शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी यांना माहिती प्रशिक्षणाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:27 IST

केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींची निवडणूक अलीकडेच पार पडली. त्यात निवडून आलेल्या गाव पुढाऱ्यांनी गावच्या विकासाची कटिबद्धता ...

केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींची निवडणूक अलीकडेच पार पडली. त्यात निवडून आलेल्या गाव पुढाऱ्यांनी गावच्या विकासाची कटिबद्धता स्वीकारून सदस्य-पदाधिकारी यांनी पदभार स्वीकारला आहे. बहुतेक गाव पुढारी हे नवीन आहेत. गावच्या विकासासाठी शासनाच्या ध्येय धोरणाची पुरेशी माहिती असल्याशिवाय गाव विकासाची दिशा ठरविता येत नाही. परिणामी गावाचा विकास होत नाही. त्यामुळे नवनिर्वाचित सदस्य पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे.

पंचायत राज व्यवस्थेतील सरपंच, उपसरपंच, सदस्य हे महत्त्वाचे घटक असून, गाव विकासाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी योजनांची माहिती सरपंच, उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्यांना असणे आवश्यक आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती ग्रामसेवकाला, ग्रामविकास अधिकाऱ्यांना पंचायत समिती स्तरावरून लेखी स्वरूपात देण्यात येते. मात्र, या योजनांची माहिती अनेक गावांमध्ये ग्रामसभेतून दिली जात नाही, अशी नागरिकांची ओरड असते. सध्या तर कोरोना महामारीच्या प्रतिबंधात्मक अडचणीमुळे ग्रामसभांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य शासकीय योजनांच्या माहितीपासून अनभिज्ञ आहेत. काही ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी गावातील विशिष्ट मंडळींनाच योजनांची माहिती सांगून मोकळे होतात, अशी अनेकदा नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होत राहतात. त्यामुळे शासकीय योजनांपासून मुख्य लाभार्थी वंचित राहतात. त्याचबरोबर गावचा अपेक्षित विकास साधता येत नाही. परिणामी गावाचे अथवा नागरिकांचे नुकसान होत असते. त्यासाठी सरपंच, उपसरपंच आणि नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना ग्रामविकासासंबंधी प्रशिक्षण देण्याची गरज आहे.