शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामगीता भागवत सप्ताहाची सांगता

By admin | Updated: November 17, 2014 22:57 IST

जवळच असलेल्या घुसोबाटोला येथील हभप फलहारी महाराज यांच्या अविरत प्रयत्नाने व नियमित वास्तव्याने हजारो भाविकांचे श्रध्दास्थान बसलेले श्रीक्षेत्र रामकृष्ण मंदिर जानकी आश्रम त्रिकुट

बोंडगावदेवी : जवळच असलेल्या घुसोबाटोला येथील हभप फलहारी महाराज यांच्या अविरत प्रयत्नाने व नियमित वास्तव्याने हजारो भाविकांचे श्रध्दास्थान बसलेले श्रीक्षेत्र रामकृष्ण मंदिर जानकी आश्रम त्रिकुट पहाडी येथे मागील सात दिवसांपासून सुरू असलेले श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ ग्रामगीता संतकथा सप्ताहाची सांगता कीर्तन प्रवचनाने झाली. यावेळी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. भागवत सप्ताहाच्या सांगता समारंभाला खा. नाना पटोले प्रामुख्याने उपस्थित होते. त्रिकुट पहाडी या श्रध्दास्थानी उपस्थित हजारो भाविकांना मार्गदर्शन करताना खा. नाना पटोले म्हणाले, समाजातील तळागाळातील जनसामान्यांची सेवा हिच खरी ईश्वरसेवा आहे. समाजावर कोणतीही आपत्ती आली तरी न घाबरता हिंमतीने दूर करता येतात. फलहारी महाराज हे समाज व्यसनमुक्त करण्यासाठी अविरत परिश्रम घेत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. दिग्रस येथील हभप रामेश्वर खोडे महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले, समाजाला दिशा देण्याकरिता आणि आदर्श समाज घडविण्याकरिता महानत्यागी कर्मयोगी संत गाडगे महाराजांनी संसाराचा त्याग केला. राजा शुध्दोधनाचे चिरंजीव तथागत भगवान गौतम बुध्दांनी आपला राजवैभव सोडून गृहत्याग केला. श्रावण बाळाने आई-बाबाच्या सुखाकरिता देह त्यागले. याप्रमाणे असामान्य कर्तृत्ववान मानव समाजात होऊन गेले. सर्व जगात भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे. अशा पवित्र संस्कृतीला कलंक लागेल अशी कृती आजच्या युवकांनी करू नये. समाजाचे भाग्यविधाता ठरणाऱ्या युवकांनी व्यसनाधिनतेला तिलांजली देऊन एक नवा आदर्श घडवावा, असे आवाहन त्यांनी केले. खाडे महाराज पुढे म्हणाले की, गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी समाज जागृतीकरिता आपले आयुष्य खर्ची घातले. गावोगावी जावून कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले. त्यांनी आपल्या वाणीतून सर्व जनतेला अंधश्रध्दा व व्यसनाधिनतेपासून रोखले. व्यसन व अंधश्रध्देमुळे संसाराची राखरांगोळी कशी होते हे त्यांनी पारखले होते. आजची युवा पिढी व्यसनाधिनतेच्या आहारी गेली आहे. दारूच्या नशेत नको ते कार्य युवकांकडून घडून अनेकदा कौटुंबीक आणि सामाजिक ऐक्य धोक्यात येते. आयुष्याची राखरांगोळी होते. समाजामध्ये नवचैतन्य निर्माण होऊन गावागावात शांतात अबाधित राहण्यासाठी गावातून मदिरा हद्दपार होण्जासाढू गावात दारूबंदी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. सात दिवस खोडे महाराज यांनी आपल्या अमृतवाणीने बोधामृत पाजले. त्यांच्या मार्गदर्शनात ९७ लोकांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केला.