शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

शासनाने शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी

By admin | Updated: May 2, 2017 00:32 IST

मागील अडीच वर्षांपासून सत्तेवर असलेले भाजप-सेना युतीची सरकार विविध प्रकारच्या घोषणा करीत राहीली ....

सहेसराम कोरोटे : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पत्रकारांशी साधला संवादसालेकसा : मागील अडीच वर्षांपासून सत्तेवर असलेले भाजप-सेना युतीची सरकार विविध प्रकारच्या घोषणा करीत राहीली व आश्वासनांचे लॉलीपॉप देण्याचे काम केले. परंतु प्रत्यक्षात या अडीच वर्षात शासनाने शेतकऱ्यांना कोणतीच मदत केली नाही. पोकळ आश्वासन देणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी अन्यथा येणाऱ्या काळात जनता व शेतकरी वर्ग या शासनाला धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही, असे मत जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव सहेसराम कोरोटे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. पुढे बोलताना कोरोटे यांनी, सत्तेवर येण्यापूर्वी जे लोक धानाला तीन हजार रुपये प्रतिक्विंटल भाव देण्याची मागणी करीत होते, तेच लोक आता सत्तेवर आल्यानंतर धानाला योग्य समर्थन मूल्य न देता साधा बोनस सुद्धा देऊ शकत नाही. तसेच नियमितरित्या कृषी उत्पादनाची खरेदी पण करु शकत नाही. व्यापाऱ्यांशी संगणमत करुन शेतकऱ्यांना लुबाडण्याची कामे शासनातील लोकांनी सुरू केली आहे. दीड वर्षापूर्वी सरकारने सालेकसा तालुक्यातील नऊ गावांना दुष्काळग्रस्त घोषित केले होते व त्यांना शासकीय मदत मिळवून देण्याचा गाजावाजा स्थानिक लोकप्रतिनिधींनी केला होता.परंतु दीड वर्ष लोटूनही त्यांनी शेतकऱ्यांना कवडीसुद्धा फेकून मारली नाही. अर्थातच विद्यमान सरकार घोषणाबाजी करण्यात पटाईत झालेली आहे. प्रत्यक्षात जनतेशी काही देणे-घेणे ठेवत नसल्याचे दिसून येत आहे. एवढी थट्टा या आधीच्या सरकारने कधीच केली नव्हती. मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांची तूर खरेदी बाबत ही सरकार तळ्यात-मळ्यात खेळ करीत आहे व शेतकऱ्यांना त्रस्त करण्याचे काम करीत आहे. शेतीत धानाशिवाय इतर गौण उत्पादन शेतकरी घेत असतात मात्र त्या उत्पादनाला योग्य भाव न मिळाल्याने त्यांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचे दिसत आहे. एकंदरित विद्यमान शासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून ठेवले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग संकटातून संघर्ष करीत आहे. असे असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी सुद्धा देण्यासाठी सरकार मागे पुढे पाहत आहे. असे शेतकरी विरोधी सरकार कोणत्याच कामाचे नाही असे मत कोरोटे यांनी व्यक्त केले आहे. (तालुका प्रतिनिधी)