शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

ग्रामपंचायतचे संगणक व प्रिंटरच बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 21:21 IST

तिरोडा तालुक्यातील ग्रामपंचायत नहरटोला येथील संगणक मागील सहा वर्षांपासून गायब आहेत. यामुळे लोकांना आॅनलाईनची व इतर संगणकाची कामे करण्याकरिता खासगी इंटरनेट कॅफेवाल्यांकडे जावे लागते.

ठळक मुद्देनहरटोला येथील प्रकार : कारवाई करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंडमोहाळी : तिरोडा तालुक्यातील ग्रामपंचायत नहरटोला येथील संगणक मागील सहा वर्षांपासून गायब आहेत. यामुळे लोकांना आॅनलाईनची व इतर संगणकाची कामे करण्याकरिता खासगी इंटरनेट कॅफेवाल्यांकडे जावे लागते. या संगणक बेपत्ता झाल्याच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ग्रामपंचायत नहरटोला येथील ग्रामपंचायत ग्रामसेवक यांचा हलगर्जीपणा दिसून येतो. असा आरोप गावातील काही जबाबदार व्यक्तिंनी केला आहे.सरकारी साहित्याची अशी अफरातफर करणाºया ग्रामसेवक व ग्रामपंचायतमधील संबंधीत दोषींवर प्रशासनाने योग्य ती कठोर कारवाई करावी. तसेच बेपत्ता झालेले संगणक व प्रिंटर ग्रामपंचायतला उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने काही तरी उपाययोजना करावी, अशी समस्त गावकºयांची मागणी आहे.ग्रामपंचायत नहरटोला येथील ग्रामसेवकांनी बेपत्ता झालेल्या संगणकाबाबत तोंडी माहिती दिली. त्यांच्या माहितीप्रमाणे तेथील संगणक हे मागील ३ महिन्यांपासून दुरूस्तीकरिता दिले असल्याचे सांगितले. मात्र ते गावकºयांची दिशाभूल करित असल्याचा आरोप गावातीलच काही व्यक्तींनी केला आहे. सदर ग्रामसेवकाकडे प्रिंटर संदर्भात माहिती घेण्यासाठी गेले असता त्यांनी सदर प्रतिनिधीला तुम्ही कुणाच्या परवानगीने माहिती मागायला आले आणि तुम्ही माहिती विचारणारे कोण? असे उलट उत्तर दिले.नहरटोलाचे सरपंच यांनीसुद्धा संगणकाबद्दल माहिती दिली की, मी जेव्हापासून ग्रामपंचायत नहरटोला येथे सत्तेवर आलो तेव्हापासून येथील संगणक बेपत्ता आहेत, असे सांगितले. यावरुन असे दिसून येते की ग्रामसेवक व सरपंच यांच्या संगणक बेपत्ता झाल्याच्या माहितीमध्ये किती तफावत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन यातील दोषींवर जिल्हा परिषद पंचायत विभागाने योग्य ती कारवाई करण्याची मागणी गावातील काही नागरिकांनी केली आहे. यासंबंधीची तक्रार देखील आहे.