शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
4
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
5
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
6
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
7
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
8
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
9
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
10
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
11
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
12
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
13
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
14
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
15
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
16
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
17
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
18
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
19
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
20
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर

शाळांची घंटा वाजणार ग्रामपंचायत, पालकांच्या एनओसीनंतरच....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:21 IST

गोंदिया : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षापासून शाळा, महाविद्यालये सर्वच बंद आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. यंदा नवीन ...

गोंदिया : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षापासून शाळा, महाविद्यालये सर्वच बंद आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. यंदा नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली असली तरी अद्यापही विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली नाही. त्यामुळे ऑनलाईनवर शाळांचा डोलारा सुरू आहे. मात्र, आता कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे आटोक्यात आला आहे. त्यामुळे येत्या १५ जुलैपासून इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यासाठी कोरोनामुक्त गावांना प्राधान्य देण्यात आले. शाळा सुरू करण्यासाठी शाळांचा ठराव आणि पालकांचे संमतीपत्र मिळाल्यावर शाळा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी गाव स्तरावर सरपंच, ग्रामसेवक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याध्यापक यांचा समावेश असलेल्या सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून गावस्तरावर निर्णय घेऊन तसा प्रस्ताव जि. प. शिक्षण विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर १५ जुलैपासून इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू केले जाणार आहे. त्यासाठी जि. प. शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे.

................

जिल्ह्यातील एकूण गावे : ९३६

जिल्ह्यातील एकूण शाळा

जिल्हा परिषद : १०३९

अनुदानीत : ३४५

कायम विना अनुदानित : २४५

.................

कोरोनामुक्त असलेली गावे : ९१०

..................

तालुकानिहाय कोरोनामुक्त गावे

गोंदिया

गोरेगाव

तिरोडा

अर्जुनी मोरगाव

सडक अर्जुनी

आमगाव

सालेकसा

देवरी

...............

आतापर्यंत २० ग्रामपंचायतींचा ठराव

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे आटोक्यात आला असून, तिरोडा तालुका पूर्णपणे कोरोनामुक्त आहे, तर इतर सात तालुक्यांत चार ते पाच रुग्ण आहेत. दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांचीसुद्धा चिंता वाढली आहे. त्यामुळे आता शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यातील २० ग्रामपंचायतीने शाळा सुरू करण्याबाबतचा ठराव मंजूर करून शिक्षण विभागाकडे पाठविला आहे.

...........

पालकांची हा ......

मागील दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थी शिक्षणापासून दूर जात आहे, तर घरच्या घरी राहून मुलांचीसुद्धा चिडचिड वाढली. आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून, शाळा सुरू झाल्यास आम्हीसुद्धा पाल्यांना शाळेत पाठवू. - देविदास उमक, पालक.

.................

जिल्ह्यात आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून, सर्व व्यवहारदेखील सुरळीत झाले आहेत. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून आणि योग्य काळजी घेऊन शाळा सुरू करण्यास काहीच हरकत नाही, तर मुले घरच्या घरी राहून त्रस्त झाले आहेत. त्यामुळे शाळा सुरू झाल्यास पाल्यांना शाळेत पाठवू. - संगिता गुप्ता.

...............

शासनाने १५ जुलैपासून आठवी ते बारावीचे वर्ग ऑफलाईन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीकडून ठराव आणि पालकांची एनओसी मागितली जात आहे. यासाठी एक समितीदेखील तयार करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून ठराव प्राप्त झाल्यानंतरच शाळा सुरू करण्यात येतील.

- राजकुमार हिवारे, शिक्षणाधिकारी.

....................

१०३९ शाळा आहेत सज्ज

- नवीन शैक्षणिक सत्राला २८ जूनपासून सुरुवात झाली. त्याच धर्तीवर सर्व शाळा सुरू करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.

- इयता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग १५ जुलैपासून सुरू होणार असून, त्यासाठी १०३९ शाळा सज्ज आहे.

- शालेय परिसर, वर्गखोल्यांची साफसफाई आणि रंगरगोटीसुद्धा करून ठेवण्यात आली आहे.

- कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजनासुद्धा करण्यात आल्या आहेत.