शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

शासनाचे आदेश निघाले आम्हाला नाही मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 00:47 IST

शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानातून ३५ रुपये प्रती किलो दराने तुरडाळीचा पुरवठा करण्याचा निर्णय राज्य सरकारने आठवडाभरापूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला.

ठळक मुद्दे३५ रुपये प्रती किलो तुरडाळ : स्वस्त धान्य दुकानदार अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानातून ३५ रुपये प्रती किलो दराने तुरडाळीचा पुरवठा करण्याचा निर्णय राज्य सरकारने आठवडाभरापूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. मात्र यासंबंधीचे आदेश अद्यापही जिल्हा पुरवठा विभागाकडे पोहोचले नाही. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांना अजूनही ५५ रुपये प्रती किलो दराने तुरडाळीचा पुरवठा केला जात असल्याने ते अडचणीत आले आहे. परिणामी शासनाचे आदेश निघाले, आम्हाला नाही मिळाले अशीच स्थिती निर्माण झाली आहे.मागील वर्षी राज्यात तुरीचे विक्रमी उत्पादन झाले. त्यामुळे शासनाने शासकीय हमीभावाने तुरीची खरेदी केली. तर तूर खरेदीवरुन बराच वाद देखील निर्माण झाला होता. खरेदी केलेली तूर ठेवण्यासाठी सरकारी गोदामात सुध्दा जागा नव्हती. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने तुरीची भरडाई करुन तुरडाळ तयार केली.त्यानंतर या तुरडाळीचा ५५ रुपये प्रती किलो दराने स्वस्त धान्य दुकान, सहकारी संस्था, जिल्हा मार्केटिंग फेडरेशन, ग्राहक सोसायट्यांना पुरवठा केला.मात्र खासगी बाजारपेठेत तुरडाळीचे दर घसरल्याने ५५ रुपये प्रती किलो तुरडाळीला ग्राहकांची मागणी नव्हती. शासकीय गोदामात मोठ्या प्रमाणात तुरडाळीचा साठा असल्याने सरकारसमोर सुध्दा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने आठवडाभरापूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वस्त धान्य दुकानदारांना ३५ रुपये प्रती किलो दराने तुरडाळीचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. याची माहिती सर्वांपर्यंत पोहचलीे.त्यामुळे शिधापत्रिकाधारक स्वस्त धान्य दुकारांना ३५ रुपये प्रती किलो दराने तुरडाळीचे मागणी करीत आहे. मात्र स्वस्त धान्य दुकानदारांना अद्यापही या दराने तुरडाळीचा पुरवठा झाला नसल्याने त्यांना शिधापत्रिकाधारकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे शिवचरण कापगते, किशोर वैद्य, उध्दव परशुरामकर या स्वस्त धान्य दुकानदारांनी लोकमतशी बोलताना सांगितले.शासनाने यावर त्वरीत तोडगा काढण्याची मागणी केली.स्वस्तधान्य दुकानदारांची पुरवठा विभागाकडे धाव३५ रुपये प्रती किलो दराने तुरडाळीचा पुरवठा करण्याचे आदेश अद्यापही जिल्हा पुरवठा विभागाला प्राप्त झालेले नाही. त्यामुळे पुरवठा विभागाकडून ५५ रुपये प्रती किलो दरानेच स्वस्त धान्य दुकानदारांना तुरडाळीचा पुरवठा केला जात आहे. मात्र शासनाच्या घोषणेमुळे शिधापत्रिकाधारक ५५ रुपये प्रती किलोची तुरडाळ घेण्यास तयार नाही. तर आम्ही ५५ रुपये प्रती किलोप्रमाणे डाळीचे पैसे भरले मात्र त्यानंतर शासनाचे नवीन आदेश धडकल्यास आमचे नुकसान कोण भरुन देणार असा प्रश्न स्वस्त धान्य दुकानदारांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांनी यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.३५ रुपये प्रती किलो दराने तुरडाळीचा पुरवठा करण्याचे शासनाचे आदेश अद्याप प्राप्त झालेले नाही. आदेश प्राप्त झाल्यानंतर यातील फरकाची रक्कम कपात करुन तेवढी तुरडाळ स्वस्त धान्य दुकानदारांना उपलब्ध करुन देण्यात येईल. यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांचे कुठलेही नुकसान होणार नाही.- ए.के.सवई, जिल्हा पुरवठा अधिकारीे, गोंदिया.शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती क्विंटल दोनशे रुपये बोनस देण्याची घोषणा केली होती. मात्र त्याचे आदेश पोहचण्यास तीन महिने लागले होते. तिच स्थिती आता तुरडाळीच्या बाबतीत होणार काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.- डॉ.अविनाश काशिवार, अध्यक्ष सेवा सहकारी संस्था, डव्वा.