शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

शासनाकडून धान उत्पादक शेतकऱ्यांची होतेय थट्टा

By admin | Updated: November 17, 2014 22:57 IST

केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. अडीच हजार रुपये प्रति क्विंटल धानाला भाव द्या, अशी मागणी करणारेच आता शेतकऱ्यांची थट्टा करीत आहेत,

अर्जुनी/मोरगाव : केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. अडीच हजार रुपये प्रति क्विंटल धानाला भाव द्या, अशी मागणी करणारेच आता शेतकऱ्यांची थट्टा करीत आहेत, असा आरोप तालुका शिवसेनेने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाव्दारे केला आहे. केंद्र व राज्यात आघाडी शासन सत्तेवर होते. पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांना घेऊन रान माजविणारेच आता सत्तेत आहेत. त्यावेळी प्रति क्विंटल अडीच हजार रुपये धानाला भाव द्या, अशी भाजपची मागणी असायची. सत्तेवर येताच त्यांना या धानाच्या भाववाढीचा विसर पडला आहे. प्रति क्विंटल केवळ ५० रुपये भाववाढ देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसण्याचा प्रकार सत्तारुढ शासनाने केला. शेतकरी विरोधी या शासनाचा शिवसनेने निषेध व्यक्त करून धानपिकाला उत्पादन खर्चावर आधारित भाववाढ देण्याची मागणी केली आहे. चालू खरीप हंगामात उत्पादित झालेल्या धानपिकाची आधारभूत हमी भाव धान खरेदी केंद्र सुरू झाली आहेत. शासनाच्या निर्णयाप्रमाणे धान खरेदी केंद्राना इलेक्ट्रानिक वजनकाटे पुरविण्यात आले. परंतु धान खरेदी करणाऱ्या संस्था व अधिकाऱ्यांच्या संगनमताने सध्या खरेदी सुरू आहे. साध्या वजनकाट्याने सुरू असलेल्या खरेदीमुळे शेतकऱ्यांचे क्विंटलमागे दीड ते दोन किलो नुकसान होत आहे.साध्या वजनकाट्याने सुरू असलेली खरेदी त्वरीत बंद करण्यात यावी व इलेक्ट्रानिक्स वजन यंत्राने धान खरेदी व्हावी. अन्यथा येत्या ८ ते १० दिवसात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेच्या वतीने जिल्हा उपप्रमुख शैलेशकुमार जायस्वाल, महिला प्रमुख किरण कांबळे, तालुका प्रमुख संजय पवार व कार्यकर्त्यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)