शहरं
Join us  
Trending Stories
1
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
2
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
3
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
4
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
5
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
6
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
7
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
8
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
9
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
10
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
11
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
12
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
13
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
14
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका
15
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
16
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
17
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
18
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव
19
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
20
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती

‘ग्राम उदय ते भारत उदय’

By admin | Updated: April 20, 2016 02:05 IST

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपासून राष्ट्रीय पंचायत दिनापर्यंत भारत ...

इसापूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपासून राष्ट्रीय पंचायत दिनापर्यंत भारत सरकारच्या पंचायतराज मंत्रालय व महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये १४ एप्रिल ते २४ एप्रिलपर्यंत ग्राम उदय ते भारत उदय कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ग्रामपंचायत कार्यालय इसापूर येथे अभियानाची सुरूवात १४ एप्रिलपासून करण्यात आली. या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. या अभियानात पंचायतराज संस्थाचे बळकटीकरण, शेतकरी वर्गाचे जीवनमान उंचावणे, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे जीवनमान उंचावणे तसेच सामाजिक सलोखा नेहमीसाठी अबाधित राखणे, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना, ग्रामविकास सभेच्या माध्यमातून कृषी सहायक बी.एन. येरणे यांनी १८ एप्रिलला ग्रामपंचायतमध्ये आयोजित ग्रामविकास सभेत कृषी विषयक माहिती दिली. तसेच सर्व शेतकऱ्यांना पीक विमा व इतर कृषी विषयक मार्गदर्शन केले. या वेळी ग्रामविस्तार अधिकारी डी.एस. मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य दामोधर चांदेवार, ग्रा.पं. सदस्य डिगेश्वरी चांदेवार, ग्रा.पं. सदस्य सुनिता गेडाम, जेष्ठ नागरिक शालिकराम भोयर, कृषी सहायक बी.एन. येरणे, ग्रामरोजगार सेवक संतोष रोकडे, ग्रामपंचायत कर्मचारी सत्यपाल गेडाम व इतर मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)