शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

शासनाने शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी

By admin | Updated: May 2, 2017 00:32 IST

मागील अडीच वर्षांपासून सत्तेवर असलेले भाजप-सेना युतीची सरकार विविध प्रकारच्या घोषणा करीत राहीली ....

सहेसराम कोरोटे : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पत्रकारांशी साधला संवादसालेकसा : मागील अडीच वर्षांपासून सत्तेवर असलेले भाजप-सेना युतीची सरकार विविध प्रकारच्या घोषणा करीत राहीली व आश्वासनांचे लॉलीपॉप देण्याचे काम केले. परंतु प्रत्यक्षात या अडीच वर्षात शासनाने शेतकऱ्यांना कोणतीच मदत केली नाही. पोकळ आश्वासन देणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी अन्यथा येणाऱ्या काळात जनता व शेतकरी वर्ग या शासनाला धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही, असे मत जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव सहेसराम कोरोटे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. पुढे बोलताना कोरोटे यांनी, सत्तेवर येण्यापूर्वी जे लोक धानाला तीन हजार रुपये प्रतिक्विंटल भाव देण्याची मागणी करीत होते, तेच लोक आता सत्तेवर आल्यानंतर धानाला योग्य समर्थन मूल्य न देता साधा बोनस सुद्धा देऊ शकत नाही. तसेच नियमितरित्या कृषी उत्पादनाची खरेदी पण करु शकत नाही. व्यापाऱ्यांशी संगणमत करुन शेतकऱ्यांना लुबाडण्याची कामे शासनातील लोकांनी सुरू केली आहे. दीड वर्षापूर्वी सरकारने सालेकसा तालुक्यातील नऊ गावांना दुष्काळग्रस्त घोषित केले होते व त्यांना शासकीय मदत मिळवून देण्याचा गाजावाजा स्थानिक लोकप्रतिनिधींनी केला होता.परंतु दीड वर्ष लोटूनही त्यांनी शेतकऱ्यांना कवडीसुद्धा फेकून मारली नाही. अर्थातच विद्यमान सरकार घोषणाबाजी करण्यात पटाईत झालेली आहे. प्रत्यक्षात जनतेशी काही देणे-घेणे ठेवत नसल्याचे दिसून येत आहे. एवढी थट्टा या आधीच्या सरकारने कधीच केली नव्हती. मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांची तूर खरेदी बाबत ही सरकार तळ्यात-मळ्यात खेळ करीत आहे व शेतकऱ्यांना त्रस्त करण्याचे काम करीत आहे. शेतीत धानाशिवाय इतर गौण उत्पादन शेतकरी घेत असतात मात्र त्या उत्पादनाला योग्य भाव न मिळाल्याने त्यांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचे दिसत आहे. एकंदरित विद्यमान शासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून ठेवले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग संकटातून संघर्ष करीत आहे. असे असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी सुद्धा देण्यासाठी सरकार मागे पुढे पाहत आहे. असे शेतकरी विरोधी सरकार कोणत्याच कामाचे नाही असे मत कोरोटे यांनी व्यक्त केले आहे. (तालुका प्रतिनिधी)