शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

पालकमंत्र्यांची अपेक्षा : पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा

By admin | Updated: August 18, 2016 00:26 IST

समाजाच्या वेदना पुढे आणण्याचे काम पत्रकार करतात. समाजाचे प्रतिबिंब त्यांच्या माध्यमातून व्यक्त होत असते.

गोंदिया : समाजाच्या वेदना पुढे आणण्याचे काम पत्रकार करतात. समाजाचे प्रतिबिंब त्यांच्या माध्यमातून व्यक्त होत असते. मात्र या लेखनीचा वापर करताना या क्षेत्रातील मर्यादेचे भान पत्रकारांना राहिले तर ते समाजासाठी उपयोगी ठरेल. पत्रकारांनी निर्भिडपणे टीका करावी, मात्र ती विधायक स्वरु पाची असावी, अशी अपेक्षा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केली. श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित टिळक गौरव पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष हाजी अल्ताफ शेख तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, जि.प.शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी.कटरे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, राईस मिलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष गुड्डू कारडा यांच्यासह एच.एच.पारधी, संजय राऊत, भगत ठकरानी उपस्थित होते. याप्रसंगी पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते भगत ठकरानी यांचा टिळक गौरव पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला. स्व.मनोहरभाई पटेल संपादकीय पुरस्कार मोहन पवार, स्वातंत्र्य सैनिक स्व.हिरालाल जैन विकास वार्ता प्रथम पुरस्कार राधेशाम भेंडारकर व द्वितीय पुरस्कार रितेश अग्रवाल यांना, वृत्तवाहिनी प्रथम पुरस्कार हरीश मोटघरे व द्वितीय पुरस्कार रवि सपाटे यांना, स्व.संतोष अग्रवाल स्मृती शोध पत्रकारिता प्रथम पुरस्कार राजू दोनोडे व प्रमोद नागनाथे यांना, तसेच उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार स्वतंत्र छायाचित्रकार प्रा.शरद मेश्राम यांना देण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये किशोर काळबांडे, सायी गाडेगोणे, चंचल अग्रवाल, आसमा खान व अनुश्रेय भोयर यांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, शब्दकोष, पर्यटन पुस्तिका व रोख पुरस्कार देवून गौरविण्यात आले. कार्यक्र मासाठी उदय चक्र धर, महेंद्र बिसेन, बाबाभाई शेख, सुरेश येळे, भरत घासले, विकास बोरकर, महेंद्र माने, आनंद मेश्राम, देवेंद्र बिसेन, प्रमोद भोयर, रु षी कावळे, नवीन अग्रवाल, दिलीप लिल्हारे, मनीष मुनेश्वर, विजय लाटा यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक चंद्रकुमार बहेकार यांनी केले. खेमेंद्र कटरे यांनी पुरस्कारांबद्दल माहिती दिली. संचालन सावन डोये यांनी केले. आसगाव येथे तंबाखू विक्री जोमात आसगाव : आरोग्याची धुळखाणी मांडत अख्या भंडारा जिल्ह्यात तंबाखुची विक्री पानठेला व किराणा दुकानातून खुलेआम होत आहे. आरोग्य अधिकारी व अन्न प्रशासनाची होत असलेली डोळेझाक अक्षम्य होत आहे. पुरुषांच्या बरोबरीने आता महिलाही तंबाखुच्या व्यसनात गुरफटल्याने तंबाखु विक्री खुलेआम वाढली आहे. कायद्याची भिती नसल्याने व अधिकारी लबाड झाल्याने व्यापाऱ्यांचे फावले आहे.