शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाढीसह मृतकांचा आलेख दररोज उंचावतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:29 IST

लगतच्या जिल्ह्यांमध्ये सुध्दा कोरोनाचा उद्रेक झाला असून, जिल्ह्यात सुद्धा दररोज आकडे वाढत असल्याने बिकट परिस्थिती निर्माण होत आहे. रुग्ण ...

लगतच्या जिल्ह्यांमध्ये सुध्दा कोरोनाचा उद्रेक झाला असून, जिल्ह्यात सुद्धा दररोज आकडे वाढत असल्याने बिकट परिस्थिती निर्माण होत आहे. रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. त्यातच ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. गुरुवारी जिल्ह्यात ६१६ बाधितांची नोंद झाली, तर १६ बाधितांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला, तर २५५ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. गुरुवारी आढळलेल्या ६१६ बाधितांमध्ये सर्वाधिक ३६४ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहे. तिरोडा ९८, गोरेगाव २, आमगाव ३५, सालेकसा १९, देवरी २८, सडक अर्जुनी ४६, अर्जुनी मोरगाव १८ आणि बाहेरील राज्यातील ६ रुग्णांचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या आनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १,१९,८०५ स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,०२,०२१ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत १,०९,३१९ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ९७,६७४ नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत २३,४४८ कोरोनाबाधित आढळले असून, यापैकी १७,०९९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ६,०३८ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, १८०८ नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.

.......

सहा दिवसांत वाढले साडेपाच हजार रुग्ण

जिल्ह्यात मागील आठवड्यापासून कोरोनाचा तीन आकडी पाढा कायम असल्याने बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, सहा दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात ५५०० कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता तरी जिल्हावासीयांनी सावध होण्याची गरज आहे.

........

पाच दिवसांत ५६ बाधितांचा मृत्यृू

जिल्ह्यात कोरोना वेगाने आपले पाय पसरत असताना बाधितांच्या मृत्यूृचा आकडादेखील वाढत आहे. मागील पाच दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात ५६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांसाठी ही निश्चितच चिंताजनक बाब आहे.