शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

समायोजनांतर्गत बदल्यांना शासनाची हिरवी झेंडी

By admin | Updated: August 1, 2016 00:03 IST

जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्यांच्या प्रकरणावर अखेर पूर्ण विराम लागला आहे. या प्रकरणी ग्राम विकास

अग्रवाल यांचे प्रयत्न : ग्राम विकास व शिक्षण सचिवांचे आदेश गोंदिया : जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्यांच्या प्रकरणावर अखेर पूर्ण विराम लागला आहे. या प्रकरणी ग्राम विकास व शिक्षण सचिवांनी शिक्षकांच्या संच मान्यतेची तपासणी करून नियमानुसार यादी प्रसिद्ध करण्याचे आदेश जिल्हा परिषदेला दिले आहेत. शिवाय रिक्त पद असलेल्या जागांवर अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन अंतर्गत बदल्यांना मंजूरी दिली आहे. जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्यांवरील स्थगनादेशाने शिक्षण क्षेत्रात चांगलीच खळबळ माजली होती. त्यामुळे शिक्षण सभापती पी.जी.कटरे यांच्या मागणीवरून लोकलेखा समिती प्रमुख आमदार गोपालदास अग्रवाल यांनी या विषयाला घेऊन शिक्षण सचिव नंदकुमार व ग्राम विकास सचिव वी. गिरीराज व शिक्षण सभापती कटरे यांची बैठक मुंबई येथे घेतली. बैठकीत सभापती कटरे यांनी शिक्षकांची बाजू मांडत शिक्षकांच्या बदल्यांबरील स्थगनादेशाने शिक्षक व शाळांच्या संचालनात होत असलेल्या अडचणी मांडल्या. यावर आमदार अग्रवाल यांनी, शिक्षकांच्या अभावामुळे नागरिक आल्या दिवशी शाळा बंद करीत असल्याचे सांगीतले. तसेच नक्षलग्रस्त जिल्ह्यातील देवरी सारख्या अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त तालुक्यात ८० पदे रिक्त असल्याचे सांगीतले. अशात शासनाने कोणत्या परिस्थितीत शिक्षकांच्या बदल्या थांबविल्या ही बाब बाजूला सारून रिक्त पदांवर शिक्षकांच्या बदल्या करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे ज्या शाळांत शिक्षकांची कमतरता आहे तेथे शिक्षकांची नियुक्ती कोणत्याही परिस्थितीत करण्याची मागणी केली. आमदार अग्रवाल यांच्या मागणीवरून ग्राम विकास सचिव गिरीराज व शिक्षण सचिव नंदकुमार यांनी, गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकांच्या संच मान्यतेची तपासणी करून नियमानुसार यादी प्रसिद्ध करण्याचे आदेश जिल्हा परिषदेला दिले. तसेच शिक्षकांचे समायोजन करून जेथे-जेथे शिक्षकांचे पद रिक्त आहेत तेथे अतिरीक्त शिक्षकांच्या समायोजन अंतर्गत बदल्यांना मंजूरी दिली आहे. (शहर प्रतिनिधी)