शहरं
Join us  
Trending Stories
1
"४ लाख महिलांवर गँगरेप, स्वत:च्याच लोकांवर बॉम्बस्फोट.."; UN मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं
2
काँग्रेस अन् मविआला नव्या भिडूची गरज नाही; मनसेला सोबत घेण्यास हर्षवर्धन सपकाळांचा नकार
3
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
4
'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!
5
PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट
6
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरला अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
7
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; PSU Stocks मध्ये आजही खरेदी
8
'७ विमाने पाडली होती', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा जुनाच सूर लावला; भारत आणि पाकिस्तानबद्दल काय म्हणाले?
9
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
10
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
11
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
12
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
13
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
14
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
15
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
16
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
17
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
18
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
19
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
20
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 

एक लाखाच्या पुरस्कारावर ग्रामपंचायतींचा डोळा

By admin | Updated: November 13, 2016 01:14 IST

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या पुरस्कार रकमेत शासनाने भरघोस वाढ केली.

गाडगेबाबा स्वच्छता अभियान : तालुकास्तरीय रकमेत वाढ केल्याने उत्साहगोंदिया : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या पुरस्कार रकमेत शासनाने भरघोस वाढ केली. पंचायत समितीस्तरावर प्रथम आलेल्या ग्रामपंचायतींना आता एक लाखाचा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यामुळे लोकसहभाग वाढवून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये चांगलीच स्पर्धा निर्माण होत आहे.राज्यात सन २०००-२००१ पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा राबविण्यात येत आहे. ग्रामीण जनतेचे आरोग्यमान उंचावणे हाच या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. स्वच्छता व ग्रामविकासाशी निगडीत क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना या अभियानाच्या माध्यमातून तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर पुरस्कृत केले जाते. मात्र ग्रामीण भागात अशुध्द पाणी, अस्वच्छ परिसर आणि वैयक्तिक स्वच्छतेअभावी उद्भवणाऱ्या आजारांच्या प्रमाणात वाढ झाली. परिणामी अभियानाचा उद्देश फारसा सफल न झाल्याने शासनाने पुरस्काराच्या रकमेत वाढ करून लोकसहभाग वाढविण्यावर भर दिला आहे. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा घेण्यात येते. या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतींना २५ हजार रुपयांचे प्रथम, १५ हजार रुपयांचे द्वितीय आणि १० हजार रुपयांचे तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात येत होते. आता या रकमेत भरघोष वाढ करण्यात आली. शासनाच्या निर्णयान्वये आता तालुकास्तरावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतींना एक लाख रुपयांचे प्रथम, ५० हजार रुपयांचे द्वितीय आणि २५ हजार रुपयांचे तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर प्रथम आलेल्या ग्रामपंचायतीला पाच लाख रुपये प्रथम, तीन लाख रुपयांचे द्वितीय, दोन लाख रुपयांचे तृतीय, विभागस्तरावर प्रथम आलेल्या ग्रामपंचायतीला १० लाख रुपयांचे प्रथम, आठ लाख रुपयांचे द्वितीय, सहा लाख रुपयांचे तृतीय पुरस्कार तर राज्यस्तरावर प्रथम आलेल्या ग्रामपंचायतीला २५ लाख रुपयांचे प्रथम, २० लाख रुपयांचे द्वितीय आणि १५ लाख रुपयांचे तृतीय पुरस्कार प्रदान केले जातात. (जिल्हा प्रतिनिधी)आरोग्याचे गमक स्वच्छतेतस्वच्छता ही प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याशी निगडीत बाब आहे. आपले गाव स्वच्छ असेल तर आपलेच आरोग्य अबाधीत राखले जाईल. शिवाय स्वच्छतेसाठी कार्य केल्यामुळे आपल्या ग्रामपंचायतींना भरघोस पुरस्कार मिळणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनी अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून लोकसहभाग वाढवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे.