शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू
2
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
3
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
4
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
5
Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले
6
FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश
7
Vastu Shastra: हिरव्या रंगाचे पायपुसणे दारात ठेवा, यश, कीर्ती, भाग्योदयाचा ग्रीन सिग्नल मिळवा!
8
Operation Sindoor : भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा रात्रीत खात्मा केला; पाकिस्तानमधील हल्ल्याचे फोटो आले समोर
9
“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य
10
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
11
ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन; 'श्यामची आई', '३ इडियट्स' सिनेमांमध्ये केलं होतं काम
12
Stock Market Today: आधी घसरण मग तेजी, Sensex १०० अंकांनी वधारला; ऑटो-बँकिंग स्टॉक्समध्ये मोठी खरेदी
13
“आगे बढ़ते रहो, ऐसाही बदला लेते रहो”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर शहीद नरवाल कुटुंबाने व्यक्त केला आनंद
14
"आम्ही मुस्लिमांना घर देत नाही", अली गोनी अन् जास्मीनला मुंबईत घर शोधताना आल्या अडचणी
15
आता तरी एकता दाखवा; काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकाऱ्याने एअर स्ट्राईकला म्हटले 'टुच्चेपणा'
16
Operation Sindoor: 'जय हिंद', राहुल गांधींची पाकिस्तानातील एअर स्ट्राईकनंतर पहिली पोस्ट; काय म्हणाले? 
17
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
18
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
19
Operation Sindoor : "जय हिंद की सेना...!", 'ऑपरेशन सिंदूर'वर रितेश देशमुखचं रात्री ३ वाजून २ मिनिटांनी ट्विट
20
Operation Sindoor : "अब मिट्टी में मिल जाओगे...", भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'चं देवोलिनानं केलं कौतुक

ग्रामगीता भागवत सप्ताहाची सांगता

By admin | Updated: November 17, 2014 22:57 IST

जवळच असलेल्या घुसोबाटोला येथील हभप फलहारी महाराज यांच्या अविरत प्रयत्नाने व नियमित वास्तव्याने हजारो भाविकांचे श्रध्दास्थान बसलेले श्रीक्षेत्र रामकृष्ण मंदिर जानकी आश्रम त्रिकुट

बोंडगावदेवी : जवळच असलेल्या घुसोबाटोला येथील हभप फलहारी महाराज यांच्या अविरत प्रयत्नाने व नियमित वास्तव्याने हजारो भाविकांचे श्रध्दास्थान बसलेले श्रीक्षेत्र रामकृष्ण मंदिर जानकी आश्रम त्रिकुट पहाडी येथे मागील सात दिवसांपासून सुरू असलेले श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ ग्रामगीता संतकथा सप्ताहाची सांगता कीर्तन प्रवचनाने झाली. यावेळी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. भागवत सप्ताहाच्या सांगता समारंभाला खा. नाना पटोले प्रामुख्याने उपस्थित होते. त्रिकुट पहाडी या श्रध्दास्थानी उपस्थित हजारो भाविकांना मार्गदर्शन करताना खा. नाना पटोले म्हणाले, समाजातील तळागाळातील जनसामान्यांची सेवा हिच खरी ईश्वरसेवा आहे. समाजावर कोणतीही आपत्ती आली तरी न घाबरता हिंमतीने दूर करता येतात. फलहारी महाराज हे समाज व्यसनमुक्त करण्यासाठी अविरत परिश्रम घेत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. दिग्रस येथील हभप रामेश्वर खोडे महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले, समाजाला दिशा देण्याकरिता आणि आदर्श समाज घडविण्याकरिता महानत्यागी कर्मयोगी संत गाडगे महाराजांनी संसाराचा त्याग केला. राजा शुध्दोधनाचे चिरंजीव तथागत भगवान गौतम बुध्दांनी आपला राजवैभव सोडून गृहत्याग केला. श्रावण बाळाने आई-बाबाच्या सुखाकरिता देह त्यागले. याप्रमाणे असामान्य कर्तृत्ववान मानव समाजात होऊन गेले. सर्व जगात भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे. अशा पवित्र संस्कृतीला कलंक लागेल अशी कृती आजच्या युवकांनी करू नये. समाजाचे भाग्यविधाता ठरणाऱ्या युवकांनी व्यसनाधिनतेला तिलांजली देऊन एक नवा आदर्श घडवावा, असे आवाहन त्यांनी केले. खाडे महाराज पुढे म्हणाले की, गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी समाज जागृतीकरिता आपले आयुष्य खर्ची घातले. गावोगावी जावून कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले. त्यांनी आपल्या वाणीतून सर्व जनतेला अंधश्रध्दा व व्यसनाधिनतेपासून रोखले. व्यसन व अंधश्रध्देमुळे संसाराची राखरांगोळी कशी होते हे त्यांनी पारखले होते. आजची युवा पिढी व्यसनाधिनतेच्या आहारी गेली आहे. दारूच्या नशेत नको ते कार्य युवकांकडून घडून अनेकदा कौटुंबीक आणि सामाजिक ऐक्य धोक्यात येते. आयुष्याची राखरांगोळी होते. समाजामध्ये नवचैतन्य निर्माण होऊन गावागावात शांतात अबाधित राहण्यासाठी गावातून मदिरा हद्दपार होण्जासाढू गावात दारूबंदी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. सात दिवस खोडे महाराज यांनी आपल्या अमृतवाणीने बोधामृत पाजले. त्यांच्या मार्गदर्शनात ९७ लोकांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केला.