शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

अदानी प्रकल्पग्रस्तांच्या समस्येत शासनाने मध्यस्थी करावी-बन्सोड

By admin | Updated: April 2, 2017 01:17 IST

तिरोडा येथील अदानी वीज प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या अनेक समस्या अजूनही कायम आहेत.

पुनर्वसनाची गावकऱ्यांची मागणी : जय विदर्भ प्रकल्पग्रस्त समितीचा पाठपुरावा गोंदिया : तिरोडा येथील अदानी वीज प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या अनेक समस्या अजूनही कायम आहेत. त्यात प्रामुख्याने मेंदीपूर, भिवापूरटोला, उदयटोलासारख्या गावांतील समस्या गंभीर आहेत. शासनाने मध्यस्थी करून प्रकल्पग्रस्त नागरिकांना ‘एटीपीसी’च्या निकषानुसार लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी माजी आमदार दिलीप बन्सोड यांच्यासह प्रकल्पबाधित गावातील जय विदर्भ प्रकल्पग्रस्त पुनर्व्यवस्थापन समिती तिरोडाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. शुक्रवारी गोंदियात आयोजित पत्रपरिषदेत माजी आ.बन्सोड यांच्यासह मेंदीपूरच्या सरपंच मुक्ताबाई रहांगडाले, उपसरपंच शिवदासजी पारधी, सामाजिक कार्यकर्ते ग्यानीराम ठोंबरे, तिरोडाचे महेश बालकोटे, गुमाधावडाचे उमालाल पटले, शिवानंद बिसेन, मेंदीपूरचे गंगाप्रसाद रहांगडाले, प्रकाश कोठेकर या प्रकल्पग्रस्त नागरिकांनी आपली व्यथा मांडली. प्रकल्पाच्या कार्यकक्षेत येणाऱ्या गावातील नागरिकांना आज प्रकल्पातून उडणाऱ्या राखेमुळे त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्या गावांचे पुनर्वसन करा किंवा उडणाऱ्या राखेचा बंदोबस्त करा, अशी मागणी बन्सोड यांनी केली. शिवाय ज्या गावांचे पुनर्वसन केले त्यांची नावे संंबंधित गावाच्या मतदार यादीत नाहीत. त्यामुळे ते शासकीय योजनांपासून वंचित आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला नोकरी द्यावी, अप्रशिक्षितांना प्रशिक्षण देऊन कायमस्वरूपी रोजगार देण्याची मागणी यावेळी केली. असून न्याय न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. (जिल्हा प्रतिनिधी) अदानी म्हणते, करारनाम्यानुसार सर्व दिले अदानी प्रकल्पाच्या राखेमुळे प्रदुषण वाढत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप फेटाळून लावत अदानी व्यवस्थापनाने प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सर्व निकष पाळल्या जात असल्याचे सांगितले. तसेच आजुबाजूच्या गावांना अदानीकडून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आल्याचे सांगितले. शासनाशी केलेल्या करारनाम्यात १५ टक्के विकसित भूखंड देणे किंवा त्याऐवजी रोख रक्कम देण्याची तरतूद नसल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांकडून संमतीने व वाटाघाटी करून बाजारमूल्य दराने कंपनीने जमीन खरेदी केली. त्यात पुनर्वसन पॅकेज देण्याची अट समाविष्ट नव्हती. करारनाम्यानुसार बाधीत कुटुंबास नोकरीऐवजी ५ लक्ष रुपये अदा करण्यात आले आहे, असे अदानी व्यवस्थापनाने स्पष्ट केले.