शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

By admin | Updated: June 15, 2016 02:23 IST

केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येतात. ग्रामीण भागातील नागरिकांचे

योजना प्रभावीपणे राबवा : बडोले यांचे अधिकाऱ्यांना निर्देशगोंदिया : केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येतात. ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी ग्रामीण विकासाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या वतीने करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सोमवार जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती छाया दसरे यांच्यासह सडक-अर्जुनी, गोरेगांव, अर्जुनी मोरगाव व सालेकसा पंचायत समिती सभापती यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. बडोले पुढे म्हणाले, केंद्र सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. केंद्र सरकारने ग्रामीण विकासासाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. या योजनांचा लाभ ग्रामीण जनतेला व्हावा, यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घ्यावे. सन २०१८ पर्यंत सर्वांना घरकुल देण्याचा मानस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आहे. घरकूल लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी यंत्रणेने अडचणी दूर करून सुसूत्रता आणावी. घरकूल योजनेचा नियमित आढावा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घ्यावे, असे सांगून पालकमंत्री बडोले पूढे म्हणाले, घरकूल योजनांचा मागील काही वर्षाचा जो निधी अद्याप मिळाला नाही त्यासाठी पाठपुरावा करावा. कृषी विभागाच्या योजनांचा लाभ शेतकरी बांधवांना देण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी समन्वय साधावा. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध झाली पाहिजे. ग्रामीण जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध होईल यासाठी आरोग्य यंत्रणेने लक्ष द्यावे, असे ते म्हणाले. डॉ. पुलकुंडवार म्हणाले, विविध लाभार्थ्यांच्या खात्यात आता योजनांचा निधी थेट जमा होतो. त्यामुळे योजनांच्या कामात पारदर्शकता, गतिमानता आली असल्याचे सांगितले. शौचालय बांधकामासाठी १२ हजार रूपये लाभार्थ्यांना देण्यात येत आहे. त्याचे निकष ठरले आहे. यामध्ये लाभार्थ्याला स्वत:च्या जवळून पैसा खर्च करूनसुध्दा शौचालय चांगल्या प्रकारे बांधता येणार असल्याचे सांगितले. कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यात अर्जुनी-मोरगाव तालुका आघाडीवर असल्याचे सांगून अर्जुनी मोरगावचे पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर म्हणाले, तालुक्यातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी जास्तीत जास्त धान बियाणे उपलब्ध झाले पाहिजे. निमगाव व बोंडगावदेवी येथे अंगणवाडी इमारतीचे काम त्वरित झाले पाहिजे. जेथे अंगणवाड्यांना इमारती नाही तेथे इमारती तातडीने बांधण्यात याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. तालुक्यातील लाभार्थ्यांचे सन २०१२-१३ मधील घरकूल निधी अभावी काम अर्धवट असल्याचे सांगून सालेकसा पंचायत समिती सभापती हिरालाल फाफनवाडे यांनी हा निधी मिळाला पाहिजे. तसेच विविध योजनांचा लाभ सालेकसासारख्या नक्षल, आदिवासी व दुर्गम भागातील जनतेला प्राधान्याने मिळावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्य्क्त केली. योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्यांना मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करून गोरेगांव पंचायत समितीचे सभापती दिलीप चौधरी म्हणाले, लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी योग्य सर्वेक्षण झाले पाहिजे. उत्कृष्ट व गुणवत्तापूर्ण कामे झाले पाहिजे, असेही ते म्हणाले. सभेला जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम, राजेश बागडे, राजेश देशमुख, अंबादे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. चव्हाण, कृषी विकास अधिकारी वंदना शिंदे, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता शर्मा, उपशिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशी, नरेंद भांडारकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राज गहलोत, लघू पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पथाडे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)