शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
3
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
4
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
5
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
6
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
7
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
8
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
9
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
10
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
11
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
12
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
13
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
14
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
15
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
16
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
17
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
18
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
19
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
20
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयात वाढतेय गर्दी

By admin | Updated: July 27, 2014 23:50 IST

या आठवडाभरापासून येत असलेल्या पावसामुळे शहरातील नाल्या घाणीने माखल्या आहेत. वातावरणातील बदलामुळे साथीच्या रोगांची लागण सुरु झाली आहे. त्यामुळे येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात

गोंदिया : या आठवडाभरापासून येत असलेल्या पावसामुळे शहरातील नाल्या घाणीने माखल्या आहेत. वातावरणातील बदलामुळे साथीच्या रोगांची लागण सुरु झाली आहे. त्यामुळे येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांनी उपचारासाठी गर्दी केली आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसह सर्वच चिंंतातुर झाले आहेत. पाऊसच नसल्याने वातावरण दूषित झाले आहे. ही स्थिती अनेक रोगांच्या आगमनाला कारणीभूत ठरल्याची कबुली वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. सध्या अतिसाराची लागण सुरु झाली आहे. अतिसाराने लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना हैराण केले आहे. खासगी रुग्णालये रुग्णांनी तुडूंब भरली आहेत. गरीब व सामान्य कुटुंबातील नागरिक मात्र पैशाअभावी केटीएस रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल होत आहेत. जिल्हाभरातून केटीएसमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. पावसाची हीच परिस्थिती कायम राहिल्यास अतिसारानंतर कावीळ, टायफाईड आदी साथीचे रोग पसरण्याची दाट शक्यता एका डॉक्टराने वर्तविली. गोंदियात अस्वच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भाव होत आहे. उघड्यावरील खाद्यपदार्थांची विक्री ही नित्याचीच बाब झाली आहे. त्यावरील माश्यांचे घोंघावणेही नित्याचे झाले आहे. दूषित पाणी पिण्यात येत असल्यामुळे साथीच्या रोगांना आमंत्रण मिळत असल्याची कबुली एका डॉक्टराने दिली. शहरातील बहुतांश भागातील नाल्या तुडूंब भरल्या असल्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव झाला आहे. सांडपाणी साचून राहात असल्याचे चित्र बऱ्याच वार्डात कायम आहे. नेहरू चौकात गेल्या चार-पाच दिवसांपासून पाणी साचून आहे. दररोज नागरिक पाणी तुडवत रस्ता ओलांडून जात आहेत. वातावरणात आलेला असमतोलपणा तसेच दूषित पदार्थांचे सेवन यामुळे अतिसार, डायरिया, फ्लू, मलेरिया, कॉलरा, टायफाईड, कावीळ आदी आजार बळावत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांची संख्या बघता साथीच्या रोगांनी पाय पसरविले असल्याचे चित्र स्पष्ट होते. बहुतांश वॉर्डात बेडव्यतिरिक्त जमिनीवरसुद्धा रुग्णांवर औषधोपचार केला जात आहे. गत आठवड्यापासून केटीएसमध्ये औषधोपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. नागरिकांनी साथीपासून वाचण्यासाठी स्वच्छतेकडे आवर्जून लक्ष द्यावे, शिळे अन्न खाऊ नये व वेळीच औषधोपचार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)