शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

ग्राम स्वराज्य अभियानाला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 01:11 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून केंद्र व राज्य शासनाच्यावतीने सर्व ग्रामपंचायतींमध्ये १४ एप्रिल ते ५ मे २०१८ या कालावधीत ग्राम स्वराज्य अभियान राबविण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून केंद्र व राज्य शासनाच्यावतीने सर्व ग्रामपंचायतींमध्ये १४ एप्रिल ते ५ मे २०१८ या कालावधीत ग्राम स्वराज्य अभियान राबविण्यात येत आहे. त्याचा जिल्हास्तरीय शुभारंभ तालुक्यातील येरंडी-देव ग्रामपंचायतमध्ये करण्यात आला.अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कबीरदास रामटेके होते. मार्गदर्शक म्हणून पं.स. गटविकास अधिकारी नारायण प्रसाद जमईवार, उद्घाटक सरपंच रेखा खोब्रागडे, अतिथी म्हणून उपसरपंच लक्ष्मण बागडे, सामजिक कार्यकर्ते रत्नदीप दहिवले, अनिल दहीवले, ग्रा.पं. सदस्य अस्मिता रामटेके, राजन खोब्रागडे, बालक बोरकर, पोलीस पाटील खेमराज गेडाम, तंमुसचे अध्यक्ष सुरेश रंगारी, नरेश खोब्रागडे, वनमाला चौरे, प्यारेलाल रंगारी, विठ्ठल तागडे, कैलास इस्कापे, माजी सरपंच व्यंकट खोब्रागडे, लैलेश्वर शिवणकर, विस्तार अधिकारी अनूपकुमार भावे, ग्रामसेवक टी.पी. हुकरे तथा गावकरी उपस्थित होते.सर्वप्रथम महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले व तथागत बुद्ध यांच्या प्रतिमांना माल्यार्पण व दीप प्रज्वलित करुन सरपंच रेखा खोब्रागडे यांनी ग्राम स्वराज्य अभियानाचे उद्घाटन केले. कबीरदास रामटेके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. बुद्धवंदना घेवून अभियानाला सुरुवात करण्यात आली. विस्तार अधिकारी अनूपकुमार भावे यांनी प्रास्ताविकातून ग्रामस्वराज्य अभियानाची माहिती देवून जिल्हा स्तरावरुन येरंडी (देव) ग्रामपंचायतची या अभियानासाठी निवड झाल्याचे सांगितले.या वेळी गट विकास अधिकारी जमईवार यांनी मार्गदर्शनातून, महाराष्टÑ शासनाच्या वतीने १४ एप्रिल या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती दिनापासून ५ मे २०१८ या कालावधीत ग्राम स्वराज्य अभियान राबविण्याबाबत केंद्र शासनाकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने सदर कालावधीत जास्तीत जास्त गरीब कुटुंब असलेल्या गावांची निवड करण्यात आली आहे. ‘सबका साथ-सबका विकास’ या विशेष मोहिमेद्वारे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री बिजली घर योजना (सौभाग्य), प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व मिशन इंद्रधनुष्य अशा प्रकारच्या योजना सर्व गावांमध्ये राबवून त्या ठिकाणी सर्व योजना १०० टक्के पूर्ण करण्याचा मानस आहे. या अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील ३ तालुक्यांतील ३ गावांचा समावेश असून त्यामध्ये तिरोडा तालुक्यातील घोगरा, आमगाव तालुक्यातील कुंभारटोली व अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येरंडी (देव) या गावांचा समावेश आहे. यासाठी केंद्र शासनाने जिल्हानिहाय नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.या अभियानाच्या माध्यमातून १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरी करण्यात आली. १८ एप्रिल रोजी स्वच्छ भारत दिवसानिमित्त ग्रामसफाई व शौचालय सफाई अभियान राबविले, २० एप्रिल रोजी उज्ज्वला दिवसानिमित्त प्रत्येक घरात गॅस हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. २४ एप्रिल रोजी राष्टÑीय पंचायत राज दिवस या निमित्त गावकऱ्यांना भेडसावणाºया विविध अडचणी संदर्भात मार्गदर्शन होणार आहे. २८ एप्रिल रोजी ग्राम स्वराज्य दिवस म्हणून प्रत्येक घरी वीज कनेक्शन हा उपक्रम होईल. ३० एप्रिल रोजी आयुष्यमान भारत दिवस म्हणून आरोग्य संदर्भात विशेष मार्गदर्शन, २ मे रोजी शेतकरी कल्याण दिवस निमित्ताने शेतकरी सुदृढ या विषयावर मार्गदर्शन होईल. ५ मे रोजी आजीविका दिवस या निमित्त विविध योजनांची माहिती देण्यात येईल. अशी या अभियानाची सविस्तर माहिती खंड विकास अधिकारी जमईवार यांनी दिली.प्रास्ताविक विस्तार अधिकारी अनुपकुमार भावे यांनी मांडले. संचालन सतिश मेश्राम यांनी केले. आभार ग्रामसेवक पी.एस. हुकरे यांनी मानले. कार्यक्रमाला ग्रामवासी महिला-पुरुष व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.