शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं. निवडणुकीसाठी केवळ २१० अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 21:45 IST

जिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या १६ आॅक्टोबरला होऊ घातली आहे. यासाठी नामाकंन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला २२ सप्टेंबरपासून सुरूवात झाली आहे.

ठळक मुद्देआॅनलाईन प्रक्रियेमुळे उमेदवार संभ्रमात : राजकीय घडामोडींना वेग

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या १६ आॅक्टोबरला होऊ घातली आहे. यासाठी नामाकंन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला २२ सप्टेंबरपासून सुरूवात झाली आहे. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या बुधवारी (दि.२७) सहावा दिवस होता. सहा दिवसांच्या कालावधीत केवळ २१० उमेदवारांनी नामाकंन अर्ज दाखल केले.ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामाकंन अर्ज दाखल करण्यासाठी आता दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे या कालावधीत उमेदवारांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील ३४७ सरपंच व २९३९ सदस्य पदांसाठी आतापर्यंत १९७ अर्ज प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे, आमगाव तालुक्यात अद्याप नामांकन अर्ज दाखल झालेले नाही. येत्या १६ आॅक्टोबर रोजी ३४७ ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यपदांसाठी निवडणूक होणार आहे. याकरिता अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. आॅनलाईन प्रक्रियेमुळे इच्छूक उमेदवारांना अर्ज दाखल करण्यास चांगलीच दमछाक करावी लागत आहे.२९ सप्टेंबरपर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्यात येणार आहे. नामांकन दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी देखील नामांकन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आल्याचे चित्र नव्हते. जिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासह २९३९ ग्रा.पं.सदस्यांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. आजपर्यंत अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ३१ नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. तर तिरोडा येथे ५८ नामांकन असे एकूण ६८ नामांकन अर्ज दाखल करण्यात आले आहेत. गोंदिया येथे सरपंचपदासाठी १० तर सदस्यपदांसाठी २८ असे एकूण ३८, सालेकसा तालुक्यात सरपंचपदासाठी ७ तर सदस्यपदासाठी ३० असे एकूण ३७, सडक-अर्जुनी तालुक्यात सरपंचपदासाठी ८, गोरेगाव तालुक्यात सरपंचपदासाठी २ तर सदस्यपदासाठी ११ असे एकूण १३ व देवरी तालुक्यात भागी आणि सिरपूर या दोन गावांच्या सदस्यपदासाठी फक्त २ अर्ज प्राप्त झाले आहेत. असे एकूण जिल्ह्यात २१० नामांकन अर्ज यंत्रणेकडे प्राप्त झाल्याची माहिती आहे.नामांकन अर्ज दाखल करण्याचा सहावा दिवस असूनही आमगाव तालुक्यातील निवडणूक यंत्रणेकडे अद्याप नामांकनाचे खाते उघडलेले नाही. नामांकन दाखल करण्यासाठी आता शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे इच्छूक उमेदवारांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे.