शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
7
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
8
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
9
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
11
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
12
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
13
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
14
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
15
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
16
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
17
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
18
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
19
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
20
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!

एक लाखाच्या पुरस्कारावर ग्रामपंचायतींचा डोळा

By admin | Updated: November 13, 2016 01:14 IST

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या पुरस्कार रकमेत शासनाने भरघोस वाढ केली.

गाडगेबाबा स्वच्छता अभियान : तालुकास्तरीय रकमेत वाढ केल्याने उत्साहगोंदिया : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या पुरस्कार रकमेत शासनाने भरघोस वाढ केली. पंचायत समितीस्तरावर प्रथम आलेल्या ग्रामपंचायतींना आता एक लाखाचा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यामुळे लोकसहभाग वाढवून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये चांगलीच स्पर्धा निर्माण होत आहे.राज्यात सन २०००-२००१ पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा राबविण्यात येत आहे. ग्रामीण जनतेचे आरोग्यमान उंचावणे हाच या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. स्वच्छता व ग्रामविकासाशी निगडीत क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना या अभियानाच्या माध्यमातून तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर पुरस्कृत केले जाते. मात्र ग्रामीण भागात अशुध्द पाणी, अस्वच्छ परिसर आणि वैयक्तिक स्वच्छतेअभावी उद्भवणाऱ्या आजारांच्या प्रमाणात वाढ झाली. परिणामी अभियानाचा उद्देश फारसा सफल न झाल्याने शासनाने पुरस्काराच्या रकमेत वाढ करून लोकसहभाग वाढविण्यावर भर दिला आहे. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा घेण्यात येते. या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतींना २५ हजार रुपयांचे प्रथम, १५ हजार रुपयांचे द्वितीय आणि १० हजार रुपयांचे तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात येत होते. आता या रकमेत भरघोष वाढ करण्यात आली. शासनाच्या निर्णयान्वये आता तालुकास्तरावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतींना एक लाख रुपयांचे प्रथम, ५० हजार रुपयांचे द्वितीय आणि २५ हजार रुपयांचे तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर प्रथम आलेल्या ग्रामपंचायतीला पाच लाख रुपये प्रथम, तीन लाख रुपयांचे द्वितीय, दोन लाख रुपयांचे तृतीय, विभागस्तरावर प्रथम आलेल्या ग्रामपंचायतीला १० लाख रुपयांचे प्रथम, आठ लाख रुपयांचे द्वितीय, सहा लाख रुपयांचे तृतीय पुरस्कार तर राज्यस्तरावर प्रथम आलेल्या ग्रामपंचायतीला २५ लाख रुपयांचे प्रथम, २० लाख रुपयांचे द्वितीय आणि १५ लाख रुपयांचे तृतीय पुरस्कार प्रदान केले जातात. (जिल्हा प्रतिनिधी)आरोग्याचे गमक स्वच्छतेतस्वच्छता ही प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याशी निगडीत बाब आहे. आपले गाव स्वच्छ असेल तर आपलेच आरोग्य अबाधीत राखले जाईल. शिवाय स्वच्छतेसाठी कार्य केल्यामुळे आपल्या ग्रामपंचायतींना भरघोस पुरस्कार मिळणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनी अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून लोकसहभाग वाढवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे.