शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
2
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
3
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
4
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
5
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
6
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
7
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
8
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
9
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
10
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
11
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
12
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
13
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
14
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
15
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
16
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
17
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
18
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
19
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
20
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाढीसह मृतकांचा आलेख दररोज उंचावतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:29 IST

लगतच्या जिल्ह्यांमध्ये सुध्दा कोरोनाचा उद्रेक झाला असून, जिल्ह्यात सुद्धा दररोज आकडे वाढत असल्याने बिकट परिस्थिती निर्माण होत आहे. रुग्ण ...

लगतच्या जिल्ह्यांमध्ये सुध्दा कोरोनाचा उद्रेक झाला असून, जिल्ह्यात सुद्धा दररोज आकडे वाढत असल्याने बिकट परिस्थिती निर्माण होत आहे. रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. त्यातच ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. गुरुवारी जिल्ह्यात ६१६ बाधितांची नोंद झाली, तर १६ बाधितांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला, तर २५५ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. गुरुवारी आढळलेल्या ६१६ बाधितांमध्ये सर्वाधिक ३६४ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहे. तिरोडा ९८, गोरेगाव २, आमगाव ३५, सालेकसा १९, देवरी २८, सडक अर्जुनी ४६, अर्जुनी मोरगाव १८ आणि बाहेरील राज्यातील ६ रुग्णांचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या आनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १,१९,८०५ स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,०२,०२१ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत १,०९,३१९ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ९७,६७४ नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत २३,४४८ कोरोनाबाधित आढळले असून, यापैकी १७,०९९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ६,०३८ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, १८०८ नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.

.......

सहा दिवसांत वाढले साडेपाच हजार रुग्ण

जिल्ह्यात मागील आठवड्यापासून कोरोनाचा तीन आकडी पाढा कायम असल्याने बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, सहा दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात ५५०० कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता तरी जिल्हावासीयांनी सावध होण्याची गरज आहे.

........

पाच दिवसांत ५६ बाधितांचा मृत्यृू

जिल्ह्यात कोरोना वेगाने आपले पाय पसरत असताना बाधितांच्या मृत्यूृचा आकडादेखील वाढत आहे. मागील पाच दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात ५६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांसाठी ही निश्चितच चिंताजनक बाब आहे.