शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

देशाचे रक्षकच निघाले भक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 22:41 IST

केंद्र आणि राज्यातील सत्तारुढ सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविले. मात्र प्रत्यक्षात देशात नेमके या विरोधात चित्र आहे. देशाचे रक्षकच भक्षक झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण देशाचे चौकीदार असल्याचे सांगितले होते.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : तालुका काँग्रेस कार्यकर्ता मेळावा, सरकारवर टीका

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : केंद्र आणि राज्यातील सत्तारुढ सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविले. मात्र प्रत्यक्षात देशात नेमके या विरोधात चित्र आहे. देशाचे रक्षकच भक्षक झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण देशाचे चौकीदार असल्याचे सांगितले होते. पण सध्या देशात लुटालूट सुरु आहे.पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जिवनावश्यक वस्तुंचे दर सातत्याने वाढत आहेत. विद्यमान सरकारच्या धोरणांनी जनता त्रस्त झाली असून अशा खोटारड्या सरकारला जनतेनेच धडा शिकविण्याचे आवाहन आ.गोपालदास अग्रवाल यांनी केले. तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्ता मेळावा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित करण्यात आला.या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा महासचिव सहषराम कोरोटे, माजी मंत्री भरत बहेकार, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष एन.डी. किरसान, माजी आ. रामरतन राऊत, उषा हर्षे, माजी तालुकाध्यक्ष नटवरलाल गांधी, शंभुप्रसाद शुक्ला, रामसिंग चव्हाण, सरपंच उषा भांडारकर, इसुलाल भालेकर, संदीप भाटीया, यादवलाल बनोठे, विजय टेकाम, सालेकसाचे अध्यक्ष वासुदेव चुटे, बाबू मेंढे, देवचंद ढेकवार, संजय डोये, राधेलाल रहांगडाले, प्रमिला उपराडे,माजी सरपंच जमिल खान, युवा अध्यक्ष शंकर रहांगडाले, गणेश हुकरे,अजय खेतान, रामकिसन शिवणकर,अरुणा बहेकार उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व महात्मा गांधी यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करुन करण्यात आली.अग्रवाल म्हणाले, देशात सर्वसामान्य माणूस दु:खी असून जनतेला रस्त्यावर उतरण्याची पाळी आली आहे. म्हणून कार्यकर्त्यांनी घरोघरी जावून सामान्य जनतेला जागृत करण्याचे कार्य करण्याचे आवाहन केले.कोरोटे म्हणाले आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे हाल गंभीर असून गावातील रस्ते खड्डेमय झाले आहे. परिणामी अपघातात वाढ झाली असून त्यात अनेकांचा नाहक बळी जात आहे. तर शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे अशा विश्वासघाती सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर उघड करण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे.कार्यक्रमाचे संचालन जगदीश चुटे यांनी केले तर आभार इसुलाल भालेकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केवलचंद शेंडे, दीपक शर्मा, दिगंबर कोरे, महेश उके, उज्वल ठाकूर, श्रावण शिवणकर, प्रकाश फुंडे, गुणवंत पटले, किरण चुटे, शहवी खान, निलकंठ वाढई, रमेश चुटे, बुधराम विठ्ठले, नंदलाल पाथोडे, राजकुमार चव्हाण, मनिषा शिवणकर, धनवंता शिवणकर, भागवत रहिले, सुबोध शहारे, रामेश्वर चौधरी, गितेश्वरी शिवणकर, पारबता कटरे, आनंद शेंडे, नरेश बोपचे यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल