शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
4
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
5
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
6
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
7
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
8
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
9
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
10
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
11
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
12
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
13
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
14
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
15
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
16
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
17
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
18
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
19
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
20
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी

अखेर वजन करून धान्याची पोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 06:00 IST

जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी जि.प.च्या सर्वसाधारण सभेत हा मुद्दा उपस्थित करुन शिक्षण विभागाचे याकडे लक्ष वेधले होते.तसेच ६ डिसेंबर रोजी सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवणी येथील जि.प.शाळेला पोषण आहाराचा पुरवठा करताना त्याचे वजन न करताच कसे वितरण केले जाते.हा प्रकार सुध्दा उघडकीस आणला होता.

ठळक मुद्देलोकमत बातमीचा परिणाम : शिक्षण विभागाने घेतली दखल, मापातील पाप दूर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शालेय पोषण आहार तयार करण्यासाठी शासनाने करार केलेल्या कंत्राटदाराकडून शाळांना अन्नधान्याचा पुरवठा केला होता. मात्र कंत्राटदार अन्न धान्याची पोच शाळांना देताना त्याचे वजन करुन न देता मापात पाप करत होते. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर शिक्षण विभागाने याची गांर्भियाने दखल घेत कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे पत्र देताच अन्नधान्याचे पोच देतांना नियमानुसार वजन करुन देण्यास सुरूवात केली आहे. यामुळे अनेक शाळांना सुध्दा दिलासा मिळाला आहे.इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्वच विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिले जाते. यासाठी तांदूळ आणि इतर साहित्याचा पुरवठा करार केलेल्या संबंधित कंत्राटदाराकडून शाळांना केला जातो. नियमानुसार शाळांना पोषण आहाराचा पुरवठा करतांना त्याचे वजन करुन देणे अनिवार्य आहे. मात्र संबंधित कंत्राटदार या नियमांना धाब्यावर बसवून वजन न करताच पोषण आहाराचा पुरवठा करीत असल्याच्या तक्रारीत सुध्दा वाढ झाली होती.जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी जि.प.च्या सर्वसाधारण सभेत हा मुद्दा उपस्थित करुन शिक्षण विभागाचे याकडे लक्ष वेधले होते.तसेच ६ डिसेंबर रोजी सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवणी येथील जि.प.शाळेला पोषण आहाराचा पुरवठा करताना त्याचे वजन न करताच कसे वितरण केले जाते.हा प्रकार सुध्दा उघडकीस आणला होता.लोकमतने हा मुद्दा लावून धरला होता. यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी हरी राईस अ‍ॅन्ड अ‍ॅग्रो कंपनी पत्र देऊन वजन करुनच शाळांना पोषण आहाराचा पुरवठ्याचे करण्याचे निर्देश दिले. तसेच पोषण आहाराच्या अन्नधान्याच्या पुरवठा करणाºया गाडीत वजनकाटे सोबत ठेवण्याची नोटीस बजावली होती. अन्यथा कंत्राट रद्द करुन काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला होता.यानंतर सदर कंपनीने याची गांर्भियाने दखल घेत बुधवारपासून (दि.११) शाळांना पोषण आहाराच्या अन्नधान्याचे वितरण हे वजन करुन देण्यास सुरूवात केली.गाडीसोबत इलेक्ट्रानिक वजनकाटा सोबत ठेवला आहे.शाळांची तक्रार दूरकंत्राटदाराकडून पुरवठा करण्यात येणाºया शालेय पोषण आहाराच्या तांदळाच्या प्रती कट्टयामागे दोन तीन किलो धान्य कमी दिले जाते होते.यामुळे शाळांचे सुध्दा नुकसान होत होते. मात्र आता पोच देताना वजन करुन दिली जात असल्याने कमी धान्य मिळत असल्याची तक्रार सुध्दा दूर झाली आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र