शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
९ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी अन्... विजयच्या रॅलीत ३६ जणांचा मृत्यू, पाण्याच्या बाटल्या फेकत होता अभिनेता
3
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
4
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
5
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
6
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
7
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
8
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
9
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
10
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
11
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
12
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
13
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
14
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
15
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
16
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
17
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
18
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
19
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
20
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद

शासनाच्या योजना समाज परिवर्तन घडविण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 21:25 IST

चर्मकार समाजाचा मुळ उद्योग हातातून निसटला व तो ‘बाटा सारख्या उद्योगांनी अंगिकारुन व्यवसाय केला. चर्मकार समाज विकासाच्या प्रवाहातून पुढे यावे, यासाठी शासन मोठ्या प्रमाणात कल्याणकारी योजना राबवित आहे.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : रोजगार व माहिती मार्गदर्शन मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : चर्मकार समाजाचा मुळ उद्योग हातातून निसटला व तो ‘बाटा सारख्या उद्योगांनी अंगिकारुन व्यवसाय केला. चर्मकार समाज विकासाच्या प्रवाहातून पुढे यावे, यासाठी शासन मोठ्या प्रमाणात कल्याणकारी योजना राबवित आहे.राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ व राज्यातील संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या माध्यमातून अनेक योजना सुरु आहेत. या योजनांच्या माध्यमातून अनेकांनी आपले व्यवसाय, उद्योग, उच्च शिक्षण करुन यश मिळविले आहे.आज चर्मकार समाजातील मुले आयएएस, आयपीएस होत आहेत. विदेशात जात आहेत. मोठे उद्योजक घडत आहेत. हे सकारात्मक बदल समाजात घडत आहे.ग्रामीण भागातील युवकांमधील नैराश्य दूर करण्यासाठी व समाजात परिवर्तन घडविण्यासाठी अशा मेळाव्याच्या माध्यमातून योजनांची माहिती व त्याचे लाभ पोहोचिवणा हाच मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.सडक अर्जुनी येथील तेजिस्वनी लॉनमध्ये संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या वतीने आयोजित रोजगार व माहिती मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेश ढाबरे, जि.प. समाजकल्याण सभापती विश्वजीत डोंगरे, पं.स. सभापती गिरधर हत्तीमारे, अर्जुनी मोरगाव पं.स सभापती अरविंद शिवणकर, युवा उद्योजिका पद्मजा राजगुरु, विभागीय व्यवस्थापक आलोक मिश्रा, पंस उपसभापती राजेश कठाणे, शारदा बडोले, अमर तांडेकर, जितेंद्रसिंग जगने, जि.प.सदस्य शिला चव्हाण, तेजुकला गहाणे, रामू जगनीत, चव्हाण गुरुजी, बरय्या, रतन वासनिक, मनोहर चौरे, गंगाधर सोनवने उपस्थित होते.बडोले म्हणाले, जशा उद्योगपतींच्या वस्तू सर्वत्र विकल्या जातात तशाच लीडकॉमच्या वस्तू विकण्यासाठी प्रत्येक तालुक्यात दुकाने सुरु करण्याचा कार्य आम्ही करीत आहोत. गटईच्या निविदा काढल्या जात आहेत. युवकांना प्रशिक्षण देऊन रोजगार उभा करण्यासाठी मागील चार वर्षात मोठे कार्य झाले आहे.जिल्ह्यातही मोठे प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी ५० एकर जागेचा शोध सुरु आहे. केंद्र व राज्य सरकारचे चर्मकार समाजासाठी असलेल्या ५० टक्के अनुदान योजना, बीज भांडवल योजना,प्रशिक्षण योजना, गटई स्टॉल योजना, मुदत कर्ज योजना, सुक्ष्म पत पुरवठा योजना, महिला समृध्दी योजना, महिला किसान योजना, शैक्षणिक कर्ज आदी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.ढाबरे यांनी आपल्या मार्गदर्शनात, महामंडळाच्या योजना राबविताना त्या तळागळापर्यंत पोहोचिवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जिल्ह्यातील प्रशिक्षण प्राप्त युवकांनी मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगार उभारुन आदर्श उभे केले आहे. यात नुकत्याच सडक अर्जुनी तालुक्यात १३ युवकांनी प्रशिक्षणानंतर उभारलेले स्वयंरोजगार हे उदाहरण आहे.यावेळी मुंबईच्या युवा महिला उद्योजिका पद्मजा राजगुरु यांनी आपली नोकरी ते यशस्वी उद्योजिका होण्याचा प्रवास कथन केला.आलोक मिश्रा यांनी, रोजगार व स्वयंरोजगार निवडीसंदर्भात मार्गदर्शन केले.याप्रसंगी जिल्ह्यातील चर्मकार समाजातील यशस्वी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच १३ लाभार्थ्यांना प्रत्येकी ५० हजाराचे कर्ज वितरीत करण्यात आले. यशस्वीतेसाठी विजय बिसेन, डॉ. लक्ष्मण भगत, रघुनाथ लांजेवार, कविता रंगारी, लक्ष्मीकांत धानगाये यांच्यासह लीडकॉमचे वरिष्ठ अधिकारी तुषार कुळकर्णी, दिलीप दुतडे, वैभव खटावकर, पुणेवार, काथवटे, ढगे, पांडे, भगत उपस्थित होते. कार्यक्र माचे संचालन अनिल मेश्राम यांनी केले तर आभार लीडकॉमचे जिल्हा व्यवस्थापक पी.पी.महाजन यांनी मानले.