शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी यांना माहिती प्रशिक्षणाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:27 IST

केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींची निवडणूक अलीकडेच पार पडली. त्यात निवडून आलेल्या गाव पुढाऱ्यांनी गावच्या विकासाची कटिबद्धता ...

केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींची निवडणूक अलीकडेच पार पडली. त्यात निवडून आलेल्या गाव पुढाऱ्यांनी गावच्या विकासाची कटिबद्धता स्वीकारून सदस्य-पदाधिकारी यांनी पदभार स्वीकारला आहे. बहुतेक गाव पुढारी हे नवीन आहेत. गावच्या विकासासाठी शासनाच्या ध्येय धोरणाची पुरेशी माहिती असल्याशिवाय गाव विकासाची दिशा ठरविता येत नाही. परिणामी गावाचा विकास होत नाही. त्यामुळे नवनिर्वाचित सदस्य पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे.

पंचायत राज व्यवस्थेतील सरपंच, उपसरपंच, सदस्य हे महत्त्वाचे घटक असून, गाव विकासाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी योजनांची माहिती सरपंच, उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्यांना असणे आवश्यक आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती ग्रामसेवकाला, ग्रामविकास अधिकाऱ्यांना पंचायत समिती स्तरावरून लेखी स्वरूपात देण्यात येते. मात्र, या योजनांची माहिती अनेक गावांमध्ये ग्रामसभेतून दिली जात नाही, अशी नागरिकांची ओरड असते. सध्या तर कोरोना महामारीच्या प्रतिबंधात्मक अडचणीमुळे ग्रामसभांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य शासकीय योजनांच्या माहितीपासून अनभिज्ञ आहेत. काही ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी गावातील विशिष्ट मंडळींनाच योजनांची माहिती सांगून मोकळे होतात, अशी अनेकदा नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होत राहतात. त्यामुळे शासकीय योजनांपासून मुख्य लाभार्थी वंचित राहतात. त्याचबरोबर गावचा अपेक्षित विकास साधता येत नाही. परिणामी गावाचे अथवा नागरिकांचे नुकसान होत असते. त्यासाठी सरपंच, उपसरपंच आणि नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना ग्रामविकासासंबंधी प्रशिक्षण देण्याची गरज आहे.