शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

धानाची अजूनही उचल नाही, विद्यार्थ्यांना बसवायचे कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:10 IST

सडक-अर्जुनी : रब्बीतील धान खरेदीसाठी यंदा गोदाम उपलब्ध न झाल्याने आश्रमशाळा आणि जि.प.च्या काही शाळांचा गोदाम म्हणून वापर करण्याचा ...

सडक-अर्जुनी : रब्बीतील धान खरेदीसाठी यंदा गोदाम उपलब्ध न झाल्याने आश्रमशाळा आणि जि.प.च्या काही शाळांचा गोदाम म्हणून वापर करण्याचा निर्णय शासनाने घेतला; पण अद्यापही या धानाची उचल करण्यात आली नसल्याने आता विद्यार्थ्यांना कुठे बसवून धडे द्यायचे, असा प्रश्न मुख्याध्यापक आणि शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे.

रब्बीतील धान खरेदीवर गोदामांअभावी परिणाम हाेऊन त्याचा भुर्दंड शिक्षकांना बसू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी उन्हाळी धान खरेदी करण्यासाठी शाळा इमारतींचा शाळा सुरू होईपर्यंत गोदाम म्हणून वापर करण्यास परवानगी दिली. आरटीई ॲक्टनुसार कार्यवाही करण्याची बाब नोंदवून तालुक्यातील आश्रमशाळा व इतर शाळांच्या इमारती अधिग्रहित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आश्रमशाळा व इतर ठिकाणी आदिवासी कार्यकारी सहकारी संस्था यांच्यामार्फत धान साठवून ठेवण्यात आले. दरम्यान, शालेय शिक्षण विभागाने ५ जुलै रोजी शाळा सुरू करण्याचे पत्र काढले, तर आदिवासी विकास विभागाने २६ जुलैच्या परिपत्रकानुसार २ ऑगस्टपासून आश्रमशाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आश्रमशाळा व्यवस्थापनाचे दीर्घ काळापासून बंद असलेली शाळा पूर्ववत सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत; परंतु शाळा इमारतींमध्ये धान साठविले असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह निवासी शाळा कशी सुरू करावी, असा प्रश्न आश्रमशाळा प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. यापूर्वी प्रादेशिक व्यवस्थापक आदिवासी विकास महामंडळ, भंडारा यांनी ही समस्या लक्षात घेऊन १६ जुलैला उपप्रादेशिक व्यवस्थापक आदिवासी विकास महामंडळ मर्या., नवेगाव यांना पत्र पाठवून आश्रमशाळेत खरेदी करण्यात आलेले धान्य अन्य ठिकाणी वाहतूक करून आश्रमशाळा इमारत रिकामी करण्याचे निर्देश दिले. प्रकल्प अधिकारी देवरी यांनीही ९ जुलैला आश्रमशाळांच्या इमारतीमध्ये खरेदी केलेले धान त्वरित खाली करण्याचे निर्देश आदिवासी विकास महामंडळाला दिले. मात्र, यानंतरही धानाची उचल करण्यात आली नाही. त्यामुळे सोमवारपासून (दि.२) शाळा सुरू होणार असून, विद्यार्थ्यांना बसवायचे कुठे, असा प्रश्न आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे.

..............

आदिवासी विकास महामंडळाचे वेळकाढू धोरण

आश्रमशाळा प्रशासनाने २६ जुलैच्या पत्रानुसार शाळा सुरू करण्याचे आदिवासी विभागाचे पत्र मिळताच २८ जुलैला शाळा इमारत खाली करून देण्याबाबत आदिवासी कार्यकारी सहकारी संस्था मर्या., कनेरी, उपप्रादेशिक व्यवस्थापक नवेगाव, तालुका पुरवठा अधिकारी सडक अर्जुनी संबंधित संस्थेच्या उपाध्यक्षांकडे पाठपुरावा केला; पण यानंतरही संबंधित यंत्रणेकडून धानाची उचल करण्यात आली नाही. त्यामुळे शासनाच्या निर्देशाप्रमाणे शाळा कशी सुरू करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.