शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

एक लाखाच्या पुरस्कारावर ग्रामपंचायतींचा डोळा

By admin | Updated: November 13, 2016 01:14 IST

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या पुरस्कार रकमेत शासनाने भरघोस वाढ केली.

गाडगेबाबा स्वच्छता अभियान : तालुकास्तरीय रकमेत वाढ केल्याने उत्साहगोंदिया : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या पुरस्कार रकमेत शासनाने भरघोस वाढ केली. पंचायत समितीस्तरावर प्रथम आलेल्या ग्रामपंचायतींना आता एक लाखाचा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यामुळे लोकसहभाग वाढवून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये चांगलीच स्पर्धा निर्माण होत आहे.राज्यात सन २०००-२००१ पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा राबविण्यात येत आहे. ग्रामीण जनतेचे आरोग्यमान उंचावणे हाच या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. स्वच्छता व ग्रामविकासाशी निगडीत क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना या अभियानाच्या माध्यमातून तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर पुरस्कृत केले जाते. मात्र ग्रामीण भागात अशुध्द पाणी, अस्वच्छ परिसर आणि वैयक्तिक स्वच्छतेअभावी उद्भवणाऱ्या आजारांच्या प्रमाणात वाढ झाली. परिणामी अभियानाचा उद्देश फारसा सफल न झाल्याने शासनाने पुरस्काराच्या रकमेत वाढ करून लोकसहभाग वाढविण्यावर भर दिला आहे. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा घेण्यात येते. या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतींना २५ हजार रुपयांचे प्रथम, १५ हजार रुपयांचे द्वितीय आणि १० हजार रुपयांचे तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात येत होते. आता या रकमेत भरघोष वाढ करण्यात आली. शासनाच्या निर्णयान्वये आता तालुकास्तरावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतींना एक लाख रुपयांचे प्रथम, ५० हजार रुपयांचे द्वितीय आणि २५ हजार रुपयांचे तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर प्रथम आलेल्या ग्रामपंचायतीला पाच लाख रुपये प्रथम, तीन लाख रुपयांचे द्वितीय, दोन लाख रुपयांचे तृतीय, विभागस्तरावर प्रथम आलेल्या ग्रामपंचायतीला १० लाख रुपयांचे प्रथम, आठ लाख रुपयांचे द्वितीय, सहा लाख रुपयांचे तृतीय पुरस्कार तर राज्यस्तरावर प्रथम आलेल्या ग्रामपंचायतीला २५ लाख रुपयांचे प्रथम, २० लाख रुपयांचे द्वितीय आणि १५ लाख रुपयांचे तृतीय पुरस्कार प्रदान केले जातात. (जिल्हा प्रतिनिधी)आरोग्याचे गमक स्वच्छतेतस्वच्छता ही प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याशी निगडीत बाब आहे. आपले गाव स्वच्छ असेल तर आपलेच आरोग्य अबाधीत राखले जाईल. शिवाय स्वच्छतेसाठी कार्य केल्यामुळे आपल्या ग्रामपंचायतींना भरघोस पुरस्कार मिळणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनी अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून लोकसहभाग वाढवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे.