शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शाळांची घंटा वाजणार ग्रामपंचायत, पालकांच्या एनओसीनंतरच....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:21 IST

गोंदिया : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षापासून शाळा, महाविद्यालये सर्वच बंद आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. यंदा नवीन ...

गोंदिया : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षापासून शाळा, महाविद्यालये सर्वच बंद आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. यंदा नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली असली तरी अद्यापही विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली नाही. त्यामुळे ऑनलाईनवर शाळांचा डोलारा सुरू आहे. मात्र, आता कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे आटोक्यात आला आहे. त्यामुळे येत्या १५ जुलैपासून इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यासाठी कोरोनामुक्त गावांना प्राधान्य देण्यात आले. शाळा सुरू करण्यासाठी शाळांचा ठराव आणि पालकांचे संमतीपत्र मिळाल्यावर शाळा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी गाव स्तरावर सरपंच, ग्रामसेवक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याध्यापक यांचा समावेश असलेल्या सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून गावस्तरावर निर्णय घेऊन तसा प्रस्ताव जि. प. शिक्षण विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर १५ जुलैपासून इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू केले जाणार आहे. त्यासाठी जि. प. शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे.

................

जिल्ह्यातील एकूण गावे : ९३६

जिल्ह्यातील एकूण शाळा

जिल्हा परिषद : १०३९

अनुदानीत : ३४५

कायम विना अनुदानित : २४५

.................

कोरोनामुक्त असलेली गावे : ९१०

..................

तालुकानिहाय कोरोनामुक्त गावे

गोंदिया

गोरेगाव

तिरोडा

अर्जुनी मोरगाव

सडक अर्जुनी

आमगाव

सालेकसा

देवरी

...............

आतापर्यंत २० ग्रामपंचायतींचा ठराव

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे आटोक्यात आला असून, तिरोडा तालुका पूर्णपणे कोरोनामुक्त आहे, तर इतर सात तालुक्यांत चार ते पाच रुग्ण आहेत. दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांचीसुद्धा चिंता वाढली आहे. त्यामुळे आता शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यातील २० ग्रामपंचायतीने शाळा सुरू करण्याबाबतचा ठराव मंजूर करून शिक्षण विभागाकडे पाठविला आहे.

...........

पालकांची हा ......

मागील दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थी शिक्षणापासून दूर जात आहे, तर घरच्या घरी राहून मुलांचीसुद्धा चिडचिड वाढली. आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून, शाळा सुरू झाल्यास आम्हीसुद्धा पाल्यांना शाळेत पाठवू. - देविदास उमक, पालक.

.................

जिल्ह्यात आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून, सर्व व्यवहारदेखील सुरळीत झाले आहेत. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून आणि योग्य काळजी घेऊन शाळा सुरू करण्यास काहीच हरकत नाही, तर मुले घरच्या घरी राहून त्रस्त झाले आहेत. त्यामुळे शाळा सुरू झाल्यास पाल्यांना शाळेत पाठवू. - संगिता गुप्ता.

...............

शासनाने १५ जुलैपासून आठवी ते बारावीचे वर्ग ऑफलाईन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीकडून ठराव आणि पालकांची एनओसी मागितली जात आहे. यासाठी एक समितीदेखील तयार करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून ठराव प्राप्त झाल्यानंतरच शाळा सुरू करण्यात येतील.

- राजकुमार हिवारे, शिक्षणाधिकारी.

....................

१०३९ शाळा आहेत सज्ज

- नवीन शैक्षणिक सत्राला २८ जूनपासून सुरुवात झाली. त्याच धर्तीवर सर्व शाळा सुरू करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.

- इयता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग १५ जुलैपासून सुरू होणार असून, त्यासाठी १०३९ शाळा सज्ज आहे.

- शालेय परिसर, वर्गखोल्यांची साफसफाई आणि रंगरगोटीसुद्धा करून ठेवण्यात आली आहे.

- कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजनासुद्धा करण्यात आल्या आहेत.