शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

धानाची अजूनही उचल नाही, विद्यार्थ्यांना बसवायचे कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:10 IST

सडक-अर्जुनी : रब्बीतील धान खरेदीसाठी यंदा गोदाम उपलब्ध न झाल्याने आश्रमशाळा आणि जि.प.च्या काही शाळांचा गोदाम म्हणून वापर करण्याचा ...

सडक-अर्जुनी : रब्बीतील धान खरेदीसाठी यंदा गोदाम उपलब्ध न झाल्याने आश्रमशाळा आणि जि.प.च्या काही शाळांचा गोदाम म्हणून वापर करण्याचा निर्णय शासनाने घेतला; पण अद्यापही या धानाची उचल करण्यात आली नसल्याने आता विद्यार्थ्यांना कुठे बसवून धडे द्यायचे, असा प्रश्न मुख्याध्यापक आणि शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे.

रब्बीतील धान खरेदीवर गोदामांअभावी परिणाम हाेऊन त्याचा भुर्दंड शिक्षकांना बसू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी उन्हाळी धान खरेदी करण्यासाठी शाळा इमारतींचा शाळा सुरू होईपर्यंत गोदाम म्हणून वापर करण्यास परवानगी दिली. आरटीई ॲक्टनुसार कार्यवाही करण्याची बाब नोंदवून तालुक्यातील आश्रमशाळा व इतर शाळांच्या इमारती अधिग्रहित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आश्रमशाळा व इतर ठिकाणी आदिवासी कार्यकारी सहकारी संस्था यांच्यामार्फत धान साठवून ठेवण्यात आले. दरम्यान, शालेय शिक्षण विभागाने ५ जुलै रोजी शाळा सुरू करण्याचे पत्र काढले, तर आदिवासी विकास विभागाने २६ जुलैच्या परिपत्रकानुसार २ ऑगस्टपासून आश्रमशाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आश्रमशाळा व्यवस्थापनाचे दीर्घ काळापासून बंद असलेली शाळा पूर्ववत सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत; परंतु शाळा इमारतींमध्ये धान साठविले असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह निवासी शाळा कशी सुरू करावी, असा प्रश्न आश्रमशाळा प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. यापूर्वी प्रादेशिक व्यवस्थापक आदिवासी विकास महामंडळ, भंडारा यांनी ही समस्या लक्षात घेऊन १६ जुलैला उपप्रादेशिक व्यवस्थापक आदिवासी विकास महामंडळ मर्या., नवेगाव यांना पत्र पाठवून आश्रमशाळेत खरेदी करण्यात आलेले धान्य अन्य ठिकाणी वाहतूक करून आश्रमशाळा इमारत रिकामी करण्याचे निर्देश दिले. प्रकल्प अधिकारी देवरी यांनीही ९ जुलैला आश्रमशाळांच्या इमारतीमध्ये खरेदी केलेले धान त्वरित खाली करण्याचे निर्देश आदिवासी विकास महामंडळाला दिले. मात्र, यानंतरही धानाची उचल करण्यात आली नाही. त्यामुळे सोमवारपासून (दि.२) शाळा सुरू होणार असून, विद्यार्थ्यांना बसवायचे कुठे, असा प्रश्न आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे.

..............

आदिवासी विकास महामंडळाचे वेळकाढू धोरण

आश्रमशाळा प्रशासनाने २६ जुलैच्या पत्रानुसार शाळा सुरू करण्याचे आदिवासी विभागाचे पत्र मिळताच २८ जुलैला शाळा इमारत खाली करून देण्याबाबत आदिवासी कार्यकारी सहकारी संस्था मर्या., कनेरी, उपप्रादेशिक व्यवस्थापक नवेगाव, तालुका पुरवठा अधिकारी सडक अर्जुनी संबंधित संस्थेच्या उपाध्यक्षांकडे पाठपुरावा केला; पण यानंतरही संबंधित यंत्रणेकडून धानाची उचल करण्यात आली नाही. त्यामुळे शासनाच्या निर्देशाप्रमाणे शाळा कशी सुरू करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.