शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

हे सरकार शेतकऱ्यांचे हित जोपासाणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 00:26 IST

देशातील जनतेला अन्नधान्याच्या उत्पादनाचे तारणहार, ज्याच्याकडे जगाचा पोशिंदा म्हणून पाहिल्या जाते. त्या शेतकरी बांधवांच्या सर्वांगीण उन्नती व हितासाठी केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी मदतीसाठी धावून येत आहे.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : धान खरेदीकेंद्राचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : देशातील जनतेला अन्नधान्याच्या उत्पादनाचे तारणहार, ज्याच्याकडे जगाचा पोशिंदा म्हणून पाहिल्या जाते. त्या शेतकरी बांधवांच्या सर्वांगीण उन्नती व हितासाठी केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी मदतीसाठी धावून येत आहे.मागील सरकारचे पाप नष्ट करुन गाव पातळीवरील समस्त शेतकऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सध्यास्थित होत असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील खोळदा, कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड बाजार समितीचे उपबाजार नवेगावबांध येथील शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.या वेळी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते विविधत काटापूजन करुन धान खरेदी सुरु करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती अरविंद शिवणकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक लटारे, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काशीफ जमा कुरैशी, खरेदी विक्री समितीचे सभापती नामदेव कापगते, बाजार समितीचे उपसभापती लायकराम भेंडारकर, खरेदी-विक्री समितीचे उपसभापती केवळराम पुस्तोडे, तालुका भाजपाध्यक्ष उमाकांत ढेंगे, तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष रघुनाथ लांजेवार, शिवनारायण पालीवाल, जि.प. सदस्य तेजुकला गहाणे,पं.स.सदस्य रामलाल मुंगणकर, तहसीलदार धनंजय देशमुख उपस्थित होते.बडोले म्हणाले शेतकऱ्यांनी पिकविलेल्या धानाला योग्य भाव मिळावा म्हणून जिल्ह्यात सर्वत्र शेतकºयांचा समावेश असलेल्या सहकारी संस्थामार्फत शासकीय आधारभूत हमी भाव धान केंद्र सुरु करण्यात आले.दिवाळीसारख्या आनंदाच्या उत्सवात शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसा खेळत राहावा म्हणून ठिकठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. ग्रामीण भागातील सहकारी संस्था आर्थिक सक्षम होण्यासाठी सब एजंट म्हणून धान खरेदी केंद्र सहकारी संस्थांना दिले आहेत.देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात भर घालणारे शेतकरीबांधव विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार सर्वोतोपरी मदत करुन शेतकऱ्यांच्या हितार्थ विविध उपक्रम राबवित आहे. शेतकºयांचे सर्वागिण हित डोळ्यासमोर ठेवून सरकार काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोले