शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

८०७ गावांवर शासनाचा अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 21:54 IST

राज्य शासनाने राज्यातील ८ तालुक्यात दुष्काळग्रस्त तालुके म्हणून जाहीर केले. यात गोंदिया जिल्ह्यातील एकही तालुक्याचा समावेश नाही. गोंदिया जिल्ह्यातील ३६ गावात रोवण्याच झाल्या नव्हत्या. तर ७७१ गावातील पैसेवारी ५० पैश्याच्या आत होती.

ठळक मुद्देएकही तालुका दुष्काळग्रस्त नाही : तोंडाला पाने पुसल्याचा परशुरामकर यांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य शासनाने राज्यातील ८ तालुक्यात दुष्काळग्रस्त तालुके म्हणून जाहीर केले. यात गोंदिया जिल्ह्यातील एकही तालुक्याचा समावेश नाही. गोंदिया जिल्ह्यातील ३६ गावात रोवण्याच झाल्या नव्हत्या. तर ७७१ गावातील पैसेवारी ५० पैश्याच्या आत होती. तरीही शासनाने जिल्हा दृष्काळग्रस्त घोषीत केला नाही. या सरकारने दुष्काळात होरपळत असलेल्या सर्वच घटकांचे तोंडाला पाने पुसली आहे, असा आरोप जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केला आहे.जिल्हाधिकारी सरकारचे प्रतिनिधी असतात. जिल्हाधिकारी यांनी २८ डिसेंबर २०१७ ला सविस्तर अहवाल पाठविला. परंतु त्या अहवालाची सरकार दखल घेत नसेल तर हे सरकार काय कामाचे असा परखड सवाल परशुरामकर यांनी उपस्थित केला आहे.जिल्ह्यात १३०० मि.मी. पावसाची आवश्यकता असताना फक्त ७५३ मि.मी. पावसाची नोंद झाली.ती सरासरचीच्या ५८ टक्के आहे. हे सर्व आकडे सरकारच्या यंत्रणेचेच आहेत. यामुळे जिल्ह्यात हजारो हेक्टर जमीन पडीत राहिली हे वास्तव आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण सर्वेक्षण करुन सरकारला २८ डिसेंबर २०१७ ला अहवाल सादर केला. त्यात जिल्ह्यातील एकूण ९५५ गावांपैकी पीक नसलेली ३६ गावे वगळून उर्वरित ९१९ गावांपैकी अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १४८ गावे वगळून ७७१ गावांची पीक पैसेवारी ५० पैश्याच्या आत आहे, असा अहवाल सादर केला. परंतु सरकारने पूर्वी गोरेगाव, गोंदिया व तिरोडा या तीन तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला. काल (दि.२५) रोजी राज्यातील ८ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. त्यात यवतमाळ येथील ५, वासीम १ व जळगाव २ अशा ८ तालुक्याचा समावेश आहे. यावेळीही गोंदिया जिल्ह्याच्या तोंडाला पाने पुसण्यात आलेली आहेत. संपूर्ण जिल्हा राज्यात ज्यांची सत्ता आहे. त्यातच लोकप्रतिनिधीचे नेतृत्व आहे. तरीपण जिल्ह्यात दुष्काळ जाहीन न करुन येथील जनतेला दुष्काळाचे जाहीर न करुन येथील जनतेला दुष्काळाचे सोयी सवलतीपासून वंचित ठेवण्यात येत आहे. यावरुन येथील सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी जनतेला न्याय देण्यात कमी पडत असल्याचा आरोप परशुरामकर यांनी केला आहे. पीक विम्याच्या नावावर शेतकऱ्यांना लुटण्यात आल्याच्याही प्रतिक्रिया उमटत आहेत.जिल्ह्याच्या अहवालाकडे दुर्लक्षविदर्भातच सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या होतात. सतत अवर्षण, नापीकी व कर्जाचा वाढता बोझा पाहून चहूबाजूने संकटात सापडलेल्या शेतकºयाला आत्महत्या करावी लागते. गोंदिया जिल्हा दुष्काळाच्या सावटात असतानाही गोंदिया जिल्ह्यातील एकही तालुका दुष्काळग्रस्तच्या यादीत टाकले नाही. शासनाचे प्रतिनिधी असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी गोंदिया जिल्ह्याची पैसेवारी शासनाला सादर केली. परंतु त्यांनी दिलेल्या अहवालालाही शासनाने खोटे तर ठरविले नाही ना अशी शंका शेतकऱ्यांना येत आहे. मुख्यमंत्री विदर्भाचे असूनही विदर्भातील शेतकºयांवर नाराज असल्याचा सूर शेतकºयांत आहे.