शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

देशाचे रक्षकच निघाले भक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 22:41 IST

केंद्र आणि राज्यातील सत्तारुढ सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविले. मात्र प्रत्यक्षात देशात नेमके या विरोधात चित्र आहे. देशाचे रक्षकच भक्षक झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण देशाचे चौकीदार असल्याचे सांगितले होते.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : तालुका काँग्रेस कार्यकर्ता मेळावा, सरकारवर टीका

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : केंद्र आणि राज्यातील सत्तारुढ सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविले. मात्र प्रत्यक्षात देशात नेमके या विरोधात चित्र आहे. देशाचे रक्षकच भक्षक झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण देशाचे चौकीदार असल्याचे सांगितले होते. पण सध्या देशात लुटालूट सुरु आहे.पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जिवनावश्यक वस्तुंचे दर सातत्याने वाढत आहेत. विद्यमान सरकारच्या धोरणांनी जनता त्रस्त झाली असून अशा खोटारड्या सरकारला जनतेनेच धडा शिकविण्याचे आवाहन आ.गोपालदास अग्रवाल यांनी केले. तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्ता मेळावा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित करण्यात आला.या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा महासचिव सहषराम कोरोटे, माजी मंत्री भरत बहेकार, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष एन.डी. किरसान, माजी आ. रामरतन राऊत, उषा हर्षे, माजी तालुकाध्यक्ष नटवरलाल गांधी, शंभुप्रसाद शुक्ला, रामसिंग चव्हाण, सरपंच उषा भांडारकर, इसुलाल भालेकर, संदीप भाटीया, यादवलाल बनोठे, विजय टेकाम, सालेकसाचे अध्यक्ष वासुदेव चुटे, बाबू मेंढे, देवचंद ढेकवार, संजय डोये, राधेलाल रहांगडाले, प्रमिला उपराडे,माजी सरपंच जमिल खान, युवा अध्यक्ष शंकर रहांगडाले, गणेश हुकरे,अजय खेतान, रामकिसन शिवणकर,अरुणा बहेकार उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व महात्मा गांधी यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करुन करण्यात आली.अग्रवाल म्हणाले, देशात सर्वसामान्य माणूस दु:खी असून जनतेला रस्त्यावर उतरण्याची पाळी आली आहे. म्हणून कार्यकर्त्यांनी घरोघरी जावून सामान्य जनतेला जागृत करण्याचे कार्य करण्याचे आवाहन केले.कोरोटे म्हणाले आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे हाल गंभीर असून गावातील रस्ते खड्डेमय झाले आहे. परिणामी अपघातात वाढ झाली असून त्यात अनेकांचा नाहक बळी जात आहे. तर शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे अशा विश्वासघाती सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर उघड करण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे.कार्यक्रमाचे संचालन जगदीश चुटे यांनी केले तर आभार इसुलाल भालेकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केवलचंद शेंडे, दीपक शर्मा, दिगंबर कोरे, महेश उके, उज्वल ठाकूर, श्रावण शिवणकर, प्रकाश फुंडे, गुणवंत पटले, किरण चुटे, शहवी खान, निलकंठ वाढई, रमेश चुटे, बुधराम विठ्ठले, नंदलाल पाथोडे, राजकुमार चव्हाण, मनिषा शिवणकर, धनवंता शिवणकर, भागवत रहिले, सुबोध शहारे, रामेश्वर चौधरी, गितेश्वरी शिवणकर, पारबता कटरे, आनंद शेंडे, नरेश बोपचे यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल