शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
3
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
4
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
5
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
6
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
7
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
8
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
9
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
10
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
11
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
12
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
13
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
14
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
15
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट, जम्मूपासून जैसलमेरपर्यंत मोठ्या घडामोडी
16
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
17
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
18
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
19
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
20
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी

शासनाने २० हजार शेतकऱ्यांना धरले वेठीस

By admin | Updated: August 3, 2015 01:22 IST

विविध समस्यांचा सामना करून धानाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने बोनस व धानाचे चुकारे न दिल्यामुळे

बोनस व चुकारे अडले : ५० कोटी १० लाखांची मागणीनरेश रहिले  गोंदियाविविध समस्यांचा सामना करून धानाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने बोनस व धानाचे चुकारे न दिल्यामुळे ऐन पावसाळ्याच्या दिवसात खरिपाचा हंगाम कसा घ्यायचा हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. जिल्ह्यातील २० हजार ४५० शेतकऱ्यांचे ५० कोटी ९ लाख ८९ हजार ७५० रूपयांचे चुकारे अद्याप झालेले नाही. यातून शासनाने या शेतकऱ्यांना वेठीस धरल्याचाच हा प्रकार दिसून येत आहे. धानाला भाव नाही, त्यातच कधी अतिवृष्टी तर कधी अवर्षण या प्रकारामुळे कंटाळलेल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर मुलीच्या लग्नाचे ओझे, मुलांचे महागडे शिक्षण यातून स्वत:ला सावरण्याची तयारी असलेल्या शेतकऱ्यांना महागडी औषधी खरेदी करतांना कंबरडे मोडते. आलेल्या अल्पशा उत्पन्नातून आपला संसार सावरण्याची स्वप्न रंगविणाऱ्या शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम महाराष्ट्र शासन करीत आहे. हाती चार पैसे येणार उद्देशातून शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील धान आधारभूत धान खरेदी केंद्रावर विकले. याशिवाय शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीत मदतीचा हात म्हणून बोनस घोषीत केला. धानाचे चुकारे व बोनसची रक्कम हाती आल्यावर त्या पैशातून खत, कीटकनाशक, औषधी खरेदी करण्याचे नियोजन होते. परंतु शासनाने त्यांच्या धानाचे चुकारे दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे सर्व नियोजन फिसकटले. हक्काचा पैसा मिळाला नसल्याने जिल्ह्यातील २० हजार शेतकरी शासनाच्या चुकीमुळे दारोदारी उसनवारीवर पैसे मागण्यासाठी भटकत आहेत. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने २० हजार ४५० शेतकऱ्यांकडून ७ लाख ४३ हजार ७६५ क्विंटल धान्य खरेदी केले. त्या धानाचे चुकारे व प्रति क्विंटल धानाचा बोनस असा एकूण १ अब्ज १९ कोटी ७४ लाख ९० हजार ६८ रूपये द्यायला हवे होते. परंतु शासनाने यापैकी ६९ कोटी ६५ लाख ३१८ रूपयेच दिले आहेत. तर ५० कोटी ९ लाख ८९ हजार ७५० रूपयांची मागणी अनेक दिवसापासून होत असताना शासनाने देशाच्या पोशिंद्यालाच उपाशी ठेवण्याचे ठरविले आहे.