शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
3
PM Modi Birthday : जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
4
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
5
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
6
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
7
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
8
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
9
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
10
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
11
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
12
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
13
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
14
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
15
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
16
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
18
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
19
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
20
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली

लेखी आश्वासनानंतर गुरूजींचे उपोषण मागे

By admin | Updated: October 25, 2015 01:44 IST

तहसीलदारांनी तीन महिन्याचा अवधी मागत दिलेल्या लेखी आश्वासनानंतर अखेर सूर्यवंशी गुरूजींनी दुसऱ्याचे दिवशी ....

सूर्याटोलातील बांधतलाव : प्रशासनाने मागितला तीन महिन्यांचा अवधीगोंदिया : तहसीलदारांनी तीन महिन्याचा अवधी मागत दिलेल्या लेखी आश्वासनानंतर अखेर सूर्यवंशी गुरूजींनी दुसऱ्याचे दिवशी शुक्रवारी (दि.२३) आपले उपोशम मागे घेतले. बांधतलावात गैरकायदेशीररित्या करण्यात आलेले एन.ए. रद्द करण्यात यावे या मागणीसाठी मागील १० वर्षापासून अडगळीत पडलेले प्रकरण आता मार्गी लागण्याचा मार्ग मात्र मोकळा झाला आहे. शहरातील सूर्याटोला परिसरात असलेल्या बांधतलावातील भुखंडाचे अवैधरित्या झालेले अकृषक आदेश रद्द करणे व तलाव जागेवर अवैधरित्या तयार केलेली पाळ पाडण्यात यावी याकरिता सेवनिवृत्त मुख्याध्यापक डी.एस. सूर्यवंशी यांनी गुरूवारपासून (दि.२२) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. गेल्या पाच वर्षापासून जिल्ह्यातील सर्व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना शेकडो पत्र व भेटी देवून अर्ज विनंत्या केल्या. तहसील कार्यालयापासून विभागीय आयुक्तांपर्यंत आपल्या मागणीसाठी चकरा त्यांनी मारल्या होत्या. विशेष म्हणजे, विभागीय आयुक्तांनी त्यांची दखल घेवून जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार पत्र देवून हे प्रकरण तातडीने निकाली काढण्याचे निर्देशही दिले होते. परंतु कुंभकर्णी निद्रेत असलेल्या प्रशासनाला जागच येत नव्हती. उलट उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व जिल्हाधिकारी यांचेकडून त्यांना अपमानित ही करण्यात आले व हाकलून देण्यात आल्याचेही प्रकार घडले. मात्र बांधतलावाचा मुद्दा मार्गी लावण्याचा निर्धार धरून त्यांनी विजयादशमीच्या दिवसापासून (दि.२२) उपोषण सुरू केले. त्यांच्या उपोषणाला विविध संघटना व जनतेचा सतत पाठिंबा लाभत असल्याचे पाहून कुंभकर्णी झोपेतून प्रशासन खडबडून जागे झाले. परिणामी उपोषणाच्या दुसऱ्याच दिवशी शुकवारी (दि.२३)पविभागीय अधिकारी के.एन.के. राव व तहसीलदार संजय पवार यांचे प्रतिनिधी नायब तहसीलदार एस.बी. माळी यांनी उपोषण मंडपाला भेट दिली. जिल्हाभर ही बातमी पसरल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनीही उपोषण मंडपाला भेट देऊन संबंधीत प्रशासकीय अधिकाऱ्यांशी दुरध्वनीवर चर्चा करुन उपोषणाचे गांभीर्य त्यांना पटवून दिले. त्याचप्रकारे आमदार गोपालदास अग्रवाल यांनीही प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांशी परस्पर दुरध्वनीवर चर्चा करुन या आंदोलनामुळे होणाऱ्या गंभीर परिणामाला प्रशासनास सामोरे जावे लागेल असे समजावून दिले. लोकांचा वाढता पाठींबा बघता प्रशासन नमले व सायंकाळी ३ महिन्याच्या आत या प्रकरणावर निर्णय घेवून निकाली काढण्याचे लेखी पत्र देवून नायब तहसीलदार माळी पुन्हा दुसऱ्यांदा उपोषण मंडपात दाखल झाले व उपोषण संपविण्याचा आग्रह केला. लेखी आश्वासन हाती आल्याने बांधतलाव जिर्णोद्धार समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सल्यावरून रात्री ९ वाजता गुरूजींनी आपले उपोषण तात्पुरते मागे घेत असल्याचे जाहीर केले. या आंदोलनासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आशिष नागपुरे, फुलचूरचे ग्रामपंचायत सदस्य मुकेश लिल्हारे, पुरुषोत्तम मोदी, जिल्हा काँग्रेस कमिटी महासचिव अमर वराडे यांच्यासह बांधतलाव जिर्णोद्धार समितीचे सर्व पदाधिकारी, अनेक जेष्ठ नागरिक, तरुण वर्ग, महिला, राजकीय पुढारी तसेच विविध सामाजिक संघटनांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)