शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षीच्या धान खरेदीत शासनाचा आखडता हात

By admin | Updated: September 26, 2015 01:47 IST

जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. अनियमित पावसाने यावर्षी कमी उत्पन्न होण्याच्या शक्यतेने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

खरेदी मर्यादा घटली : शेतकऱ्यांना धान विकावा लागणार व्यापाऱ्यांनागोंदिया/बाराभाटी : जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. अनियमित पावसाने यावर्षी कमी उत्पन्न होण्याच्या शक्यतेने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. डोक्यावर कर्जाचे ओझे आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी राज्य शासनाने खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून हमीभावानुसार धान खरेदी करताना प्रतिहेक्टर २५ क्विंटलवरून २० क्विंटल अशी मर्यादा घटविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उर्वरित धान कमी दराने व्यापाऱ्यांच्या घशात घालावा लागणार आहे.राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने याबाबतचे परिपत्रक आदिवासी विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन या दोन्ही एजन्सींना जारी केले आहे. त्यांच्यामार्फत हे परिपत्रक धान खरेदी करणाऱ्या सरकारी संस्थांना पाठविण्यात आले आहे. हा सर्रास शेतकऱ्यांवर कुटाराघात असल्याचा आरोप सहकारी संस्थांचे पदाधिकारी करीत आहेत.पावसाअभावी यावर्षी पिकांची स्थिती चांगली नाही. त्यामुळे धानाचे उत्पन्न यावर्षी घटणार आहे. शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा वाढत आहे. असे असताना राज्य शासनाने शेतकऱ्यांना मारक ठरणारा हा निर्णय कसा काय घेतला? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. यापूर्वी प्रत्येक वेळी प्रतीहेक्टरी २५ क्विंटलनुसार शेतकऱ्यांकडील धानाची हमीभावानुसार खरेदी केली जात होती. मात्र आता मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या सर्व शासकीय आधारभूत खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांकडील धान खरेदी करताना शेतकऱ्यांकडे असलेल्या शेतजमिनीनुसार प्रतीहेक्टर २० क्विंटल, अर्थात एकरी ८ क्विंटल एवढाच स्वीकारला जाणार आहे. त्यामुळे एकरी ८ क्विंटलपेक्षा जास्त पिकणारा धान शेतकऱ्यांना सरळ व्यापाऱ्यांना विकण्याशिवाय पर्याय राहणार नाही. यात व्यापारीवर्गाकडून शेतकरी वर्ग नाडवल्या जाणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी/वार्ताहर)समितीच्या अहवालावरुन बदलविले निकषअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने याबाबतचे परिपत्र जारी करताना भंडारा जिल्ह्यात हंगाम २०१३-१४ मध्ये धान खरेदी करताना झालेल्या अनियमिततेचा संदर्भ दिला. ही अनियमितता तपासणीसाठी ज्या त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती केली होती त्या समितीच्या शिफारसीवरून आधारभूत खरेदीचे निकष बदलविल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. विशेष म्हणजे आता शेतकऱ्यांचे हे चुकारे त्यांच्या बँक खात्यातच जमा होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना बँक खाते व आधार कार्ड लिंक करून त्याची आॅनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर धानाचे चुकारे आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची जबाबदारी अभिकर्ता संस्थांची राहणार आहे.