शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

अखेर वजन करून धान्याची पोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 06:00 IST

जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी जि.प.च्या सर्वसाधारण सभेत हा मुद्दा उपस्थित करुन शिक्षण विभागाचे याकडे लक्ष वेधले होते.तसेच ६ डिसेंबर रोजी सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवणी येथील जि.प.शाळेला पोषण आहाराचा पुरवठा करताना त्याचे वजन न करताच कसे वितरण केले जाते.हा प्रकार सुध्दा उघडकीस आणला होता.

ठळक मुद्देलोकमत बातमीचा परिणाम : शिक्षण विभागाने घेतली दखल, मापातील पाप दूर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शालेय पोषण आहार तयार करण्यासाठी शासनाने करार केलेल्या कंत्राटदाराकडून शाळांना अन्नधान्याचा पुरवठा केला होता. मात्र कंत्राटदार अन्न धान्याची पोच शाळांना देताना त्याचे वजन करुन न देता मापात पाप करत होते. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर शिक्षण विभागाने याची गांर्भियाने दखल घेत कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे पत्र देताच अन्नधान्याचे पोच देतांना नियमानुसार वजन करुन देण्यास सुरूवात केली आहे. यामुळे अनेक शाळांना सुध्दा दिलासा मिळाला आहे.इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्वच विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिले जाते. यासाठी तांदूळ आणि इतर साहित्याचा पुरवठा करार केलेल्या संबंधित कंत्राटदाराकडून शाळांना केला जातो. नियमानुसार शाळांना पोषण आहाराचा पुरवठा करतांना त्याचे वजन करुन देणे अनिवार्य आहे. मात्र संबंधित कंत्राटदार या नियमांना धाब्यावर बसवून वजन न करताच पोषण आहाराचा पुरवठा करीत असल्याच्या तक्रारीत सुध्दा वाढ झाली होती.जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी जि.प.च्या सर्वसाधारण सभेत हा मुद्दा उपस्थित करुन शिक्षण विभागाचे याकडे लक्ष वेधले होते.तसेच ६ डिसेंबर रोजी सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवणी येथील जि.प.शाळेला पोषण आहाराचा पुरवठा करताना त्याचे वजन न करताच कसे वितरण केले जाते.हा प्रकार सुध्दा उघडकीस आणला होता.लोकमतने हा मुद्दा लावून धरला होता. यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी हरी राईस अ‍ॅन्ड अ‍ॅग्रो कंपनी पत्र देऊन वजन करुनच शाळांना पोषण आहाराचा पुरवठ्याचे करण्याचे निर्देश दिले. तसेच पोषण आहाराच्या अन्नधान्याच्या पुरवठा करणाºया गाडीत वजनकाटे सोबत ठेवण्याची नोटीस बजावली होती. अन्यथा कंत्राट रद्द करुन काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला होता.यानंतर सदर कंपनीने याची गांर्भियाने दखल घेत बुधवारपासून (दि.११) शाळांना पोषण आहाराच्या अन्नधान्याचे वितरण हे वजन करुन देण्यास सुरूवात केली.गाडीसोबत इलेक्ट्रानिक वजनकाटा सोबत ठेवला आहे.शाळांची तक्रार दूरकंत्राटदाराकडून पुरवठा करण्यात येणाºया शालेय पोषण आहाराच्या तांदळाच्या प्रती कट्टयामागे दोन तीन किलो धान्य कमी दिले जाते होते.यामुळे शाळांचे सुध्दा नुकसान होत होते. मात्र आता पोच देताना वजन करुन दिली जात असल्याने कमी धान्य मिळत असल्याची तक्रार सुध्दा दूर झाली आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र