण बरेच होते. आता अशा प्रकारे तंबाखू खाणे कमीपणाचे दिसत असल्यामुळे चिमूटभर तंबाखूची जागा खर्‍र्याने घेतली आहे. प्रत्येक कर्मचार्‍याच्या खिशात खर्‍र्याची पुडी दिसत असल्यामुळे त्याच्या पिचकार्‍यांनी अनेक सरकारी कार्यालयांच्या भिंती आणि कोपरे रंगलेले दिसतात.तंबाखूच्या सेवनाला आळा बसून समाजस्वास्थ्य चांगले राहावे यासाठी सरकारने कायद्याचे बंधन घालून तंबाखूपासून शौकिनांना लांब जाण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र सोबत जनजागृतीची जोड दिली नसल्यामुळे ग्रामीण भागात अनेकांना तंबाखूच्या दुष्परिणामांची कल्पनाच नाही. त्यामुळे प्रभावीपणे जनजागृती कार्यक्रम राबवून दुष्परिणामांची कल्पना दिल्यास खर्रा, तंबाकू, गुटख्याला बर्‍याचा प्रमाणात हद्दपार करण्यास मदत होणार आहे.